ETV Bharat / bharat

'जेव्हा देशात कोरोना पसरत होता तेव्हा तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त होता'

author img

By

Published : Sep 20, 2020, 9:51 PM IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज (रविवारी) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोना महासंकटावरील चर्चेदरम्यान केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

mp dr. amol kolhe in loksabha
खासदार डॉ. अमोल कोल्हे

नवी दिल्ली - 'जेव्हा देशात कोरोना पसरत होता तेव्हा तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त होता', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी खासदार डॉ. कोल्हे कोरोना महासंकटावरील चर्चेवर लोकसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे लोकसभेत बोलताना.

ते म्हणाले, देशात 30 जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, आज 9 महिन्यांनंतर काय परिस्थिती आहे? सरकार स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. मृत्यू दरात घट झाली आहे. यासाठी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र, या आकडेवारीच्या मागे 90 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले, या वास्तविकतेला आपण अस्विकार करू शकणार नाही. विशेष म्हणजे या 90 हजार मृत्यूंमध्ये अनाथ, लॉकडाऊन काळात रस्त्यावर पायी चालणाऱ्या प्रवासी मजूर, उद्योगधंद्यांचे नुकसान झाल्यामुळे परिवाराने केलेली सामूहिक आत्महत्या अशा मृत्यूंचा समावेश नाही आहे.

हेही वाचा - 'सरकारच्या एकाही मंत्र्यांमध्ये 'मोदी तुम्ही चुकताय,' असं सांगण्याची हिंमत नाही!'

जेव्हा कोरोना देशात आपले हात-पाय पसरवत होता तेव्हा आपले पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या स्वागतात व्यस्त होते. जेव्हा देशातील आरोग्य व्यवस्था सांभाळायची गरज होती, तेव्हा आपण बिगर भाजपशासित राज्यांमधील सरकारे पाडण्यात व्यस्त होते, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. तसेच याचाच परिणाम आज संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे. जर दुरदृष्टीने आपण सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर कोरोना टेस्ट केली असती, तर आज ही वेळ आली नसती, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

नवी दिल्ली - 'जेव्हा देशात कोरोना पसरत होता तेव्हा तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त होता', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी खासदार डॉ. कोल्हे कोरोना महासंकटावरील चर्चेवर लोकसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे लोकसभेत बोलताना.

ते म्हणाले, देशात 30 जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, आज 9 महिन्यांनंतर काय परिस्थिती आहे? सरकार स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. मृत्यू दरात घट झाली आहे. यासाठी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र, या आकडेवारीच्या मागे 90 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले, या वास्तविकतेला आपण अस्विकार करू शकणार नाही. विशेष म्हणजे या 90 हजार मृत्यूंमध्ये अनाथ, लॉकडाऊन काळात रस्त्यावर पायी चालणाऱ्या प्रवासी मजूर, उद्योगधंद्यांचे नुकसान झाल्यामुळे परिवाराने केलेली सामूहिक आत्महत्या अशा मृत्यूंचा समावेश नाही आहे.

हेही वाचा - 'सरकारच्या एकाही मंत्र्यांमध्ये 'मोदी तुम्ही चुकताय,' असं सांगण्याची हिंमत नाही!'

जेव्हा कोरोना देशात आपले हात-पाय पसरवत होता तेव्हा आपले पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या स्वागतात व्यस्त होते. जेव्हा देशातील आरोग्य व्यवस्था सांभाळायची गरज होती, तेव्हा आपण बिगर भाजपशासित राज्यांमधील सरकारे पाडण्यात व्यस्त होते, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. तसेच याचाच परिणाम आज संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे. जर दुरदृष्टीने आपण सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर कोरोना टेस्ट केली असती, तर आज ही वेळ आली नसती, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.