ETV Bharat / bharat

बिहारच्या डीजीपींनी पालिकेच्या भूमिकेबद्दल व्यक्त केली नाराजी

author img

By

Published : Aug 6, 2020, 2:35 PM IST

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेले पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना बीएमसीने जबरदस्तीने क्वारंटाइन केले आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी पालिकेच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत आले असता त्यांना पालिकेने क्वारंटाइन केले आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी पालिकेच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.

'हे चुकीचे आहे. न्यायालयाने विनय तिवारी यांच्याबाबत चौकशी केल्यानंतर पालिका त्यांना क्वारंटाइन मुक्त करेल, अशी आशा होती. मात्र, बीएमसीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर आले नाही. विनय यांना सक्तीने क्वारंटाइनमध्ये ठेवणे म्हणजे नजरकैदत ठेवल्याप्रमाणे आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्यासोबत सल्लामसलत केल्यानंतर काय कारवाई करावी, हे आम्ही ठरवू. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे' असे पांडे म्हणाले.

बिहार पोलीस दलाचे इंस्पेक्स्टर जनरल संजय सिंग यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना क्वारंटाइनमधून सूट देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. मात्र, संजय सिंग यांच्या विनंतीनंतरही पालिकेने तिवारी यांना क्वारंटाइनमधून मुक्त करण्यास नकार दिला आहे.

सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी बिहारमध्ये एफआयआर नोंद झाला आहे. त्याचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विनय तिवारी 2 ऑगस्टला विमानाने मुंबईत आले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईडलाइनप्रमाणे मुंबई महापालिकेने तिवारी यांना होम क्वारंटाइन केले आहे.

नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत आले असता त्यांना पालिकेने क्वारंटाइन केले आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी पालिकेच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.

'हे चुकीचे आहे. न्यायालयाने विनय तिवारी यांच्याबाबत चौकशी केल्यानंतर पालिका त्यांना क्वारंटाइन मुक्त करेल, अशी आशा होती. मात्र, बीएमसीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर आले नाही. विनय यांना सक्तीने क्वारंटाइनमध्ये ठेवणे म्हणजे नजरकैदत ठेवल्याप्रमाणे आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्यासोबत सल्लामसलत केल्यानंतर काय कारवाई करावी, हे आम्ही ठरवू. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे' असे पांडे म्हणाले.

बिहार पोलीस दलाचे इंस्पेक्स्टर जनरल संजय सिंग यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना क्वारंटाइनमधून सूट देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. मात्र, संजय सिंग यांच्या विनंतीनंतरही पालिकेने तिवारी यांना क्वारंटाइनमधून मुक्त करण्यास नकार दिला आहे.

सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी बिहारमध्ये एफआयआर नोंद झाला आहे. त्याचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विनय तिवारी 2 ऑगस्टला विमानाने मुंबईत आले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईडलाइनप्रमाणे मुंबई महापालिकेने तिवारी यांना होम क्वारंटाइन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.