रायपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक राज्यातील कामगार दुसऱ्या राज्यात अडकले आहेत. अडकलेले सर्व कामगार आपापल्या घरी जाण्यासाठी सरकारला विनंती करत आहेत. छत्तीसगड राज्यातीलही 1 लाख 17 हजार कामगार देशातील विविध राज्यात अडकून पडले आहेत. या संदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कामगारांनी आपल्या राज्यात आणण्यासाठी 28 रेल्वे गाड्यांची मागणी केली आहे.
छत्तीसगड राज्यातील अनेक जिल्ह्यातील कामगार हे कामानिमित्त, व्यावयायानिमित्त देशातील इतर राज्यात गेले होते. देशातील जवळपास 21 राज्य आणि 4 केंद्रशासीत प्रदेशात 1 लाख 17 हजार कामगदार अडकले आहेत. हे कामगार वारंवार आपापल्या घरी जाण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेश बघेल रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील कामगारांना सोडण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली आहे.