ETV Bharat / bharat

पुलवामा हल्ला हा भाजपचा 'गोध्रा'सारखाच पूर्वनियोजित 'कट'; या नेत्याने केला गंभीर आरोप

'भाजपचे गुजरात मॉडेल फसले आहे. राज्याला याचा त्रास भोगावा लागत आहे. पक्षातील भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्यात कामाला बांधील असलेले कामगार बनल्याची भावना निर्माण झाली आहे,' असे म्हणत वाघेला यांनी भाजपवर निशाणा साधला.

author img

By

Published : May 2, 2019, 11:48 AM IST

शंकरसिंह वाघेला

अहमदाबाद - पुलवामा हल्ला हा भाजपचा 'गोध्रा'सारखाच 'कट' होता, असे वादग्रस्त वक्तव्य गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केले आहे. 'पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सने भरलेल्या वाहनाच्या नोंदणीमध्ये सुरुवातीचा अक्षरे 'GJ' म्हणजे गुजरात अशी होती. 'गोध्रा' हाही कट होता,' असे वाघेला यांनी म्हटले आहे. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


'भाजप सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी दहशतवादाचा वापर केला आहे. मागील ५ वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये कोणीही ठार झाले नाही. कोणतीही आंतरराष्ट्रीय संस्थादेखील २०० दहशतवादी मारले गेल्याचा पुरावा देऊ शकली नाही. बालाकोट एअर स्ट्राईक हाही पूर्वनियोजित कट होता. हे घडणारच होते,' असे वाघेला म्हणाले.


'गुप्तहेर यंत्रणांकडून पुलवामा हल्ल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तुमच्याकडे बालाकोट येथील दहशतवादी तळांची माहिती होती. मग तुम्ही त्यावर आधीच कारवाई का केली नाही? पुलवामासारखी घटना घडण्याची वाट का पाहिली,' असा सवाल त्यांनी केला आहे. 'हा सर्व प्रकारात भाजपचा हात आहे. यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी जातीय दंगली घडवून आणल्या जातील.


'भाजपचे गुजरात मॉडेल फसले आहे. राज्याला याचा त्रास भोगावा लागत आहे. पक्षातील भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्यात कामाला बांधील असलेले कामगार बनल्याची भावना निर्माण झाली आहे,' असे म्हणत वाघेला यांनी भाजपवर निशाणा साधला.


गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा असून येथे २३ एप्रिलला मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होईल.

अहमदाबाद - पुलवामा हल्ला हा भाजपचा 'गोध्रा'सारखाच 'कट' होता, असे वादग्रस्त वक्तव्य गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केले आहे. 'पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सने भरलेल्या वाहनाच्या नोंदणीमध्ये सुरुवातीचा अक्षरे 'GJ' म्हणजे गुजरात अशी होती. 'गोध्रा' हाही कट होता,' असे वाघेला यांनी म्हटले आहे. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


'भाजप सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी दहशतवादाचा वापर केला आहे. मागील ५ वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये कोणीही ठार झाले नाही. कोणतीही आंतरराष्ट्रीय संस्थादेखील २०० दहशतवादी मारले गेल्याचा पुरावा देऊ शकली नाही. बालाकोट एअर स्ट्राईक हाही पूर्वनियोजित कट होता. हे घडणारच होते,' असे वाघेला म्हणाले.


'गुप्तहेर यंत्रणांकडून पुलवामा हल्ल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तुमच्याकडे बालाकोट येथील दहशतवादी तळांची माहिती होती. मग तुम्ही त्यावर आधीच कारवाई का केली नाही? पुलवामासारखी घटना घडण्याची वाट का पाहिली,' असा सवाल त्यांनी केला आहे. 'हा सर्व प्रकारात भाजपचा हात आहे. यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी जातीय दंगली घडवून आणल्या जातील.


'भाजपचे गुजरात मॉडेल फसले आहे. राज्याला याचा त्रास भोगावा लागत आहे. पक्षातील भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्यात कामाला बांधील असलेले कामगार बनल्याची भावना निर्माण झाली आहे,' असे म्हणत वाघेला यांनी भाजपवर निशाणा साधला.


गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा असून येथे २३ एप्रिलला मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होईल.

Intro:Body:

pulwama attack, bjp, conspiracy, godhra, shankersinh vaghela


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.