ETV Bharat / bharat

हाथरस बलात्कार प्रकरणाला नवे वळण...शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेख नाही

author img

By

Published : Oct 1, 2020, 1:56 PM IST

Updated : Oct 1, 2020, 6:59 PM IST

हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये शारीरिक आत्याचार झाल्याचा कोणताही उल्लेख नाही. मात्र, उत्तर प्रदेश पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत.

हाथरस बलात्कार
हाथरस बलात्कार

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये बलात्काराचा कोणताही उल्लेख नाही. मात्र, अद्याप उत्तर प्रदेश पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले होते. तसेच तिचा गळा दाबण्यात आल्याचा उल्लेख अहवालात आहे. याबाबत पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी अधिक माहिती दिली आहे.

पोलीस निरीक्षक विक्रांत वीर

19 वर्षांची तरुणी शेतात गेल्यानंतर चार तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले होते. तसेच तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत.

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हाथरसमधील घटना अद्याप ताजी असतानाच, मध्य प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये बलात्काराचा कोणताही उल्लेख नाही. मात्र, अद्याप उत्तर प्रदेश पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले होते. तसेच तिचा गळा दाबण्यात आल्याचा उल्लेख अहवालात आहे. याबाबत पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी अधिक माहिती दिली आहे.

पोलीस निरीक्षक विक्रांत वीर

19 वर्षांची तरुणी शेतात गेल्यानंतर चार तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले होते. तसेच तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत.

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हाथरसमधील घटना अद्याप ताजी असतानाच, मध्य प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Last Updated : Oct 1, 2020, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.