ETV Bharat / bharat

बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमारच, अमित शाहांचा दावा

author img

By

Published : Oct 18, 2020, 7:50 AM IST

' बिहार निवडणुकीत जर तर चा प्रश्नच नाही. नितीश कुमार हे बिहारचे पुढील मुख्यमंत्री असणार आहेत. आम्ही ही जाहीर घोषणा केली असून त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे अमित शाह म्हणाले.

Amit Shah
अमित शाह

नवी दिल्ली - बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रीय लोकशाही(एनडीए) आघाडी आणि महागठबंधनकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, बिहारचे पुढील मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

एनडीएला दोन तृतीयांश मते मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'या निवडणुकीत जर तर चा प्रश्नच नाही. नितीश कुमार हे बिहारचे पुढील मुख्यमंत्री असणार आहेत. आम्ही ही जाहीर घोषणा केली असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाह बोलत होते.

बिहारच्या जनतेला दोन इंजिन असलेले सरकार मिळणार आहे. यातील एक म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दुसरे केंद्रात पंतप्रधान मोदीचे नेतृत्व राज्याला मिळणार आहे. बिहारमध्ये २४३ लोकसभा जागांसाठी २८ नोव्हेंबरपासून तीन टप्प्यात मतदान होणार असून १० नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

महागठबंधनमध्ये लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्विनी यादव नेतृत्व करत आहेत. ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असून काँग्रेस या आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत(एनडीए) भाजप, आरजेडी आणि इतर छोटे पक्ष आहेत. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान स्वबळावर निवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्या एलजेपी पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नितीश कुमारांचे नेतृत्व नाकारले.

नवी दिल्ली - बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रीय लोकशाही(एनडीए) आघाडी आणि महागठबंधनकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, बिहारचे पुढील मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

एनडीएला दोन तृतीयांश मते मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'या निवडणुकीत जर तर चा प्रश्नच नाही. नितीश कुमार हे बिहारचे पुढील मुख्यमंत्री असणार आहेत. आम्ही ही जाहीर घोषणा केली असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाह बोलत होते.

बिहारच्या जनतेला दोन इंजिन असलेले सरकार मिळणार आहे. यातील एक म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दुसरे केंद्रात पंतप्रधान मोदीचे नेतृत्व राज्याला मिळणार आहे. बिहारमध्ये २४३ लोकसभा जागांसाठी २८ नोव्हेंबरपासून तीन टप्प्यात मतदान होणार असून १० नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

महागठबंधनमध्ये लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्विनी यादव नेतृत्व करत आहेत. ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असून काँग्रेस या आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत(एनडीए) भाजप, आरजेडी आणि इतर छोटे पक्ष आहेत. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान स्वबळावर निवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्या एलजेपी पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नितीश कुमारांचे नेतृत्व नाकारले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.