ETV Bharat / bharat

आसाम : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; १,४५० जण अटकेत, ४० लाखांची दंडवसुली

author img

By

Published : Apr 13, 2020, 10:50 AM IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघनही केले जात आहे. आसाममध्ये अशाचप्रकारे १९ दिवसात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ४५० हून अधिक मुजोर वाहनधारकांना, नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच अटक केलेल्यांकडून सुमारे ४० लाख रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आसाम पोलिसांची कारवाई
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आसाम पोलिसांची कारवाई

गुवाहाटी - कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी खबरदाराचा पर्याय म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी या लॉकडाऊनच्या नियमांना नागरिक धाब्यावर बसवून विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. तर दुसरीकडे आसाम पोलिसांनी अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. गेल्या १९ दिवसात पोलिसांनी कारवाई करत जवळपास १ हजार ४५० जणांना अटक केली आहे. तसेच, अटक केलेल्यांकडून सुमारे ४० लाख रुपये दंडही वसूल करण्यात आला, असल्याची माहिती आसाम पोलिसांनी रविवारी दिली.

आसाम पोलिसांनी त्यांच्या लॉकडाऊनबाबतच्या दैनिक अहवालात सांगितल्यानुसार, त्यांनी संचारबंदीच्या सुरुवातीपासूनच कारवाईचे धोरण आखले होते. यातील जवळपास १ हजार ३८३ प्रकरणातील ७३५ प्रकरणावर गुन्हे दाखल केले असून त्या अनुषंगाने १ हजार ४५४ लोकांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही जणांवर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. दंडस्वरूप करण्यात आलेल्या कारवाईतून पोलिसांनी एकूण ३९ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा दंड आकारला आहे. या व्यतिरिक्त संचारबंदी दरम्यान राज्यातील विविध भागातून सर्व प्रकारच्या ११ हजार २०० वाहनांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईसोबतच, कोरोना विषाणूबाबत भडकाऊ व्हिडियो, अफवा पसरवणाऱ्यांवरही आसाम पोलिसांनी कंबर कसली असून अशा प्रकारच्या खोट्या बातम्या, अफवांविरोधात ते सक्रिय भूमिका घेत कारवाई करत आहेत.

दरम्यान, रविवारी राज्यात आणखी ६१ जणांवर संचारबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. तर, ३६ जणांना अटकही करण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकात आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी रविवारी म्हणजेच संचारबंदीच्या १९ व्या दिवशी देशभरासह राज्यभरातील बाजारपेठा, कार्यालये आणि इतर प्रतिष्ठाने, रस्त्यावरून वाहनांची ये-जाही बहुतेककरून बंदच होती. मात्र, काही ठिकाणी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्या रस्त्यावर मुजोर नागरिकांवर पोलिसांना ताकदीचा वापर करावा लागला. तर दुसरीकडे काही ठिकाणी पोलिसांनी गरजू लोकांना तांदूळ, भाजीपाला, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटपही केले.

गुवाहाटी - कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी खबरदाराचा पर्याय म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी या लॉकडाऊनच्या नियमांना नागरिक धाब्यावर बसवून विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. तर दुसरीकडे आसाम पोलिसांनी अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. गेल्या १९ दिवसात पोलिसांनी कारवाई करत जवळपास १ हजार ४५० जणांना अटक केली आहे. तसेच, अटक केलेल्यांकडून सुमारे ४० लाख रुपये दंडही वसूल करण्यात आला, असल्याची माहिती आसाम पोलिसांनी रविवारी दिली.

आसाम पोलिसांनी त्यांच्या लॉकडाऊनबाबतच्या दैनिक अहवालात सांगितल्यानुसार, त्यांनी संचारबंदीच्या सुरुवातीपासूनच कारवाईचे धोरण आखले होते. यातील जवळपास १ हजार ३८३ प्रकरणातील ७३५ प्रकरणावर गुन्हे दाखल केले असून त्या अनुषंगाने १ हजार ४५४ लोकांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही जणांवर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. दंडस्वरूप करण्यात आलेल्या कारवाईतून पोलिसांनी एकूण ३९ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा दंड आकारला आहे. या व्यतिरिक्त संचारबंदी दरम्यान राज्यातील विविध भागातून सर्व प्रकारच्या ११ हजार २०० वाहनांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईसोबतच, कोरोना विषाणूबाबत भडकाऊ व्हिडियो, अफवा पसरवणाऱ्यांवरही आसाम पोलिसांनी कंबर कसली असून अशा प्रकारच्या खोट्या बातम्या, अफवांविरोधात ते सक्रिय भूमिका घेत कारवाई करत आहेत.

दरम्यान, रविवारी राज्यात आणखी ६१ जणांवर संचारबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. तर, ३६ जणांना अटकही करण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकात आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी रविवारी म्हणजेच संचारबंदीच्या १९ व्या दिवशी देशभरासह राज्यभरातील बाजारपेठा, कार्यालये आणि इतर प्रतिष्ठाने, रस्त्यावरून वाहनांची ये-जाही बहुतेककरून बंदच होती. मात्र, काही ठिकाणी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्या रस्त्यावर मुजोर नागरिकांवर पोलिसांना ताकदीचा वापर करावा लागला. तर दुसरीकडे काही ठिकाणी पोलिसांनी गरजू लोकांना तांदूळ, भाजीपाला, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटपही केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.