ETV Bharat / bharat

रेल्वे रुळांवर कब्जा करू, शेतकरी आंदोलकांचा सरकारला इशारा

author img

By

Published : Dec 10, 2020, 9:34 PM IST

सिंघू सीमेवरून पत्रकार परिषद घेत शेतकरी नेत्यांनी भविष्यात घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती दिली. आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर रेल्वे रुळावर आम्ही कब्जा करू. याची तारीखही आम्ही लवकरच ठरवू असे, शेतकरी नेते पत्रकार परिषदेत म्हणाले.

पत्रकार परिषद
पत्रकार परिषद

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सिंघू आणि टीकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे. अद्याप कृषी कायद्यांवर सरकार आणि शेतकऱ्यांत कोणताही तोडगा निघाला नसून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. रेल्वे रुळांवर कब्जा करू, असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत, तर सरकार चर्चाकरुन कायद्यांत दुरुस्ती करण्यास तयार असल्याचे म्हणत आहे.

आंदोलन तीव्र करणार -

सिंघू सीमेवरून पत्रकार परिषद घेत शेतकरी नेत्यांनी भविष्यात घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती दिली. आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर रेल्वे रुळावर आम्ही कब्जा करू. याची तारीखही आम्ही लवकरच ठरवू असे, शेतकरी नेते पत्रकार परिषदेत म्हणाले. पंजाबात शेतकरी आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती उत्तर विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले.

तोडगा नाही, आंदोलन सुरूच

केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारने तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा प्रस्ताव शेतकरी संघटना दिला. मात्र, ही दुरुस्ती शेतकऱ्यांनी नाकारली आहे. आतपर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. आता आम्ही चर्चा करण्यास तयार नाही. तिन्ही कायदे रद्द करावीत. तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. गेल्या 17 सप्टेंबरला कृषी विधयेक पास झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्यांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र, हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादात सापडले आहेत.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सिंघू आणि टीकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे. अद्याप कृषी कायद्यांवर सरकार आणि शेतकऱ्यांत कोणताही तोडगा निघाला नसून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. रेल्वे रुळांवर कब्जा करू, असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत, तर सरकार चर्चाकरुन कायद्यांत दुरुस्ती करण्यास तयार असल्याचे म्हणत आहे.

आंदोलन तीव्र करणार -

सिंघू सीमेवरून पत्रकार परिषद घेत शेतकरी नेत्यांनी भविष्यात घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती दिली. आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर रेल्वे रुळावर आम्ही कब्जा करू. याची तारीखही आम्ही लवकरच ठरवू असे, शेतकरी नेते पत्रकार परिषदेत म्हणाले. पंजाबात शेतकरी आंदोलनामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती उत्तर विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले.

तोडगा नाही, आंदोलन सुरूच

केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारने तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा प्रस्ताव शेतकरी संघटना दिला. मात्र, ही दुरुस्ती शेतकऱ्यांनी नाकारली आहे. आतपर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. आता आम्ही चर्चा करण्यास तयार नाही. तिन्ही कायदे रद्द करावीत. तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. गेल्या 17 सप्टेंबरला कृषी विधयेक पास झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्यांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र, हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादात सापडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.