चेन्नई - आगामी लोकसभा निवडणुकीतून सुपरस्टार रजनीकांत यांनी माघार घेतली आहे. ‘रजनी मक्कल मन्दरम’ हा रजनीकांत यांचा पक्षही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, अशी घोषणा रजनीकांत यांनी केली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रजनीकांत यांनी ही घोषणा केली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपला किंवा आपल्या पक्षाचा कोणालाही पाठिंबा असणार नाही, असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले. लोकसभेऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर आमचे लक्ष असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे.