ETV Bharat / bharat

हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर पाक बिथरला, भारताला चोख प्रत्युत्तर देण्याच्या वल्गना - Balkot

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने भारताला धमकी दिली आहे. तुम्ही पाकिस्तानला चेतवले. योग्य वेळी तुमच्याच जागेवर चोख प्रत्युत्तर दिले जाणार, अशा शब्दात त्यांनी धमकी दिली आहे.

पाकिस्तान पंतप्रधानांची बैठक
author img

By

Published : Feb 26, 2019, 9:20 PM IST

इस्लामाबाद - भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानात मोठी तारांबळ उडालेली दिसत आहे. हल्ल्याची गंभीरता लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने तत्काळ संयुक्त संसदीय सत्र बोलावले आहे. तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. भारताला योग्य वेळी त्यांच्याच धर्तीवर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकीही पाकने दिली आहे.

पाकिस्तान पंतप्रधानांची बैठक
पाकिस्तान पंतप्रधानांची बैठक

पाक साखर झोपेत असतानाच भारताने पाकवर हवाई हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडालेली दिसते. भारताच्या वतीने कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही, असे पाक म्हणत असला तरी पाकच्या पंतप्रधानांनी तत्काळ लष्कर प्रमुखांसोबत बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचा समावेश होता.

आपण जनतेची दिशाभूल करणार नाही. मात्र, पाकिस्तानवर युद्धाचे सावट आहेत. त्यामुळे सीमाक्षेत्रात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने भारताला धमकी दिली आहे. तुम्ही पाकिस्तानला चेतवले. योग्य वेळी तुमच्याच जागेवर चोख प्रत्युत्तर दिले जाणार, अशा शब्दात त्यांनी धमकी दिली आहे.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी संयुक्त संसदीय सत्र बोलावले आहे. यामध्ये पाकिस्तानचे विरोधी पक्ष सरकार सोबत बसून हल्ल्यावर मंथन करतील, असे सुत्रांचे म्हणणे आहे. संपूर्ण देश यावेळी एकसंघ आहे. आमचे राजकीय दृष्टीकोण वेगळे असले तरी आम्ही देशाच्या नात्याने एक आहोत. देशासाठी काय पाऊल उचलावे हे आम्ही संयुक्त रित्या बसून ठरवणार, असे पाकिस्ताप पिपल्स पक्षाचे नेते खुर्शीद शहा यांनी म्हटले आहे.

undefined

इस्लामाबाद - भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानात मोठी तारांबळ उडालेली दिसत आहे. हल्ल्याची गंभीरता लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने तत्काळ संयुक्त संसदीय सत्र बोलावले आहे. तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. भारताला योग्य वेळी त्यांच्याच धर्तीवर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकीही पाकने दिली आहे.

पाकिस्तान पंतप्रधानांची बैठक
पाकिस्तान पंतप्रधानांची बैठक

पाक साखर झोपेत असतानाच भारताने पाकवर हवाई हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडालेली दिसते. भारताच्या वतीने कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही, असे पाक म्हणत असला तरी पाकच्या पंतप्रधानांनी तत्काळ लष्कर प्रमुखांसोबत बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचा समावेश होता.

आपण जनतेची दिशाभूल करणार नाही. मात्र, पाकिस्तानवर युद्धाचे सावट आहेत. त्यामुळे सीमाक्षेत्रात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने भारताला धमकी दिली आहे. तुम्ही पाकिस्तानला चेतवले. योग्य वेळी तुमच्याच जागेवर चोख प्रत्युत्तर दिले जाणार, अशा शब्दात त्यांनी धमकी दिली आहे.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी संयुक्त संसदीय सत्र बोलावले आहे. यामध्ये पाकिस्तानचे विरोधी पक्ष सरकार सोबत बसून हल्ल्यावर मंथन करतील, असे सुत्रांचे म्हणणे आहे. संपूर्ण देश यावेळी एकसंघ आहे. आमचे राजकीय दृष्टीकोण वेगळे असले तरी आम्ही देशाच्या नात्याने एक आहोत. देशासाठी काय पाऊल उचलावे हे आम्ही संयुक्त रित्या बसून ठरवणार, असे पाकिस्ताप पिपल्स पक्षाचे नेते खुर्शीद शहा यांनी म्हटले आहे.

undefined
Intro:Body:

VIDEO: अक्षय कुमारच्या 'केसरी'चा दमदार टीजर प्रदर्शित



मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार लवकरच 'केसरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. अशात आता या चित्रपटातील खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीजर प्रदर्शित झाला आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर हा टीजर शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओला 'अविश्वसनीय सत्य कथा', असे कॅप्शन दिले आहे. या टीजरमध्ये युद्धासाठी तयार असलेल्या सैन्याचा जोश पाहायला मिळत आहे.  



'केसरी' हा चित्रपट सारागढीच्या लढाईवर आधारित आहे. १२२ वर्षांपूर्वी २१ शीख सैनिकांवर सुमारे १० हजार अफगाणांनी हल्ला केला. यावेळी शिखांनी हार पत्करण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. याच कारणास्तव काही लष्करी इतिहासकारांनी या लढाईला इतिहासातील सर्वात महान लढ्याची उपमा दिली आहे. यावरच चित्रपटाची कथा आधारित असणार असल्याचे अक्षयने म्हटले आहे. २१ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.