ETV Bharat / bharat

केरळमधील पेट्टीमुडी भूस्खलनातील मृतांचा आकडा ४८ वर

author img

By

Published : Aug 10, 2020, 10:07 AM IST

Updated : Aug 10, 2020, 12:36 PM IST

राजमलाजवळील पेट्टीमुडी येथे झालेल्या भूस्खलनामुळे जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगार्‍यातून तीन दिवसांनंतरही मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. आता यासाठी कुत्र्यांची मदत घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात 78 लोक राहत होते, असे सरकारने सांगितले आहे. यापैकी 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, ४८ मृतदेह सापडले आहेत. उरलेल्यांनाही शोधण्याचे प्रयत्न अथकपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

pettimudi landslide kerala  Pettimudi landslide updates  pettimudi landslide death toll  पेट्टीमुडी भूस्खलन मृतांचा आकडा  पेट्टीमुडी भूस्खलन अपडेट्स  पेट्टीमुडी भूस्खलन केरळ
केरळमधील पेट्टीमुडी भूस्खलनातील मृतांचा आकडा ४३ वर

कोची - केरळमधील इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे चहा-मळे कामगारांची घरे जमीनदोस्त झाली आहे. या घटनेत मृतांचा आकडा ४८ वर पोहोचला आहे. येथील ढिगार्‍यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच आतापर्यंत १२ जणांना वाचविण्यात यश आले आहे. तसेच अद्यापही २३ जण बेपत्ता आहेत.

राजमलाजवळील पेट्टीमुडी येथे झालेल्या भूस्खलनामुळे जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगार्‍यातून तीन दिवसांनंतरही मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. आता यासाठी कुत्र्यांची मदत घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात 78 लोक राहत होते, असे सरकारने सांगितले आहे. यापैकी 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, ४८ मृतदेह सापडले आहेत. उरलेल्यांनाही शोधण्याचे प्रयत्न अथकपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. केरळातील एनडीआरएफ प्रमुख रेखा नंबियार या घटनेतील उर्वरित लोकांना वाचवण्यासाठी 55 सहकार्‍यांसह शोध आणि बचाव मोहीम राबवत आहेत. तसे काहीजण जवळच असलेल्या नदीमध्ये वाहत गेल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने केरळमधील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. संततधार पाऊस, दरड कोसळणे, नद्यांवरील धरणांची दारे उघडल्यामुळे केरळमधील नद्या-नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. कोट्टायम आणि अलाप्पुझा या सखल भागात पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील कुमारकोम आणि कुट्टनाड भागातील शेकडो कुटुंबांना मदत शिबिरात हलवण्यात येत आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मदत शिबिरातही वेगवेगळे भाग करून तेथे लोकांना ठेवले आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात 1 हजार 203 पूरग्रस्तांना मदत शिबिरात हलवण्यात आले आहे. सर्वसाधारण मदत शिबिरात 1 हजार 118 लोकांना ठेवण्यात आले आहे, तर 67 ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षांवरील लोकांसाठी असलेल्या शिबिरात ठेवले आहे. बाहेरगावाहून आलेल्या 18 लोकांना विलगीकरण कक्ष तयार करून तेथे ठेवले आहे.

कोची - केरळमधील इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे चहा-मळे कामगारांची घरे जमीनदोस्त झाली आहे. या घटनेत मृतांचा आकडा ४८ वर पोहोचला आहे. येथील ढिगार्‍यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच आतापर्यंत १२ जणांना वाचविण्यात यश आले आहे. तसेच अद्यापही २३ जण बेपत्ता आहेत.

राजमलाजवळील पेट्टीमुडी येथे झालेल्या भूस्खलनामुळे जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगार्‍यातून तीन दिवसांनंतरही मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. आता यासाठी कुत्र्यांची मदत घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात 78 लोक राहत होते, असे सरकारने सांगितले आहे. यापैकी 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, ४८ मृतदेह सापडले आहेत. उरलेल्यांनाही शोधण्याचे प्रयत्न अथकपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. केरळातील एनडीआरएफ प्रमुख रेखा नंबियार या घटनेतील उर्वरित लोकांना वाचवण्यासाठी 55 सहकार्‍यांसह शोध आणि बचाव मोहीम राबवत आहेत. तसे काहीजण जवळच असलेल्या नदीमध्ये वाहत गेल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने केरळमधील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. संततधार पाऊस, दरड कोसळणे, नद्यांवरील धरणांची दारे उघडल्यामुळे केरळमधील नद्या-नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. कोट्टायम आणि अलाप्पुझा या सखल भागात पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील कुमारकोम आणि कुट्टनाड भागातील शेकडो कुटुंबांना मदत शिबिरात हलवण्यात येत आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मदत शिबिरातही वेगवेगळे भाग करून तेथे लोकांना ठेवले आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात 1 हजार 203 पूरग्रस्तांना मदत शिबिरात हलवण्यात आले आहे. सर्वसाधारण मदत शिबिरात 1 हजार 118 लोकांना ठेवण्यात आले आहे, तर 67 ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षांवरील लोकांसाठी असलेल्या शिबिरात ठेवले आहे. बाहेरगावाहून आलेल्या 18 लोकांना विलगीकरण कक्ष तयार करून तेथे ठेवले आहे.

Last Updated : Aug 10, 2020, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.