सुरत - लोकसभा निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या तरी बेहत्तर, पण पाकिस्तानवर हल्ला करा, अशी प्रतिक्रिया गुजरातचे कॅबिनेट मंत्री गणपतसिंह वसावा यांनी पुलवामा हल्ल्यानंतर दिली आहे. पुलवामा हल्ल्यात ४० हून अधिक सीआरपीएफ जवानांना प्राण गमवावे लागले होते.
'सार्वत्रिक निवडणुका २ महिन्यांनी पुढे ढकलाव्या लागल्या तरी चालेल,पण पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, हीच देशातील सर्वच्या सर्व १२५ कोटी जनतेची इच्छा आहे. आमच्या जवानांचा जीव घेतल्याचा सूड आम्ही नक्कीच घेऊ. आमचा सैनिकांवर पूर्ण विश्वास आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आणि ठिकाण लवकरच ठरवण्यात येईल, असे सीआरपीएफने सांगितले आहे,' असे वसावा म्हणाले.
पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्राने पाकिस्तानचा एमएफेनचा दर्जा काढून घेण्याची कारवाई केली होती. जगातील ४८ देशांनी या भ्याड हल्ल्याची निर्भत्सना करत भारताला पाठिंबा दिला होता. २५०० सीआरपीएफ जवानांच्या ७८ बसेसचा ताफा जम्मूहून श्रीनगरला निघाला होता. त्याच्यावर १४ फेब्रुवारीला दुपारी सव्वातीन वाजता लाधू मोदी लेथपोरा येथे हल्ला झाला होता.
Conclusion: