ETV Bharat / bharat

Anju Nasrullah Love Story : अंजू घरी परतल्यानंतर काय करणार, पती अरविंदने स्पष्टच सांगितले...

author img

By

Published : Jul 28, 2023, 12:33 PM IST

Updated : Jul 28, 2023, 1:02 PM IST

पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या पती अरविंद म्हणाला की, अंजू यापूर्वीही खोटे बोलत होती. ती अजूनही खोटे बोलत आहे. ती भारतात आल्यावर तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. घरी परतल्यानंतर तिच्याविरुद्धात गुन्हा दाखल केला जाईल. अंजूने लग्न केले असून ती पुन्हा खोटे बोलत आहे.

अंजू आणि पती अरविंद
अंजू आणि पती अरविंद

अलवर: अंजू आणि नसरुल्लाह प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अंजूने आपला प्रियकर नसरुल्लाहसोबत लग्न केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर तिने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंजूने तिच्या लग्नाचे वृत्त फेटाळून लावले आहे. नसरुल्लाहसोबत आपण लग्न केले नसल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या उत्तरावर पती अरविंदनेही माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. जर ती भारतात परतली तर तिच्याविरुद्धात गुन्हा दाखल करणार असल्याचे अरविंद म्हणाले आहेत.

भारतात परत येणार: पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणानंतर भिवाडीतील दोन मुलांची आई अंजूची देशभरात चर्चा होत आहे. आपल्या नवऱ्याला सोडत अंजूने थेट पाकिस्तान गाठले. अंजूने पाकिस्तानातील प्रियकरासोबत लग्न केल्याच्या बातम्या माध्यमात आल्या आहेत. अंजूने तिचा प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर अंजूने मौन सोडले असून आपण नसरुल्लाहशी लग्न केले नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तसेच आपण काही दिवसातच भारतात परत येणार असल्याचेही म्हटले. यावर तिचा पती अरविंदने प्रतिक्रिया दिली आहे.

अंजूची व्हायरल स्टोरी: अंजू दरवेळी आपले विधान बदलत आहे. अंजू आधी म्हणाली होती की, ती फक्त फिरण्यासाठी पाकिस्तानात गेली आहे. परंतु त्यानंतर अचानकपणे तिने धर्म बदलून प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाल केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्या दोघांचे प्री-वेडिंग शूट व्हिडिओही खूप व्हायरल झाले. याचबरोबर नसरुल्लाहच्या कुटुंबासोबत अंजू डिनर करत असल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.

अंजूला भारतात आल्यानंतर परत घ्यायचे की नाही, हा निर्णय माझे मुले घेणार आहेत- अंजूचा पती अरविंद

अंजू खोटं बोलते: अरविंद आपल्या मुलांसोबत भिवाडी येथे गेला होता. बुधवारी रात्री तो आपल्या मुलांसोबत सोसायटीमध्ये परतला. गुरुवारी अरविंदने माध्यमांना सांगितले की, अंजू पुन्हा पुन्हा खोटे बोलत आहे.ती भिवाडीतही असातना खोटे बोलत होती. खोटे बोलून तिने पासपोर्ट आणि व्हिसा बनवला. याची संपूर्ण कुटुंबाला कल्पना नव्हती. तसेच अंजूने दिल्लीत घटस्फोटाची कागदपत्र जमा केली आहेत. परंतु मी तिला घटस्फोट दिलेला नाही. तिने बनावट कागदपत्रे दिल्लीत जमा केली आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे अंजूकडून घेणार असल्याचे अरविंद म्हणाले. अंजू भारतात परतल्यानंतर तिला परत नांदवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी अरविंदला केला.

हेही वाचा-

  1. Anju in Pakistan : अंजू पाकिस्तानात गेल्याने कुटुंबाची वाढली चिंता, फेसबुक मित्र म्हणाला आम्ही लग्न...
  2. Anju in Pakistan: अंजूची पाकिस्तानात झाली फातिमा, धर्मांतरण करून विवाह केल्याने संतापले वडील, म्हणाले...
  3. Anju in Pakistan News : पाकिस्तानमध्ये फेसबुक मित्राला भेटायला गेलेल्या अंजूने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली...

अलवर: अंजू आणि नसरुल्लाह प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अंजूने आपला प्रियकर नसरुल्लाहसोबत लग्न केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर तिने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंजूने तिच्या लग्नाचे वृत्त फेटाळून लावले आहे. नसरुल्लाहसोबत आपण लग्न केले नसल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या उत्तरावर पती अरविंदनेही माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. जर ती भारतात परतली तर तिच्याविरुद्धात गुन्हा दाखल करणार असल्याचे अरविंद म्हणाले आहेत.

भारतात परत येणार: पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणानंतर भिवाडीतील दोन मुलांची आई अंजूची देशभरात चर्चा होत आहे. आपल्या नवऱ्याला सोडत अंजूने थेट पाकिस्तान गाठले. अंजूने पाकिस्तानातील प्रियकरासोबत लग्न केल्याच्या बातम्या माध्यमात आल्या आहेत. अंजूने तिचा प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर अंजूने मौन सोडले असून आपण नसरुल्लाहशी लग्न केले नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तसेच आपण काही दिवसातच भारतात परत येणार असल्याचेही म्हटले. यावर तिचा पती अरविंदने प्रतिक्रिया दिली आहे.

अंजूची व्हायरल स्टोरी: अंजू दरवेळी आपले विधान बदलत आहे. अंजू आधी म्हणाली होती की, ती फक्त फिरण्यासाठी पाकिस्तानात गेली आहे. परंतु त्यानंतर अचानकपणे तिने धर्म बदलून प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाल केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्या दोघांचे प्री-वेडिंग शूट व्हिडिओही खूप व्हायरल झाले. याचबरोबर नसरुल्लाहच्या कुटुंबासोबत अंजू डिनर करत असल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.

अंजूला भारतात आल्यानंतर परत घ्यायचे की नाही, हा निर्णय माझे मुले घेणार आहेत- अंजूचा पती अरविंद

अंजू खोटं बोलते: अरविंद आपल्या मुलांसोबत भिवाडी येथे गेला होता. बुधवारी रात्री तो आपल्या मुलांसोबत सोसायटीमध्ये परतला. गुरुवारी अरविंदने माध्यमांना सांगितले की, अंजू पुन्हा पुन्हा खोटे बोलत आहे.ती भिवाडीतही असातना खोटे बोलत होती. खोटे बोलून तिने पासपोर्ट आणि व्हिसा बनवला. याची संपूर्ण कुटुंबाला कल्पना नव्हती. तसेच अंजूने दिल्लीत घटस्फोटाची कागदपत्र जमा केली आहेत. परंतु मी तिला घटस्फोट दिलेला नाही. तिने बनावट कागदपत्रे दिल्लीत जमा केली आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे अंजूकडून घेणार असल्याचे अरविंद म्हणाले. अंजू भारतात परतल्यानंतर तिला परत नांदवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी अरविंदला केला.

हेही वाचा-

  1. Anju in Pakistan : अंजू पाकिस्तानात गेल्याने कुटुंबाची वाढली चिंता, फेसबुक मित्र म्हणाला आम्ही लग्न...
  2. Anju in Pakistan: अंजूची पाकिस्तानात झाली फातिमा, धर्मांतरण करून विवाह केल्याने संतापले वडील, म्हणाले...
  3. Anju in Pakistan News : पाकिस्तानमध्ये फेसबुक मित्राला भेटायला गेलेल्या अंजूने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली...
Last Updated : Jul 28, 2023, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.