ETV Bharat / bharat

AyodhyaVerdict: अयोध्या निकालावरून माहिती प्रसारण मंत्रालयाने जारी केली नियमावली

अयोध्या विवादीत जमिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवारी) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर देशामध्ये कायदा सुव्यवस्था रहावी म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाने सर्व वाहिन्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

author img

By

Published : Nov 9, 2019, 3:47 PM IST

बैठक

नवी दिल्ली - अयोध्या विवादीत जमिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज(शनिवारी) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर देशामध्ये कायदा सुव्यवस्था रहावी म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाने सर्व वाहिन्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. वृत्तांकन करताना कार्यक्रमाच्या नियमावलींचे (प्रोग्राम कोड ) उल्लंघन होऊ नये, म्हणून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

सर्व वाहिन्यांनी चर्चा आणि वादविवाद कार्यक्रमांमध्ये नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. अयोध्या निकालाच्या बातम्या देताना वाहिन्यांनी खबरदारी बाळगावी, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

सोशल मीडियावरही पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. कोणीही भडकाऊ वक्तव्य करु नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

नवी दिल्ली - अयोध्या विवादीत जमिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज(शनिवारी) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर देशामध्ये कायदा सुव्यवस्था रहावी म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाने सर्व वाहिन्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. वृत्तांकन करताना कार्यक्रमाच्या नियमावलींचे (प्रोग्राम कोड ) उल्लंघन होऊ नये, म्हणून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

सर्व वाहिन्यांनी चर्चा आणि वादविवाद कार्यक्रमांमध्ये नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. अयोध्या निकालाच्या बातम्या देताना वाहिन्यांनी खबरदारी बाळगावी, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

सोशल मीडियावरही पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. कोणीही भडकाऊ वक्तव्य करु नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

Intro:Body:

Ayodhya Judgment: 'निकाल जय पराजयाच्या भावनेतून पाहू नये, रामरहीम भक्तिपेक्षा भारतभक्तीची वेळ - पंतप्रधान  





 



नवी दिल्ली - अयोध्या बाबरी मशिद जमिन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालाकडे जय पराजयाच्या भावनेतून कोणीही पाहू नये, राम भक्ति असो किंवा रहीम भक्ती असो, ही वेळ भारतभक्तीला आणखी मजबूत करण्याची आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.  

शांती, एकता आणि सद्भावना राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.  हा निकाल अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचा असल्याचे मोदींनी म्हटले आहे. कोणताही वाद सोडवताना कायदेशिर प्रक्रियेचे पालन महत्वाचे असते. प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. न्यायमंदिरामध्ये शांतातापूर्ण मार्गाने अनेक शतकांपासून चालू असलेल्या वादाचे निराकरण झाले. हा निर्णय नागरिकांमध्ये न्यायाव्यवस्थेबद्दल विश्वास आणखी मजबूत करणारा आहे, असे मोदी म्हणाले.

हजारो वर्षांपासून देशामध्ये बंधुभावाची भावना आहे. त्यानुसार १३० कोटी भारतीयांना शांती आणि संयमाचे दर्शन घडवावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.