ETV Bharat / bharat

तुतीकोरीनमधील पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर राहुल गांधींनी व्यक्त केले दु:ख

तुतीकोरीनमधील संथलकुलम येथे जयराज आणि त्यांचा मुलगा फिनिक्स याने मोबाईलचे दुकान उघडल्याने पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना 23 जूनला ताब्यात घेतले होते. त्यांचा पोलीसाच्या ताब्यात असताना छऴ करण्यात आला, असा आरोप कुटुंबिायांनी केला आहे.

author img

By

Published : Jun 28, 2020, 7:23 PM IST

काँग्रेस नेते राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी

चेन्नई - तुतीकोरीनमध्ये पोलिसांच्या मारहाणीत पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर तामिळनाडूतील वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरून राहुल गांधींनी पीडित कुटुंबियांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. कोरोना संकटामुळे संथनकुलम येथे कुटुंबियांची वैयक्तीक भेट घेऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पक्षाच्या शक्ती संकेतस्थळावर संदेश जारी केला आहे. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आंदोलन करुया असे, राहुल गांधी म्हणाले. जयराज आणि फिनिक्सच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पोलिसांच्या कारवाईबद्दल मला वाईट वाटते. दोघांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सायंकाळी 7 वाजता मेणबत्त्या पेटवा, असे राहुल गांधींनी तामिळनाडू काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

तुतीकोरीनमधील संथलकुलम येथे जयराज आणि त्यांचा मुलगा फिनिक्सने मोबाईलचे दुकान उघडल्याने पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना 23 जूनला ताब्यात घेतले होते. या पितापुत्राला नंतर पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र, उपचार चालू असताना दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांचा कोठडीत छळ केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि कुटुंबियांनी केला आहे.

याप्रकरणी राज्यातील वातावरण पेटले असून पोलीसांच्या छळाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. यासंबधी दोन पोलीस उपनिरिक्षकासह चौघांना निलंबितही करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे.

चेन्नई - तुतीकोरीनमध्ये पोलिसांच्या मारहाणीत पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर तामिळनाडूतील वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरून राहुल गांधींनी पीडित कुटुंबियांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. कोरोना संकटामुळे संथनकुलम येथे कुटुंबियांची वैयक्तीक भेट घेऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पक्षाच्या शक्ती संकेतस्थळावर संदेश जारी केला आहे. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आंदोलन करुया असे, राहुल गांधी म्हणाले. जयराज आणि फिनिक्सच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पोलिसांच्या कारवाईबद्दल मला वाईट वाटते. दोघांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सायंकाळी 7 वाजता मेणबत्त्या पेटवा, असे राहुल गांधींनी तामिळनाडू काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

तुतीकोरीनमधील संथलकुलम येथे जयराज आणि त्यांचा मुलगा फिनिक्सने मोबाईलचे दुकान उघडल्याने पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना 23 जूनला ताब्यात घेतले होते. या पितापुत्राला नंतर पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र, उपचार चालू असताना दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांचा कोठडीत छळ केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि कुटुंबियांनी केला आहे.

याप्रकरणी राज्यातील वातावरण पेटले असून पोलीसांच्या छळाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. यासंबधी दोन पोलीस उपनिरिक्षकासह चौघांना निलंबितही करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.