ETV Bharat / bharat

महात्मा गांधी : एक व्यावहारिक आदर्शवादी

author img

By

Published : Aug 26, 2019, 5:10 AM IST

Updated : Aug 26, 2019, 9:03 AM IST

गांधीजींचा आदर्शवाद आणि गांधीवादाबद्दल खुद्द गांधींंचे मत. तसेच, राजकारण आणि अर्थकारणाबद्दलची त्यांची मते या सर्व गोष्टींबद्दलचा, प्रा. ए. प्रसन्न कुमार यांचा हा लेख आहे. महात्मा गांधी एक व्यावहारिक आदर्शवादी होते. त्यांनी जेव्हा कधी एखादा उपदेश केला, तेव्हा आधी तो स्वतः आचरणात आणला. त्यांची १५०वी जयंती ही त्यांच्या कार्याचा अभ्यास करण्याची आणि त्यांच्या उपदेशांना, त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याची एक चांगली संधी आहे.

Mahatma gandhi the practical idealist

विशाखापट्टणम - महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, "मी एक व्यावहारिक आदर्शवादी आहे". आयुष्यातील अडचणींकडून कशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या हे सांगताना गांधीजी म्हणतात, “माझ्याकडे जगाला सांगण्यासाठी नवीन असे काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या गोष्टी या जगाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहेत.” त्यामुळेच, मानवजातीकरिता त्यांनी काही नवीन तत्त्वज्ञान किंवा नवा संदेश दिला आहे असे ते मानत नव्हते. सत्याच्या शोधामध्ये, त्यांना आलेल्या अनुभवातून तसेच चुकांमधूनदेखील ते बऱ्याच गोष्टी शिकले. सत्य आणि अहिंसा हे नेहमीच त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य सिद्धांत राहिले आहेत. मात्र, एका जैन द्रष्ट्यासोबत चर्चा करताना गांधीजींनी हे मान्य केले आहे, की ते पूर्णपणे सत्यवादी असल्याची खात्री देऊ शकतात, मात्र अहिंसावादी असल्याची नाही. महात्मा गांधी म्हणतात, "सत्याहून मोठा कोणताच धर्म नाही, आणि अहिंसेहून मोठे कर्तव्य नाही".

त्यांच्या अनुयायांनी आणि समर्थकांनी त्यांच्या विचारांना 'गांधीवाद' म्हणू नये, असे गांधीजींचे मत होते. त्यांना तसे करण्यापासून सावध करताना गांधीजी म्हणतात, गांधीवाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. मला माझ्या मागे कोणताही पंथ सोडून जायचे नाही. माझ्या विचारांचा प्रसार करण्याची गरज नाही. याबाबत कोणतेही साहित्य असण्याची आवश्यकता नाही. माझ्या विचारसरणीमध्ये, सत्यामध्ये ज्यांना विश्वास आहे, ते त्यानुसार आपले जीवन जगून त्या विचारांचा प्रसार करू शकतात. योग्य क्रियेचा आपसूकच प्रसार होत जातो. रोनाल्ड डंकन गांधींबद्दल लिहितात, की गांधीजी हे अगदी व्यावहारिक व्यक्ती होते. ते नेहमी एखादी गोष्ट इतरांना सांगण्याआधी स्वतःच्या जीवनात आचरणात आणत.

सत्याग्रह असो किंवा सर्वोदय, सत्य असो किंवा अहिंसा - त्यांनी मांडलेले प्रत्येक विचार हे त्यांच्या मनाच्या प्रयोगशाळेत पारखलेले असत. त्यांच्यासाठी विज्ञानही धर्माइतकेच महत्वाचे होते. या दोन्हींमध्ये कोणताही संघर्ष नव्हता. त्यांच्या अध्यात्मामध्ये विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानाचा समान समावेश होता. सत्याग्रहाने जर मानवी विचारांचे उदात्तीकरण होते, तर सर्वोदय हे सर्व लोकांना- श्रीमंत असो वा गरीब, मालक असो वा कामगार, उच्च असो वा नीच- सर्वांना एकत्र आणते.

सर्व समस्यांचे मूळ असलेल्या मानवी मनाला आवर घालणे गरजेचे आहे. मानवी मन, हे एका चंचल पक्षाप्रमाणे असते. त्याला जेवढे द्याल, तितकेच जास्त ते मागत जाते, आणि तरीही असमाधानी राहते. साधे आणि तरीही अर्थपूर्ण असे जीवन तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मन हे स्थिर असेल. संयमाशिवाय परिपूर्णता मिळू शकत नाही.

राजकारण आणि अर्थकारण हे मानवी प्रगतीसाठी आवश्यक आहेत. राजकारण हे कायमचे निषिद्ध असू शकत नाही. सत्तेचे राजकारण टाळायला हवे, मात्र सेवेचे राजकारण मात्र केले पाहिजे. धर्माशिवाय राजकारण म्हणजे घाणच होय. इथे धर्म म्हणजे गांधीना तत्वे म्हणायचे आहे. खरे अर्थकारण हे सामाजिक न्यायाला चालना देते. ते सर्वांच्या समान विकासाला प्रोत्साहन देते. आणि ते सभ्य जीवनासाठी अपरिहार्य आहे. राजकारण आणि अर्थकारणाचा उद्देश हा बहुसंख्यांक लोकांचे, किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाचे कल्याण करणे नाही तर, समाजातील सर्वांचे कल्याण हाच आहे.

विरोधाभासाच्या या जगात, गांधीजींनी हे कबूल केले आहे, की ते स्वतःच एक मोठा विरोधाभास आहेत. आधुनिक दृष्टीकोन बाळगणारा एक माणूस, फक्त कंबरेला एक कापड गुंडाळून आणि सोबत एक चरखा घेऊन फिरत असे. त्यांची वेदना, दुःख आणि अपमान सहन करण्याची क्षमता ही अतुलनीय होती. त्यामुळेच अगदी आईनस्टाईनने देखील त्यांना 'मानवी चमत्कार' म्हटले आहे. गांधीजींकडे स्वतःवर हसण्याचे विलक्षण कौशल्य होते. आपल्या चरख्याचा संदर्भ देत ते एकदा म्हणाले, "माझ्या चरख्यावर लोक खूपदा हसले आहेत. एका टीकाकाराने तर असेही म्हटले, की माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेसाठी हाच चरखा कामी येईल. मात्र, यामुळे माझा चरख्यावरील विश्वास कमी होणार नाही". एवढ्यावरच न थांबता ते म्हणाले, "मी जर माझ्या लोकांना खादी आणि ग्रामोद्योगांशिवाय पूर्ण रोजगार देऊ शकलो, तर मी माझे हे सर्व कार्य थांबवायला तयार आहे". गांधीजींच्या हत्येनंतर तीन वर्षांनी, आचार्य विनोबा भावे म्हणाले, की "जर राज्य सरकार रोजगारच्या इतर संधी उपलब्ध करु शकले, तर मी हा लाकडी चरखा जाळून त्यावर स्वयंपाक करण्यास जराही कचरणार नाही".

गांधी हे मशीन किंवा आधुनिकीकरणाच्या विरोधात नव्हते. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधारणाऱ्या आणि सर्व लोकांच्या फायद्यासाठी असलेल्या कोणत्याही मशीनला त्यांनी समर्थन आणि बक्षीसदेखील दिले असते. त्यांचा विरोध मात्र फक्त मशीनींच्या अती वापराला, आणि त्याचा वापर करून, लाखो लोकांना उपाशी ठेऊन काही मोजक्या लोकांनी संपत्ती जमा करण्याला होता.

त्यांनी जेव्हा कधी एखादा उपदेश केला, तेव्हा आधी तो स्वतः आचरणात आणला. त्यांची १५०वी जयंती ही त्यांच्या कार्याचा अभ्यास करण्याची, आणि त्यांच्या उपदेशांना, त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याची एक चांगली संधी आहे.

विशाखापट्टणम - महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, "मी एक व्यावहारिक आदर्शवादी आहे". आयुष्यातील अडचणींकडून कशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या हे सांगताना गांधीजी म्हणतात, “माझ्याकडे जगाला सांगण्यासाठी नवीन असे काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या गोष्टी या जगाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहेत.” त्यामुळेच, मानवजातीकरिता त्यांनी काही नवीन तत्त्वज्ञान किंवा नवा संदेश दिला आहे असे ते मानत नव्हते. सत्याच्या शोधामध्ये, त्यांना आलेल्या अनुभवातून तसेच चुकांमधूनदेखील ते बऱ्याच गोष्टी शिकले. सत्य आणि अहिंसा हे नेहमीच त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य सिद्धांत राहिले आहेत. मात्र, एका जैन द्रष्ट्यासोबत चर्चा करताना गांधीजींनी हे मान्य केले आहे, की ते पूर्णपणे सत्यवादी असल्याची खात्री देऊ शकतात, मात्र अहिंसावादी असल्याची नाही. महात्मा गांधी म्हणतात, "सत्याहून मोठा कोणताच धर्म नाही, आणि अहिंसेहून मोठे कर्तव्य नाही".

त्यांच्या अनुयायांनी आणि समर्थकांनी त्यांच्या विचारांना 'गांधीवाद' म्हणू नये, असे गांधीजींचे मत होते. त्यांना तसे करण्यापासून सावध करताना गांधीजी म्हणतात, गांधीवाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. मला माझ्या मागे कोणताही पंथ सोडून जायचे नाही. माझ्या विचारांचा प्रसार करण्याची गरज नाही. याबाबत कोणतेही साहित्य असण्याची आवश्यकता नाही. माझ्या विचारसरणीमध्ये, सत्यामध्ये ज्यांना विश्वास आहे, ते त्यानुसार आपले जीवन जगून त्या विचारांचा प्रसार करू शकतात. योग्य क्रियेचा आपसूकच प्रसार होत जातो. रोनाल्ड डंकन गांधींबद्दल लिहितात, की गांधीजी हे अगदी व्यावहारिक व्यक्ती होते. ते नेहमी एखादी गोष्ट इतरांना सांगण्याआधी स्वतःच्या जीवनात आचरणात आणत.

सत्याग्रह असो किंवा सर्वोदय, सत्य असो किंवा अहिंसा - त्यांनी मांडलेले प्रत्येक विचार हे त्यांच्या मनाच्या प्रयोगशाळेत पारखलेले असत. त्यांच्यासाठी विज्ञानही धर्माइतकेच महत्वाचे होते. या दोन्हींमध्ये कोणताही संघर्ष नव्हता. त्यांच्या अध्यात्मामध्ये विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानाचा समान समावेश होता. सत्याग्रहाने जर मानवी विचारांचे उदात्तीकरण होते, तर सर्वोदय हे सर्व लोकांना- श्रीमंत असो वा गरीब, मालक असो वा कामगार, उच्च असो वा नीच- सर्वांना एकत्र आणते.

सर्व समस्यांचे मूळ असलेल्या मानवी मनाला आवर घालणे गरजेचे आहे. मानवी मन, हे एका चंचल पक्षाप्रमाणे असते. त्याला जेवढे द्याल, तितकेच जास्त ते मागत जाते, आणि तरीही असमाधानी राहते. साधे आणि तरीही अर्थपूर्ण असे जीवन तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मन हे स्थिर असेल. संयमाशिवाय परिपूर्णता मिळू शकत नाही.

राजकारण आणि अर्थकारण हे मानवी प्रगतीसाठी आवश्यक आहेत. राजकारण हे कायमचे निषिद्ध असू शकत नाही. सत्तेचे राजकारण टाळायला हवे, मात्र सेवेचे राजकारण मात्र केले पाहिजे. धर्माशिवाय राजकारण म्हणजे घाणच होय. इथे धर्म म्हणजे गांधीना तत्वे म्हणायचे आहे. खरे अर्थकारण हे सामाजिक न्यायाला चालना देते. ते सर्वांच्या समान विकासाला प्रोत्साहन देते. आणि ते सभ्य जीवनासाठी अपरिहार्य आहे. राजकारण आणि अर्थकारणाचा उद्देश हा बहुसंख्यांक लोकांचे, किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाचे कल्याण करणे नाही तर, समाजातील सर्वांचे कल्याण हाच आहे.

विरोधाभासाच्या या जगात, गांधीजींनी हे कबूल केले आहे, की ते स्वतःच एक मोठा विरोधाभास आहेत. आधुनिक दृष्टीकोन बाळगणारा एक माणूस, फक्त कंबरेला एक कापड गुंडाळून आणि सोबत एक चरखा घेऊन फिरत असे. त्यांची वेदना, दुःख आणि अपमान सहन करण्याची क्षमता ही अतुलनीय होती. त्यामुळेच अगदी आईनस्टाईनने देखील त्यांना 'मानवी चमत्कार' म्हटले आहे. गांधीजींकडे स्वतःवर हसण्याचे विलक्षण कौशल्य होते. आपल्या चरख्याचा संदर्भ देत ते एकदा म्हणाले, "माझ्या चरख्यावर लोक खूपदा हसले आहेत. एका टीकाकाराने तर असेही म्हटले, की माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेसाठी हाच चरखा कामी येईल. मात्र, यामुळे माझा चरख्यावरील विश्वास कमी होणार नाही". एवढ्यावरच न थांबता ते म्हणाले, "मी जर माझ्या लोकांना खादी आणि ग्रामोद्योगांशिवाय पूर्ण रोजगार देऊ शकलो, तर मी माझे हे सर्व कार्य थांबवायला तयार आहे". गांधीजींच्या हत्येनंतर तीन वर्षांनी, आचार्य विनोबा भावे म्हणाले, की "जर राज्य सरकार रोजगारच्या इतर संधी उपलब्ध करु शकले, तर मी हा लाकडी चरखा जाळून त्यावर स्वयंपाक करण्यास जराही कचरणार नाही".

गांधी हे मशीन किंवा आधुनिकीकरणाच्या विरोधात नव्हते. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधारणाऱ्या आणि सर्व लोकांच्या फायद्यासाठी असलेल्या कोणत्याही मशीनला त्यांनी समर्थन आणि बक्षीसदेखील दिले असते. त्यांचा विरोध मात्र फक्त मशीनींच्या अती वापराला, आणि त्याचा वापर करून, लाखो लोकांना उपाशी ठेऊन काही मोजक्या लोकांनी संपत्ती जमा करण्याला होता.

त्यांनी जेव्हा कधी एखादा उपदेश केला, तेव्हा आधी तो स्वतः आचरणात आणला. त्यांची १५०वी जयंती ही त्यांच्या कार्याचा अभ्यास करण्याची, आणि त्यांच्या उपदेशांना, त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याची एक चांगली संधी आहे.

Intro:Body:

Create article


Conclusion:
Last Updated : Aug 26, 2019, 9:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.