महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यावर्षीही प्रचारात आनंद दिघे नावाचा वापर; अनेक दशकांची परंपरा कायम, आरोप प्रत्यारोपानं दुखावले ठाणेकर - Dharmaveer Anand Dighe

Dharmaveer Anand Dighe : ठाण्यात निवडणूक लढताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतरही उबाठा गट आणि शिंदे सेना यांनी आनंद दिघे यांच्या नावाचा वापर केला आहे. मात्र निवडणुकीत आनंद दिघेंचं नाव वापरण्यावरुन त्यांच्या मित्रांनी नाराजी व्यक्त केली.

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 8:18 AM IST

Dharmaveer Anand Dighe
संपादित छायाचित्र (Reporter)

ठाणे Dharmaveer Anand Dighe :मागील काही दशकांपासून आनंद दिघे आणि निवडणुका हे समीकरण प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळत होतं. यंदाची लोकसभा निवडणूक विकासकामं, आश्वासनं या मुद्द्यांवर न होता आनंद दिघे यांच्या नावानं होणाऱ्या आरोप प्रत्यारोपानं गाजत आहे. यावर्षी निवडणुका होत असताना आनंद दिघे यांची मालमत्ता, धर्मवीर सिनेमा आणि त्यांना त्रास दिल्याचे आरोप आणि एकनिष्ठपणा या मुद्द्यांवर होत असल्याचं दिसत आहे. यासाठी आनंद दिघे यांचं गद्दाराना क्षमा नाही, या वक्तव्याचा वापर देखील होत आहे.

धर्मवीर आनंद दिघे (Reporter)
धर्मवीर आनंद दिघे (Reporter)

आनंद दिघे यांच्या नावाशीवाय पर्याय नाही :ठाण्यात आनंद दिघे हे नाव घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पार पडत नव्हती. मतांचा जोगवा मागण्यासाठी सर्वच पक्ष आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करत आहेत. मात्र बदलत्या समीकरणांमुळे आणि शिवसेनेतच पडलेल्या उभ्या फुटीमुळे धर्मवीर आनंद दिघे यांचा वापर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडूनही होत आहे. दोन दशकांपूर्वी आनंद दिघे यांचं निधन झालं, मात्र आजही निवडणुका लढण्यासाठी आनंद दिघे यांचं नाव घेतल्याशिवाय ठाण्यात मत मिळत नाहीत, हे पुन्हा एकदा प्रचार सभेमधून दिसून आलं. आनंद दिघे यांची मालमत्ता त्यांचे शिष्य आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा वापर आता ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केला जात आहे.

धर्मवीर आनंद दिघे (Reporter)

आता झाला धर्मवीर सिनेमा वाद :आनंद दिघे यांच्या जीवनावर धर्मवीर हा सिनेमा काढण्यात आला. त्याचा दुसरा पार्ट काढण्यात येत आहे. असं असताना या सिनेमातील काही सीन खरे आणि खोटे असे आरोप प्रत्यारोप होवू लागले आहेत. या वादातून मत मिळवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.

ठाण्यापासून कश्मीरपर्यंत आहेत आनंद दिघे यांचे फोटो :आनंद दिघे यांनी केलेलं काम हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं. आजही त्यांचे चाहते ठाण्यापासून अगदी जम्मू-काश्मीरपर्यंत असल्याचे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते याचे साक्षीदार आहेत. आनंद आश्रम ही त्यांची कामाची जागा म्हणजे आनंद मठ. आता दोन दशकांनंतर तो पुन्हा दुरुस्त करुन येथून आता शिंदे गटाचं काम केलं जात आहे.

आनंद दिघे यांच्यावरुन राजकारण नको :आनंद दिघे यांनी धर्म, जात, पंत, प्रांत, न पाहता आपल्याकडं आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला मदत केली. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न अनेक दशकं केला. त्यांच्या या सवयीचा आणि चांगल्या गुणांचा वापर ठाण्यातील नेत्यांनी करणं अपेक्षित आहे. मात्र आता त्यांच्या नावानं आरोप प्रत्यारोप करणं हे चुकीचं आहे, असं आनंद दिघे यांचे मित्र सांगत आहेत.

हेही वाचा :

  1. ठाकरे गटाच्या शाखेत चक्क शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; ठाकरेंचे कार्यकर्ते गैरहजर तरीही.... - Lok Sabha election 2024
  2. बालेकिल्ले कोणाचे नसतात, बालेकिल्ले सर्वसामान्य जनता ठरवते; राजन विचारे यांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज - Lok Sabha Election 2024
  3. शेवटच्या टप्प्यातील 'महा'मुंबईतील १० जागा ठरणार निर्णायक; मुंबई, ठाणे, कल्याणचा गढ कोण राखणार? - Mumbai Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details