ETV Bharat / bharat

Ambedkar Jayanti 2022 : राष्ट्रपती रामनाथ कोविंदसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेबांना केले अभिवादन

author img

By

Published : Apr 14, 2022, 2:28 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील संसद भवन लॉनमधील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ( PM Modi pay tribute to Dr Br Ambedkar ) आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करून आदरांजली वाहिली. त्यांनी ट्विट केले की, 'बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांना त्यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त ( Ambedkar birth Anniversary ) विनम्र अभिवादन आहे.

डॉ. बाबासाहेबांना केले अभिवादन
डॉ. बाबासाहेबांना केले अभिवादन

नवी दिल्ली - भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची आज १३१ वी जयंती ( Ambedkar Jayanti 2022 ) देशभरात साजरी होत आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांचा ( Bharat Ratna Dr Bhimrao Ambedkar ) जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. भीमराव आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री होते. आंबेडकर जयंती भारतात समता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणून ओळखली जाते.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील संसद भवन लॉनमधील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ( PM Modi pay tribute to Dr Br Ambedkar ) आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करून आदरांजली वाहिली. त्यांनी ट्विट केले की, 'बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांना त्यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त ( Ambedkar birth Anniversary ) विनम्र अभिवादन आहे. त्यांनी भारताला सर्वात मजबूत ताकदीचा असलेला स्तंभ म्हणजे आपली पवित्र राज्यघटना दिली आहे.

2015 मध्ये भारत सरकारकडून भारतरत्न जाहीर- डॉ आंबेडकर हे एक प्रख्यात कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. दलित बौद्ध चळवळीबरोबरच महिला आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी जनतेचे नेतृत्व केले. बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार होते. डॉ.आंबेडकर जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेच्या विरोधात होते. त्यांनी जातीव्यवस्थेला कडाडून विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी अनेक महत्त्वाचे कार्य केले. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी संघर्ष करून मोहीम राबविली. डॉ भीमराव आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. 2015 मध्ये, भारत सरकारने 14 एप्रिल ही देशभरात अधिकृत सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली आहे.

  • दलितों, पीड़ितों, वंचितों और शोषितों के कल्याण के लिए बाबासाहेब के विचार हमारी सरकार के लिए प्रेरणापुंज रहे हैं। यही वजह है कि हमारी सभी योजनाएं गरीब से गरीब को ध्यान में रखकर लागू की गई हैं और सामाजिक न्याय की दिशा में हमने कई मानदंड तय किए हैं। pic.twitter.com/dOJixnlLOj

    — Narendra Modi (@narendramodi) April 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-Interview The VC Of JNU : विद्यापीठात हिंसाचाराला थारा नाही; पहा 'JNU'च्या कुलगुरूं मुलाखत

हेही वाचा-Russia Ukraine War 50Th Day : अमेरिकेची युक्रेनला हेलिकॉप्टरसह लष्करी उपकरणांची मदत

हेही वाचा-महिलांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले! बाबा बजरंग मुनीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली - भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची आज १३१ वी जयंती ( Ambedkar Jayanti 2022 ) देशभरात साजरी होत आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांचा ( Bharat Ratna Dr Bhimrao Ambedkar ) जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. भीमराव आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री होते. आंबेडकर जयंती भारतात समता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणून ओळखली जाते.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील संसद भवन लॉनमधील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ( PM Modi pay tribute to Dr Br Ambedkar ) आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करून आदरांजली वाहिली. त्यांनी ट्विट केले की, 'बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांना त्यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त ( Ambedkar birth Anniversary ) विनम्र अभिवादन आहे. त्यांनी भारताला सर्वात मजबूत ताकदीचा असलेला स्तंभ म्हणजे आपली पवित्र राज्यघटना दिली आहे.

2015 मध्ये भारत सरकारकडून भारतरत्न जाहीर- डॉ आंबेडकर हे एक प्रख्यात कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. दलित बौद्ध चळवळीबरोबरच महिला आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी जनतेचे नेतृत्व केले. बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार होते. डॉ.आंबेडकर जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेच्या विरोधात होते. त्यांनी जातीव्यवस्थेला कडाडून विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी अनेक महत्त्वाचे कार्य केले. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी संघर्ष करून मोहीम राबविली. डॉ भीमराव आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. 2015 मध्ये, भारत सरकारने 14 एप्रिल ही देशभरात अधिकृत सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली आहे.

  • दलितों, पीड़ितों, वंचितों और शोषितों के कल्याण के लिए बाबासाहेब के विचार हमारी सरकार के लिए प्रेरणापुंज रहे हैं। यही वजह है कि हमारी सभी योजनाएं गरीब से गरीब को ध्यान में रखकर लागू की गई हैं और सामाजिक न्याय की दिशा में हमने कई मानदंड तय किए हैं। pic.twitter.com/dOJixnlLOj

    — Narendra Modi (@narendramodi) April 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-Interview The VC Of JNU : विद्यापीठात हिंसाचाराला थारा नाही; पहा 'JNU'च्या कुलगुरूं मुलाखत

हेही वाचा-Russia Ukraine War 50Th Day : अमेरिकेची युक्रेनला हेलिकॉप्टरसह लष्करी उपकरणांची मदत

हेही वाचा-महिलांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले! बाबा बजरंग मुनीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.