ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश : वरातीत नाचण्यावरून झालेल्या बाचाबाचीत 4 जखमी - उत्तर प्रदेश वरातीत नाचण्यावरून बाचाबाची न्यूज

ठाणे अधिकारी सिंह यांच्या माहितीनुसार, ही हाणामारी अधिक हिंसक होऊन त्यात दंडुके आणि धारदार शस्त्रे वापरली गेली. यामध्ये हरदीप, सुरेंदर, सोनू आणि काजल जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेश वरातीत नाचण्यावरून बाचाबाची न्यूज
उत्तर प्रदेश वरातीत नाचण्यावरून बाचाबाची न्यूज
author img

By

Published : Nov 28, 2020, 7:55 PM IST

मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यात एका महिलेसह 4 जण जखमी झाले. दारूच्या नशेत नाचणाऱ्यांमध्ये वादावादी होऊन हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

ही घटना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात घडली. मन्सूरपूर पोलीस ठाणे अधिकारी (एसएचओ) कुशलपाल सिंह यांच्या मते, दारूच्या नशेत असलेल्या हरदीप आणि सुरेंदर 'घुडचडी' विधीदरम्यान नाचण्यावरून भांडण सुरू झाले. याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यानंतर येथे दोन गट तयार होऊन त्यात अनेक लोक सामील झाले.

हेही वाचा - लेहमध्ये पारा शून्याच्या 12.9 अंश खाली, जम्मू-काश्मीरमध्येही तापमान घसरले

ठाणे अधिकारी सिंह यांच्या माहितीनुसार, ही हाणामारी अधिक हिंसक होऊन त्यात दंडुके आणि धारदार शस्त्रे वापरली गेली. यामध्ये हरदीप, सुरेंदर, सोनू आणि काजल जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - हिवाळ्यातही चीनचा सामना करण्यास भारत सज्ज.. पँगाँग तलाव परिसरामध्ये मार्कोस तैनात

मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यात एका महिलेसह 4 जण जखमी झाले. दारूच्या नशेत नाचणाऱ्यांमध्ये वादावादी होऊन हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

ही घटना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात घडली. मन्सूरपूर पोलीस ठाणे अधिकारी (एसएचओ) कुशलपाल सिंह यांच्या मते, दारूच्या नशेत असलेल्या हरदीप आणि सुरेंदर 'घुडचडी' विधीदरम्यान नाचण्यावरून भांडण सुरू झाले. याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यानंतर येथे दोन गट तयार होऊन त्यात अनेक लोक सामील झाले.

हेही वाचा - लेहमध्ये पारा शून्याच्या 12.9 अंश खाली, जम्मू-काश्मीरमध्येही तापमान घसरले

ठाणे अधिकारी सिंह यांच्या माहितीनुसार, ही हाणामारी अधिक हिंसक होऊन त्यात दंडुके आणि धारदार शस्त्रे वापरली गेली. यामध्ये हरदीप, सुरेंदर, सोनू आणि काजल जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - हिवाळ्यातही चीनचा सामना करण्यास भारत सज्ज.. पँगाँग तलाव परिसरामध्ये मार्कोस तैनात

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.