भाऊसाहेब वाकचौरे गद्दार असून त्यांना उमेदवारी दिल्यानं अपयश येण्याची शक्यता - उत्कर्षा रुपवते - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/04-04-2024/640-480-21143258-thumbnail-16x9-bhausaheb-waghchoure.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Apr 4, 2024, 2:36 PM IST
शिर्डी Bhausaheb Waghchoure : लोकसभा निवडणुकीतील नाराजीचं नाट्य दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शिर्डी लोकसभेत काँग्रेसच्या कार्यकर्त्या उत्कर्षा रुपवते यांनी ‘यह वक्त बदलाव का’ असा नारा देत ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय. शिर्डी लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडं गेली आहे. त्यामुळं मतदारसंघात उमेदवार बदलून मिळावा, अशी मागणी रुपवते यांनी केलीय. वाकचौरे गद्दार असून उद्धव ठाकरेंच्या निष्ठेच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत, असा आरोप उत्कर्षा रुपवते यांनी उपस्थित केला आहे. शिर्डी लोकसभेत महाविकास आघाडीबाबत चांगलं वातावरण आहे. मात्र, उमेदवाराची निवड चुकल्यानं अपयशी येण्याची शक्यता असल्याचं रुपवते यांनी म्हटलंय. तसंच आपण शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगत पक्षश्रेष्ठींकडं मागणी केली आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची असायला हवी होती, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. उत्कर्षा रुपवते यांनी नुकतीच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून सकारात्मक चर्चेनंतर आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.