नवी दिल्ली- २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारतात साखर, मीठ आणि असंतृप्त चरबीयुक्त आणि पोषक तत्वांमध्ये कमी असलेल्या अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाचा (UPF) वापर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अनेक आजार वाढ आहेत. तसेच मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सॉफ्ट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सपासून ते तळलेले चिकन आणि पॅकेज कुकीजपर्यंत, साखरयुक्त पदार्थ रोजच्या आहारात वाढले आहेत, असे आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालात म्हटलं आहे. दीर्घकाळ पदार्थ टिकण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात जाहिरात, मार्केटिंग होत असल्यानं देशातील यूपीएफच्या भरभराटीच्या व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.
छाननी करणं आवश्यक-यूपीएफ वस्तूंकडे अनेकांच्या जीवनशैलीत आणि आहारात बदल झाला आहे. त्यामुळे अनेकांना लठ्ठपणा, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहे. रोजच्या आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण (फायबर) वाढल्यानं प्रौढ आणि मुलांमध्ये वजन वाढते. त्याचा परिणाम म्हणून लठ्ठपणा आणि इतर आजार वाढतात. अनेकदा आरोग्याला अपायकारक असलेल्या पॅकेजिंग अन्नपदार्थांची जाहिरात आणि विक्री ही आरोग्यदायी उत्पादने म्हणून केली जाते. यूपीएफच्या विक्री आणि जाहिरातीमधील दिशाभूल करणारे दावे आणि माहिती यावर लक्ष देऊन छाननी करणं आवश्यक आहे,असे सर्वेक्षणात म्हटलं आहे.