तिरुवनंतपुरम - भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय संघाने निर्धारीत २० षटकात १७० धावा केल्या. दरम्यान, या सामन्यातही विराट कोहली आणि केसरिक विल्यम्स यांच्यात पुन्हा 'टशन' पाहायला मिळाली.
विराट १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल्यम्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विराटची विकेट घेतल्यानंतर विल्यम्सने तोंडावर बोट ठेवत विराटला डिवचलं. पहिल्या सामन्यात विराटने नोटबूक साईन करताना दोन वर्षांपूर्वीचा वचपा काढला होता. त्याला विल्यम्सने पुन्हा उत्तर दिले.