ETV Bharat / bharat

भारत- चीन सीमा वाद: चीनच्या ताब्यातील 10 भारतीय जवानांची सुटका

author img

By

Published : Jun 19, 2020, 3:34 PM IST

कोणताही भारतीय जवाना हाणामारीनंतर बेपत्ता नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले होते. मात्र, जवान चीनच्या ताब्यात होते. याचा उल्लेख केला नाही. जवानांची सुटका केल्यानंतरच लष्कराने अधिकृत वृत्त जारी केले.

भारत चीन सीमा वाद
भारत चीन सीमा वाद

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली भागात सोमवारी(15 जून) रात्री भारत आणि चीनच्या सैनिकामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही देशांच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, गुरुवारी चर्चेनंतर चीनने 10 भारतीय जवनांची सुटका केली आहे. यामध्ये चार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

15 जूनला रात्री झालेल्या हाणामारीत 20 भारतीय जवान शहिद झाले. यामध्ये चीनचेही सैनिक मारले गेले आहेत, मात्र, त्यांनी आकडेवारी जाहीर केली नाही. यावेळी चीनने दहा भारतीय जवानांना आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, मंगळवार, बुधवार सलग दोन दिवस अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी दुपारी 4 वाजता भारतीय जवानांना माघारी सोडण्यात आले. बुधवारी चर्चेवेळी या दहा सैनिकांना चीन बरोबर घेवून आले होते. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे अत्याचार केले नसल्याचे दाखविण्यात आले. मात्र, सुटका केली नाही. तर गुरुवारी चर्चेनंतर त्यांनी सुटका केली. हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, कोणताही भारतीय जवाना हाणामारीनंतर बेपत्ता नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले होते. मात्र, जवान चीनच्या ताब्यात होते. याचा उल्लेख केला नाही. जवानांची सुटका केल्यानंतरच लष्कराने अधिकृत वृत्त जारी केले.

कसा सुरु झाला वाद?

भारत सीमारेषेच्या एकदम जवळ रस्तेबांधणीचे काम करत आहे. त्यावर चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. प्याँगोग त्सो लेक भागातील डोंगररांगातून भारत रस्तेबांधणी करत आहे. तसेच दारबुक- श्योक- दौलत बेग ओल्डी हे भाग भारतास रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून तेथे रस्ते बांधणीचे आणि जोडणीचे काम चालू आहे. यातील गलवान व्हॅली परिसरातील मुख्य रस्त्यापासून बांधण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या रस्त्यांना चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. हा भाग चीनच्या असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, भारताचा याला विरोध आहे.

सोमवारी(15 जून) सकाळी दोन्ही लष्करांमध्ये सुमारे 2 किमी सीमेपासुन मागे जाण्याचे ठरले. मात्र, चीनने हा निर्णय लागू केला की नाही, हे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी काही भारतीय सैनिक गलवान व्हॅली परिसरातील चेकपोस्ट 14 येथे गेले. मात्र, तेथे चीनचा एक तंबू तसाच होता. खरे तर चीनने हा तंबु काढून न्याययला हवा होता. भारतीय सैनिकांनी हा तंबु नष्ट केल्याने चीनी सैनिकही तेथे आले. हातात खिळे आणि तारा ठोकलेल्या काठ्य़ा घेवून चीनी सैनिकांनी निशस्त्र भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला.

यावेळी लाठ्या, काठ्या आणि हाताने तुंबळ हाणामारी झाली. डोंगर उताराचा भाग असल्याने काही जवान श्योक नदीतही पडले. त्यामुळे जखमी झाले. लडाख हा अति उंचीवरील भाग असल्याने तेथे तापमान शुन्य अंशाच्या खाली असते. त्यामुळेही जखमी सैनिकांना वातावरणीय कारणांनी मृत्यू झाला. या हाणामारीत एक अधिकाऱ्यासह 20 भारतीय सैनिक शहिद झाले, तर चीनचेही सैनिक मारले गेले. मात्र, त्यांनी आकडेवारी जाहीर केली नाही.

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली भागात सोमवारी(15 जून) रात्री भारत आणि चीनच्या सैनिकामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही देशांच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, गुरुवारी चर्चेनंतर चीनने 10 भारतीय जवनांची सुटका केली आहे. यामध्ये चार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

15 जूनला रात्री झालेल्या हाणामारीत 20 भारतीय जवान शहिद झाले. यामध्ये चीनचेही सैनिक मारले गेले आहेत, मात्र, त्यांनी आकडेवारी जाहीर केली नाही. यावेळी चीनने दहा भारतीय जवानांना आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, मंगळवार, बुधवार सलग दोन दिवस अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी दुपारी 4 वाजता भारतीय जवानांना माघारी सोडण्यात आले. बुधवारी चर्चेवेळी या दहा सैनिकांना चीन बरोबर घेवून आले होते. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे अत्याचार केले नसल्याचे दाखविण्यात आले. मात्र, सुटका केली नाही. तर गुरुवारी चर्चेनंतर त्यांनी सुटका केली. हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, कोणताही भारतीय जवाना हाणामारीनंतर बेपत्ता नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले होते. मात्र, जवान चीनच्या ताब्यात होते. याचा उल्लेख केला नाही. जवानांची सुटका केल्यानंतरच लष्कराने अधिकृत वृत्त जारी केले.

कसा सुरु झाला वाद?

भारत सीमारेषेच्या एकदम जवळ रस्तेबांधणीचे काम करत आहे. त्यावर चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. प्याँगोग त्सो लेक भागातील डोंगररांगातून भारत रस्तेबांधणी करत आहे. तसेच दारबुक- श्योक- दौलत बेग ओल्डी हे भाग भारतास रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून तेथे रस्ते बांधणीचे आणि जोडणीचे काम चालू आहे. यातील गलवान व्हॅली परिसरातील मुख्य रस्त्यापासून बांधण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या रस्त्यांना चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. हा भाग चीनच्या असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, भारताचा याला विरोध आहे.

सोमवारी(15 जून) सकाळी दोन्ही लष्करांमध्ये सुमारे 2 किमी सीमेपासुन मागे जाण्याचे ठरले. मात्र, चीनने हा निर्णय लागू केला की नाही, हे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी काही भारतीय सैनिक गलवान व्हॅली परिसरातील चेकपोस्ट 14 येथे गेले. मात्र, तेथे चीनचा एक तंबू तसाच होता. खरे तर चीनने हा तंबु काढून न्याययला हवा होता. भारतीय सैनिकांनी हा तंबु नष्ट केल्याने चीनी सैनिकही तेथे आले. हातात खिळे आणि तारा ठोकलेल्या काठ्य़ा घेवून चीनी सैनिकांनी निशस्त्र भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला.

यावेळी लाठ्या, काठ्या आणि हाताने तुंबळ हाणामारी झाली. डोंगर उताराचा भाग असल्याने काही जवान श्योक नदीतही पडले. त्यामुळे जखमी झाले. लडाख हा अति उंचीवरील भाग असल्याने तेथे तापमान शुन्य अंशाच्या खाली असते. त्यामुळेही जखमी सैनिकांना वातावरणीय कारणांनी मृत्यू झाला. या हाणामारीत एक अधिकाऱ्यासह 20 भारतीय सैनिक शहिद झाले, तर चीनचेही सैनिक मारले गेले. मात्र, त्यांनी आकडेवारी जाहीर केली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.