ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक : चिरागसंदर्भातल्या भाजपच्या 'त्या' विधानावर पप्पू यादव यांची टीका

author img

By

Published : Oct 20, 2020, 5:50 PM IST

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी चिराग पासवान यांच्यावर एनडीएची युती तोडण्याविषयी भाष्य केले होते.

pappu yadav
जन अधिकार पक्षाचे संरक्षक पप्पू यादव

पटना - बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी चिराग पासवान यांच्यावर एनडीएची युती तोडण्याविषयी भाष्य केले होते. यानंतर भाजपचे सर्वच ज्येष्ठ नेते सातत्याने एलजेपी अध्यक्षांवर टीका करत आहेत. चिरागबाबत भाजप नेत्यांचे विधान दुर्दैवी असल्याचे जन अधिकार पक्षाचे संरक्षक पप्पू यादव यांनी म्हटले आहे.

जन अधिकार पक्षाचे संरक्षक पप्पू यादव

जन अधिकार पक्षाचे संरक्षक पप्पू यादव म्हणाले की, सध्याची परिस्थिती अतिशय विचित्र आहे. ते म्हणाले की, अशा परिस्थितीत भाजपाने चिराग पासवानची साथ सोडली आहे, ही फार वाईट गोष्ट आहे. चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांना प्रश्न विचारले होते. यावर आपच्या नेत्याने सांगितले की, चिरागने कोणतेही चुकीचे केले नाही. तसेच पप्पू यादव यांनी लालू यादव आणि नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

पटना - बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी चिराग पासवान यांच्यावर एनडीएची युती तोडण्याविषयी भाष्य केले होते. यानंतर भाजपचे सर्वच ज्येष्ठ नेते सातत्याने एलजेपी अध्यक्षांवर टीका करत आहेत. चिरागबाबत भाजप नेत्यांचे विधान दुर्दैवी असल्याचे जन अधिकार पक्षाचे संरक्षक पप्पू यादव यांनी म्हटले आहे.

जन अधिकार पक्षाचे संरक्षक पप्पू यादव

जन अधिकार पक्षाचे संरक्षक पप्पू यादव म्हणाले की, सध्याची परिस्थिती अतिशय विचित्र आहे. ते म्हणाले की, अशा परिस्थितीत भाजपाने चिराग पासवानची साथ सोडली आहे, ही फार वाईट गोष्ट आहे. चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांना प्रश्न विचारले होते. यावर आपच्या नेत्याने सांगितले की, चिरागने कोणतेही चुकीचे केले नाही. तसेच पप्पू यादव यांनी लालू यादव आणि नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.