ETV Bharat / bharat

'महिलांवरील अत्याचार थांबववण्यासाठी कडक कायदे करा'

author img

By

Published : Feb 4, 2020, 4:49 PM IST

Updated : Feb 4, 2020, 5:57 PM IST

महिलांनी अत्याचार किती काळ सहन करायचा. जर हे अत्याचार बंद करायचे असतील तर अतिशयकडक कायदे केले पाहिजे, अशी मागणी खासदार राणा यांनी लोकसभेत केली.

FILE PIC NAVNEET RANA
खासदार नवनीत राणा

नवी दिल्ली - वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर खासदार नवनीत राणा यांनी आज (मंगळवारी) संसदेत प्रश्न उपस्थित केला. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलायला हवीत, असे त्या म्हणाल्या.

महिलांनी अत्याचार किती काळ सहन करायचा. जर हे अत्याचार बंद करायचे असतील तर अतिशयकडक कायदे केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. महिलांवर अत्याचार प्रकरणात जलद न्याय मिळत नाही. फक्त तारखेवर तारखा मिळतात, असे म्हणत त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.

खासदार नवनीत राणा लोकसभेत बोलताना
वर्ध्यातील हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेत पीडिता गंभीररीत्या जखमी झाली, तिचा चेहरा पूर्णपणे भाजला असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. 'या जगण्याला आता काही अर्थ उरला नाही' मी जगून काय करू, असे पीडितेने म्हटल्याचे तिच्या आईने सांगितले. आरोपी विक्की नगराळे हा तिला वारंवार त्रास द्यायचा. ही बाब पीडितेने ३ महिन्याआधी आई-वडिलांना सांगितली होती. यानंतर, तिच्या वडिलांनी विकीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही आरोपी हा पीडितेला सतत त्रास द्यायचा. यातच सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. दरम्यान तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकण्यात आला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.दरम्यान, काहींनी तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवत तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले. पुढील उपचाराकरता तिला नागपूर येथे हलवण्यात आले. या हल्ल्यामध्ये पीडिता सुमारे ३५ टक्के भाजली आहे. यामध्ये तिचा चेहरा, डोळे आणि मान गंभीररित्या भाजले गेले आहेत. पीडितेची वाचा जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढे कदाचित तिची दृष्टीही जाऊ शकते, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर खासदार नवनीत राणा यांनी आज (मंगळवारी) संसदेत प्रश्न उपस्थित केला. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलायला हवीत, असे त्या म्हणाल्या.

महिलांनी अत्याचार किती काळ सहन करायचा. जर हे अत्याचार बंद करायचे असतील तर अतिशयकडक कायदे केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. महिलांवर अत्याचार प्रकरणात जलद न्याय मिळत नाही. फक्त तारखेवर तारखा मिळतात, असे म्हणत त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.

खासदार नवनीत राणा लोकसभेत बोलताना
वर्ध्यातील हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेत पीडिता गंभीररीत्या जखमी झाली, तिचा चेहरा पूर्णपणे भाजला असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. 'या जगण्याला आता काही अर्थ उरला नाही' मी जगून काय करू, असे पीडितेने म्हटल्याचे तिच्या आईने सांगितले. आरोपी विक्की नगराळे हा तिला वारंवार त्रास द्यायचा. ही बाब पीडितेने ३ महिन्याआधी आई-वडिलांना सांगितली होती. यानंतर, तिच्या वडिलांनी विकीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही आरोपी हा पीडितेला सतत त्रास द्यायचा. यातच सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. दरम्यान तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकण्यात आला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.दरम्यान, काहींनी तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवत तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले. पुढील उपचाराकरता तिला नागपूर येथे हलवण्यात आले. या हल्ल्यामध्ये पीडिता सुमारे ३५ टक्के भाजली आहे. यामध्ये तिचा चेहरा, डोळे आणि मान गंभीररित्या भाजले गेले आहेत. पीडितेची वाचा जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढे कदाचित तिची दृष्टीही जाऊ शकते, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
Intro:Body:

'महिलांवरील अत्याचार थांबववण्यासाठी कडक कायदे करा'

नवी दिल्ली - वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. महिलांवर होणाऱया अत्याचारांवर खासदार नवनीत राणा यांनी आज(मंगळवारी) संसदेत प्रश्न उपस्थित केला. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलायला हवीत, असे त्या म्हणाल्या.

महिलांनी अत्याचार किती काळ सहन करायचा. जर हे अत्याचार बंद करायचे असतील तर अतिशयकडक कायदे केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. महिलांवर अत्याचार प्रकरणात जलद न्याय मिळत नाही. फक्त तारखेवर तारखा मिळतात, असे म्हणत त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.  

वर्ध्यातील हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेत पीडिता गंभीररीत्या जखमी झाली, तिचा चेहरा पूर्णपणे भाजला असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. 'या जगण्याला आता काही अर्थ उरला नाही' मी जगून काय करू, असे पीडितेने म्हटल्याचे तिच्या आईने सांगितले.  

 आरोपी विक्की नगराळे हा तिला वारंवार त्रास द्यायचा. ही बाब पीडितेने ३ महिन्याआधी आई-वडिलांना सांगितली होती. यानंतर, तिच्या वडिलांनी विकीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही आरोपी हा पीडितेला सतत त्रास द्यायचा. यातच सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. दरम्यान तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकण्यात आला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.

दरम्यान, काहींनी तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवत तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले. पुढील उपचाराकरता तिला नागपूर येथे हलवण्यात आले. या हल्ल्यामध्ये पीडिता सुमारे ३५ टक्के भाजली आहे. यामध्ये तिचा चेहरा, डोळे आणि मान गंभीररित्या भाजले गेले आहेत. पीडितेची वाचा जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढे कदाचित तिची दृष्टीही जाऊ शकते, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.