ETV Bharat / bharat

COVID-19 : भारतात कोरोनाबाधितांची संख्या 873, तर 19 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Mar 28, 2020, 9:59 AM IST

Updated : Mar 28, 2020, 10:35 AM IST

गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 149 रुग्ण आढळून आले असून देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 873 झाली आहे. तसेच यामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

COVID-19 : देशातील रुग्णांची संख्या ७४८, तर १९ जणांचा बळी..
COVID-19 : देशातील रुग्णांची संख्या ७४८, तर १९ जणांचा बळी..

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचे रूग्ण वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नऊशेच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 149 रुग्ण आढळून आले असून देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 873 झाली आहे. तसेच यामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

826 भारतीय तर 47 विदेशी नागरिक असे एकूण 873 जण कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत 79 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 177 वर पोहोचली आहे. तर राज्यातील 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सुमारे 25 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे 2 कोरोनाबाधित आढळले असून एकूण संख्या 18 झाली आहे. तर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 53 वर्षीय रेल्वे कर्मचारी आणि जबलपूर येथील ज्वेलर्सच्या 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 30 वर गेला आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने येत्या 14 एप्रिलपर्यंत नागरिकांना घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे लोकांनी घरामध्येच थांबवे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, सर्वच लोक 'लॉकडाऊन'चा उद्देश लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचे रूग्ण वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नऊशेच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 149 रुग्ण आढळून आले असून देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 873 झाली आहे. तसेच यामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

826 भारतीय तर 47 विदेशी नागरिक असे एकूण 873 जण कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत 79 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 177 वर पोहोचली आहे. तर राज्यातील 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सुमारे 25 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे 2 कोरोनाबाधित आढळले असून एकूण संख्या 18 झाली आहे. तर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 53 वर्षीय रेल्वे कर्मचारी आणि जबलपूर येथील ज्वेलर्सच्या 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 30 वर गेला आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने येत्या 14 एप्रिलपर्यंत नागरिकांना घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे लोकांनी घरामध्येच थांबवे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, सर्वच लोक 'लॉकडाऊन'चा उद्देश लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे.

Last Updated : Mar 28, 2020, 10:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.