ETV Bharat / bharat

Baba Ramdev Controversial Statement : इस्लाम धर्मावर रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले इस्लामचा अर्थ..

author img

By

Published : Feb 3, 2023, 1:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 2:17 PM IST

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. बाडमेरच्या एका धार्मिक कार्यक्रमात त्यांनी धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Baba Ramdev
बाबा रामदेव
रामदेव बाबा

बाडमेर (राजस्थान) : प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव गुरुवारी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजस्थानच्या बाडमेरला पोहोचले होते. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना बाबा रामदेव यांनी एका विशिष्ट धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. धर्मपुरी महाराज मंदिर आणि जगरामपुरी महाराजांच्या अभिषेकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाबा रामदेव आले होते. यावेळी त्यांनी सनातन धर्माचे गुणगान करण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्याचेही कौतुक केले.

नमाज अदा करा, मग मनात येईल ते करा : धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, समाजात सगळीकडे पाप वाढत आहे. हे पाप पुसण्याचे काम मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना करावे लागणार आहे. एका विशिष्ट धर्मावर भाष्य करताना ते म्हणाले की, जर तुम्ही कोणत्याही मुस्लिमाला त्याचा धर्म काय म्हणतो असे विचाराल तर तो म्हणेल की दिवसातून ५ वेळा नमाज पठण करा आणि मग तुमच्या मनात येईल ते करा. म्हणजेच पाहिजे तितके पाप करा. त्यांना इस्लामचा अर्थ फक्त नमाज म्हणून समजतो. ते म्हणाले की मुस्लिम न चुकता नमाज अदा करतात कारण त्यांना तेच शिकवले जाते. पण हिंदू धर्मात हे शिकवले जात नाही.

असा स्वर्ग नरकापेक्षाही वाईट : बाबा रामदेव यांनी ख्रिश्चन धर्मावरही भाष्य केले. ते म्हणाले की, चर्चमध्ये जायचे, मेणबत्त्या लावायच्या आणि मग येशू ख्रिस्तासमोर उभे राहायचे, सर्व पापे नष्ट होतील. धर्मावर भाष्य करताना ते म्हणाले की, मुस्लिमांसाठी स्वर्गाचा अर्थ फक्त पायजमा घालणे आणि मिशा कापून टोपी घालणे असा आहे. हे लोक म्हणतात की असे केल्याने स्वर्गात तुमचे स्थान निश्चित होईल. असा स्वर्ग नरकापेक्षा वाईट आहे. पण तरीही हे लोक मिशा कापतात, डोक्यावर टोप्या घालतात, हा निव्वळ वेडेपणा आहे. ते संपूर्ण जगाला इस्लाममध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

इश्वराने केवळ मानवाची निर्मिती केली : एवढे बोलल्यानंतर बाबा रामदेव यांनी यावर स्पष्टीकरणही दिले. ते म्हणाले की, मी कोणावरही टीका करत नाही. काही लोक म्हणतात की ते संपूर्ण जग इस्लाममध्ये बदलतील तर काही म्हणतात की ते ख्रिस्ती धर्मात रुपांतरित करतील. पण त्यांच्याकडे परिवर्तनाचा कोणताही अजेंडा नाही. हिंदू किंवा सनातन धर्मात तसे नाही. बाबा रामदेव म्हणाले की, ईश्वराने केवळ मानव जातीची निर्मिती केली आहे. बाकीच्या जाती आपण सर्वांनीच निर्माण केल्या आहेत. हिंदू धर्म अनेक जातींमध्ये विभागला गेला आहे.

पंतप्रधान मोदींचे कौतुक : बाबा रामदेव यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत आपण सर्व एका देवाची मुले आहोत असे म्हटले आहे. सर्व समान आहेत. आपापसात कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र राहायचे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, राजकारणी खूप धोकादायक असतात. ते लोकांना जातींमध्ये विभागतात. भारताला एक चांगला पंतप्रधान मिळाला आहे. ते नीतिमान आहेत, त्यांचा देवावर विश्वास आहे हे चांगले आहे. तत्पूर्वी बाबा रामदेव आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद महाराजही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले. येथे त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आयोजन समितीने स्वागत केले. यानंतर योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद यांनी धर्मापुरी मंदिराला भेट दिली. ते नंतर धर्मसभेच्या ठिकाणी पोहोचले जिथे जगरामपुरी महाराज आणि स्वामी प्रतापपुरी महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा : Ravikant Shukla Fraud : बिल्डरची क्रिकेटरला जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

रामदेव बाबा

बाडमेर (राजस्थान) : प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव गुरुवारी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजस्थानच्या बाडमेरला पोहोचले होते. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना बाबा रामदेव यांनी एका विशिष्ट धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. धर्मपुरी महाराज मंदिर आणि जगरामपुरी महाराजांच्या अभिषेकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाबा रामदेव आले होते. यावेळी त्यांनी सनातन धर्माचे गुणगान करण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्याचेही कौतुक केले.

नमाज अदा करा, मग मनात येईल ते करा : धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, समाजात सगळीकडे पाप वाढत आहे. हे पाप पुसण्याचे काम मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना करावे लागणार आहे. एका विशिष्ट धर्मावर भाष्य करताना ते म्हणाले की, जर तुम्ही कोणत्याही मुस्लिमाला त्याचा धर्म काय म्हणतो असे विचाराल तर तो म्हणेल की दिवसातून ५ वेळा नमाज पठण करा आणि मग तुमच्या मनात येईल ते करा. म्हणजेच पाहिजे तितके पाप करा. त्यांना इस्लामचा अर्थ फक्त नमाज म्हणून समजतो. ते म्हणाले की मुस्लिम न चुकता नमाज अदा करतात कारण त्यांना तेच शिकवले जाते. पण हिंदू धर्मात हे शिकवले जात नाही.

असा स्वर्ग नरकापेक्षाही वाईट : बाबा रामदेव यांनी ख्रिश्चन धर्मावरही भाष्य केले. ते म्हणाले की, चर्चमध्ये जायचे, मेणबत्त्या लावायच्या आणि मग येशू ख्रिस्तासमोर उभे राहायचे, सर्व पापे नष्ट होतील. धर्मावर भाष्य करताना ते म्हणाले की, मुस्लिमांसाठी स्वर्गाचा अर्थ फक्त पायजमा घालणे आणि मिशा कापून टोपी घालणे असा आहे. हे लोक म्हणतात की असे केल्याने स्वर्गात तुमचे स्थान निश्चित होईल. असा स्वर्ग नरकापेक्षा वाईट आहे. पण तरीही हे लोक मिशा कापतात, डोक्यावर टोप्या घालतात, हा निव्वळ वेडेपणा आहे. ते संपूर्ण जगाला इस्लाममध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

इश्वराने केवळ मानवाची निर्मिती केली : एवढे बोलल्यानंतर बाबा रामदेव यांनी यावर स्पष्टीकरणही दिले. ते म्हणाले की, मी कोणावरही टीका करत नाही. काही लोक म्हणतात की ते संपूर्ण जग इस्लाममध्ये बदलतील तर काही म्हणतात की ते ख्रिस्ती धर्मात रुपांतरित करतील. पण त्यांच्याकडे परिवर्तनाचा कोणताही अजेंडा नाही. हिंदू किंवा सनातन धर्मात तसे नाही. बाबा रामदेव म्हणाले की, ईश्वराने केवळ मानव जातीची निर्मिती केली आहे. बाकीच्या जाती आपण सर्वांनीच निर्माण केल्या आहेत. हिंदू धर्म अनेक जातींमध्ये विभागला गेला आहे.

पंतप्रधान मोदींचे कौतुक : बाबा रामदेव यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत आपण सर्व एका देवाची मुले आहोत असे म्हटले आहे. सर्व समान आहेत. आपापसात कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र राहायचे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, राजकारणी खूप धोकादायक असतात. ते लोकांना जातींमध्ये विभागतात. भारताला एक चांगला पंतप्रधान मिळाला आहे. ते नीतिमान आहेत, त्यांचा देवावर विश्वास आहे हे चांगले आहे. तत्पूर्वी बाबा रामदेव आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद महाराजही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले. येथे त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आयोजन समितीने स्वागत केले. यानंतर योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद यांनी धर्मापुरी मंदिराला भेट दिली. ते नंतर धर्मसभेच्या ठिकाणी पोहोचले जिथे जगरामपुरी महाराज आणि स्वामी प्रतापपुरी महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा : Ravikant Shukla Fraud : बिल्डरची क्रिकेटरला जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Last Updated : Feb 3, 2023, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.