नवी दिल्ली -ऑटोमेशन प्रक्रियेमुळे विविध उद्योगांमध्ये विशेषत: तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर उद्योगांमध्ये मोठी मनुष्यबळ कपात होणार आहे. या उद्योगांमध्ये १.६ कोटी मनुष्यबळ कार्यरत आहे. यामध्ये २०२२ पर्यंत ३० लाखांची कपात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कंपन्यांची वर्षाला १०० अब्ज डॉलरची बचत होणार आहे.
देशातील आयटी उद्योगांमध्ये १.६ कोटी मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यापैकी ९० लाख मनुष्यबळ हे कमी कौशल्य असलेल्या सेवा आणि बीपीओमध्ये असल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे.
कमी कौशल्य असलेल्या ९० लाख मनुष्यबळामध्ये ३० टक्के किंवा ३० लाख मनुष्यबळात २०२० पर्यंत कपात होईल, असे नॅसकॉमने म्हटले आहे. हा परिणाम रोबोट प्रोसेस ऑटोमेशन अथवा आरपीएने होणार आहे. सुमारे ०.७ दशलक्ष मनुष्यबळाची जागा ही आरपीए घेणार आहे. कारण, उद्योगांमध्ये तंत्रज्ञानातील अद्ययावतीकरण व कौशल्यातील बदलाने होणार आहे. आरपीएचा सर्वात वाईट परिणाम हा अमेरिकेत परिणाम होणार आहे.
हेही वाचा-नादारी प्रक्रियेतील डीएसके डेव्हलपरच्या खरेदीकरता दोन कंपन्यांकडून निविदा दाखल
आरपीएमुळे कंपन्यांच्या वार्षिक खर्चात होणार कपात-