ETV Bharat / bharat

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींसह ओमर अब्दुल्लांना अटक

author img

By

Published : Aug 5, 2019, 10:22 PM IST

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींसह ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली आहे.

अब्दुल्लासह मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह मेहबूबा मुफ्ती यांना अटक करण्यात आली आहे. मेहबूबा मुफ्ती यांना शासकीय विश्रामगृहात हलवण्यात आले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.


जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द करण्यात आले आहे. राज्यसभेत ते मंजूर झाले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले होते. विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी रविवारी मुफ्ती आणि ओमर अब्दुला यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना किती काळ कोठडीत ठेवण्यात येईल, याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


'भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा सर्वात काळाकुट्ट दिवस आहे,' अशी जळजळीत प्रतिक्रिया मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. तर भारतीय संघराज्यात सामील होण्याचा जम्मू-काश्मीरच्या नेतृत्वानं १९४७ साली घेतलेल्या निर्णयाचा उलटा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारचा एकतर्फी निर्णय हा बेकायदा व घटनाविरोधी आहे,' असा आरोप मुफ्ती यांनी केला आहे. याचबरोबर 'काश्मीरबद्दल दिलेला शब्द सरकारने पाळला नाही. काश्मीरच्या जनतेला दहशतीखाली ठेवून सरकारला हा प्रदेश हवा आहे. मात्र, हा निर्णय संपूर्ण देशासाठी संकटाला आमंत्रण देणारा ठरेल,' असेही त्या म्हणाल्या.

  • Today marks the darkest day in Indian democracy. Decision of J&K leadership to reject 2 nation theory in 1947 & align with India has backfired. Unilateral decision of GOI to scrap Article 370 is illegal & unconstitutional which will make India an occupational force in J&K.

    — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन होऊन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यसभेच्या आजच्या दिवसाचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह मेहबूबा मुफ्ती यांना अटक करण्यात आली आहे. मेहबूबा मुफ्ती यांना शासकीय विश्रामगृहात हलवण्यात आले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.


जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द करण्यात आले आहे. राज्यसभेत ते मंजूर झाले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले होते. विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी रविवारी मुफ्ती आणि ओमर अब्दुला यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना किती काळ कोठडीत ठेवण्यात येईल, याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


'भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा सर्वात काळाकुट्ट दिवस आहे,' अशी जळजळीत प्रतिक्रिया मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. तर भारतीय संघराज्यात सामील होण्याचा जम्मू-काश्मीरच्या नेतृत्वानं १९४७ साली घेतलेल्या निर्णयाचा उलटा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारचा एकतर्फी निर्णय हा बेकायदा व घटनाविरोधी आहे,' असा आरोप मुफ्ती यांनी केला आहे. याचबरोबर 'काश्मीरबद्दल दिलेला शब्द सरकारने पाळला नाही. काश्मीरच्या जनतेला दहशतीखाली ठेवून सरकारला हा प्रदेश हवा आहे. मात्र, हा निर्णय संपूर्ण देशासाठी संकटाला आमंत्रण देणारा ठरेल,' असेही त्या म्हणाल्या.

  • Today marks the darkest day in Indian democracy. Decision of J&K leadership to reject 2 nation theory in 1947 & align with India has backfired. Unilateral decision of GOI to scrap Article 370 is illegal & unconstitutional which will make India an occupational force in J&K.

    — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन होऊन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यसभेच्या आजच्या दिवसाचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

Intro:नागपूर



३७० कलमा संदर्भात सर संघ चालक आणि सारकार्यवाहकांचं ट्विट; शासनाच्या धाडसी निर्णयाचं केलं स्वागत



सरकारच्या या धाडसी निर्णयाचं माही अगदी मनापासून अभिनंदन करतो. जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशाच्या हितासाठी हे अत्यंत आवश्यक होते.
सर्वांनी स्वतःच्या स्वार्थापेक्षा आणि राजकीय मतभेदांना सोडून पुढे यायला हवं आणि या निर्णयाचं स्वागत तसच समर्थन केल पाहिजे. ”अस ट्विट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्विटर अकाउंट वरुन करण्यात आलंय.आणि या ट्विट खाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचं नाव लिहिल आहे.Body:जम्मू आणि कश्मीर ला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि ३५-अ हे कलम रद्द करण्यात येणार आहेत भाजप सरकार तर्फे घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचं संघा तर्फ़े स्वागत करण्यात आलंय.तसच या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विरोधाला देखील त्यांनी ट्विट करून आव्हान केलं आहे की राजकीय मतभेद दूर सारुन निर्णयाचं स्वागत सर्वांनी करावं

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.