महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 1:57 PM IST

ETV Bharat / bharat

जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामानं 240 वर अडवलं - इंद्रेश कुमार यांचा भाजपाला टोला - RSS Leader Dig At BJP

Indresh Kumar Statement : “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामानं 240 च्या संख्येवर मर्यादित ठेवलं”, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केलंय. इंद्रेश कुमार यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

those who became arrogant were stopped at 240 by lord Ram rss leaders dig at bjp over ls poll results
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार (Source IANS)

जयपूर Indresh Kumar Statement : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 240 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपा स्वबळावर 370 तर एनडीए 400 खासदारांचा टप्पा पार करेल, अशी घोषणाबाजी भाजपा नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, त्यात त्यांना अपयश आलं. भाजपा प्रणीत एनडीएला केवळ 295 जागांवरच समाधान मानावं लागलं. तर यावरुनच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी थेट भाजपाला टोला लगावलाय. “जे अहंकारी होते, त्यांना प्रभू रामानं 240 वर अडवलं”, असं वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केलंय.

काय म्हणाले इंद्रेश कुमार :राजस्थानमधील जयपूरजवळच्या कनोटा येथे एका कार्यक्रमात बोलत असताना इंद्रेश कुमार म्हणाले की, ज्यांनी आजपर्यंत प्रभू श्री रामांची भक्ती केली, ते अहंकारी बनत गेले. ज्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचं जाहीर केलं, त्यांना प्रभू श्री रामानं 240 जागांवर अडवलं. त्यांचा अहंकारच यासाठी कारणीभूत ठरलाय.” लोकसभेच्या निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता इंद्रेश कुमार यांनी देखील भाजपाला टोला लगावलाय. त्यामुळं या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

कॉंग्रेसवरही साधला निशाणा : यावेळी इंद्रेश कुमार यांनी केवळ भाजपावरच नाही तर काँग्रेसवरही निशाणा साधलाय. भाजपाप्रमाणेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं नाव न घेता इंद्रेश कुमार म्हणाले, ज्यांनी प्रभू रामावर श्रद्धा ठेवली नाही. तसंच प्रभू रामाला विरोध केला. त्यांनाही 234 वर मर्यादित राहावं लागलंय. हाच देवाचा न्याय असा असतो.

हेही वाचा -

  1. मणिपूर हिंसाचारावरुन मोदी सरकारला इशारा?, मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या अर्थ काय? - Mohan Bhagwat On Manipur violence
  2. दहा वर्षात प्रगती झाली, पण प्रश्न सुटले नाहीत: वर्षभरापासून मणिपूर अशांत, तिकडं लक्ष द्या, सरसंघचालकांनी टोचले कान - Mohan Bhagwat On Manipur Crisis
  3. राम मंदिर निर्माण कार्याला 500 वर्षाचा संघर्ष : सरसंघचालक मोहन भागवत - Mohan Bhagwat On Ram Mandir

ABOUT THE AUTHOR

...view details