ETV Bharat / state

आठ महिन्यात पुतळा पडतोच कसा, न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी करा; संजय राऊतांची मागणी - Shivaji Maharaj Statue Incident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 10:57 AM IST

Updated : Aug 28, 2024, 1:59 PM IST

Sanjay Raut Demands SIT : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी न्यायाधीशांची एसआयटी चौकशी नेमून तपास करण्यात यावा अशी मागणी उबाठा खासदार संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut Demand SIT
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई Sanjay Raut Demands SIT : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची हानी झाल्या प्रकरणी महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला. आज महाविकास आघाडीच्या वतीनं या प्रकरणी आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरीकडं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणी न्यायाधीशांच्या मार्फत एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संजय राऊतांनी छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. पुतळा प्रकरणाचं ठाणे कनेक्शन असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Sanjay Raut Demand SIT
खासदार संजय राऊत (Reporter)

पुतळ्याचं ठाणे कनेक्शन : "आता सरकार आणि सरकारमधील मंत्री सांगताहेत की, पुतळा वाऱ्याच्या वेगानं पडला. पण तिथं आजूबाजूला नारळाची झाडं आहेत, घरं आहेत. त्या वाऱ्यानं ती घरं किंवा ती नारळीची झाडं पडली नाहीत. फक्त पुतळाच कसा काय पडला? याचा अर्थ पुतळ्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं. यात जलदगतीनं काम केलं म्हणजे यात कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला आहे. या पुतळ्याचं ठाणे कनेक्शन आहे," असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे पुत्र यांचाही यात संबंध आहे. अशा बातम्या समोर येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करणार आणि त्याच पैशातून तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार. हे बघून आम्ही फक्त निषेध करायचा... शांत बसायचं का?," असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

एसआयटी चौकशी झाली पाहिजे : "आज महाविकास आघाडीचा मालवणमध्ये निषेध मोर्चा आम्ही काढतोय. पण हे आंदोलन संपणार नाही. मी स्वतः परवा मालवणमध्ये जात आहेत. तिथं आम्ही आंदोलन करणार आहे. राज्यभरातून तिथं लोकं येतात. लोकांमध्ये संतापाची लाट आहे. आणि याच्या चौकशीसाठी न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली SIT ची स्थापना झाली पाहिजे," अशी मागणी संजय राऊतांनी केली. दरम्यान, मंत्री दीपक केसकर यांनी हा अपघात होता. काही चांगलं होण्यासाठी एक दुर्घटना घडली, असं म्हटले आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "मंत्री दीपक केसरकरांना XXXनं मारलं पाहिजे. सडक्या विचाराची माणसं महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं म्हणताहेत. यांच्या डोक्यातून हे विचार कसे येऊ शकतात. हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे. अशी लोकं आणि ही टोळी पोसण्याचं काम नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे या सर्वांला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत," असं राऊत म्हणाले. त्यामुळे "या सर्व लोकांनी पैसे खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला," असा आरोप नाही सत्य आहे असं राऊत म्हणाले.

नारायण राणेंना वेड लागलेलं आहे : काँग्रेसच्या काळात इमारती पडल्या, असं नारायण राणेंनी म्हटलंय, यावर बोलताना राऊत म्हणाले की, "नारायण राणेंना वेड लागलेलं आहे. तुम्ही मराठी माणूस आहात. इमारती आणि पुतळा पडणं यात फरक आहे. पण त्यांना एवढेच समजत नाही का, पंतप्रधान मोदींच्या काळात ब्रिज पडले. यावर राणेंनी बोलावं. पण हाच पुतळा दुसऱ्या सरकारच्या काळात पडला असता, तर हे आणि त्यांची दोन मुलं रस्त्यावर XXX नाचली असती. नारायण हे तिथले स्थानिक खासदार आहेत. अशी घटना घडल्यावर त्यांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे होतं. कंत्राटदार आणि शिल्पकार हे सध्या गायब आहेत. ते कुठं आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या मुलांना विचारा. असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे : पुतळ्याचा कामात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. अनेक वर्षापासून देशात समुद्रकाठी अनेक पुतळे उभे आहेत. देशात अनेक पुतळे आहेत, हाच पुतळा कसा पडला, ? फक्त 8 महिन्यात पुतळा कसा काय पडतो ? घाईगडबडीत निवडणुकीसाठी, मतासाठी हा पुतळा उभा केला होता. त्यामुळे न्यायाधीशांच्या नेतृत्वात चौकशीसाठी एसआयटीची स्थापना झाली पाहिजे. मी 30 तारखेला तिकडं जाणार आहे. आज आमचा तिकडं मोर्चा निघत आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदी जिथं हात लावतात तिथं माती होते; संजय राऊतांचा हल्लाबोल म्हणाले 'महाराजांचा पुतळा पाहून काळजात चर्रर झालं' - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. महिला अत्याचारावरुन उबाठा गटाचे आंदोलन; स्वप्ना पाटकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाल्या दादा या बहिणीची कशी मदत करणार ? - Swapna Patkar On Uddhav Thackeray
  3. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा; भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष, अत्याचाराच्या घटनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Devendra Fadnavis

मुंबई Sanjay Raut Demands SIT : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची हानी झाल्या प्रकरणी महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला. आज महाविकास आघाडीच्या वतीनं या प्रकरणी आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरीकडं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणी न्यायाधीशांच्या मार्फत एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संजय राऊतांनी छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. पुतळा प्रकरणाचं ठाणे कनेक्शन असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Sanjay Raut Demand SIT
खासदार संजय राऊत (Reporter)

पुतळ्याचं ठाणे कनेक्शन : "आता सरकार आणि सरकारमधील मंत्री सांगताहेत की, पुतळा वाऱ्याच्या वेगानं पडला. पण तिथं आजूबाजूला नारळाची झाडं आहेत, घरं आहेत. त्या वाऱ्यानं ती घरं किंवा ती नारळीची झाडं पडली नाहीत. फक्त पुतळाच कसा काय पडला? याचा अर्थ पुतळ्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं. यात जलदगतीनं काम केलं म्हणजे यात कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला आहे. या पुतळ्याचं ठाणे कनेक्शन आहे," असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे पुत्र यांचाही यात संबंध आहे. अशा बातम्या समोर येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करणार आणि त्याच पैशातून तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार. हे बघून आम्ही फक्त निषेध करायचा... शांत बसायचं का?," असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

एसआयटी चौकशी झाली पाहिजे : "आज महाविकास आघाडीचा मालवणमध्ये निषेध मोर्चा आम्ही काढतोय. पण हे आंदोलन संपणार नाही. मी स्वतः परवा मालवणमध्ये जात आहेत. तिथं आम्ही आंदोलन करणार आहे. राज्यभरातून तिथं लोकं येतात. लोकांमध्ये संतापाची लाट आहे. आणि याच्या चौकशीसाठी न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली SIT ची स्थापना झाली पाहिजे," अशी मागणी संजय राऊतांनी केली. दरम्यान, मंत्री दीपक केसकर यांनी हा अपघात होता. काही चांगलं होण्यासाठी एक दुर्घटना घडली, असं म्हटले आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "मंत्री दीपक केसरकरांना XXXनं मारलं पाहिजे. सडक्या विचाराची माणसं महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं म्हणताहेत. यांच्या डोक्यातून हे विचार कसे येऊ शकतात. हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे. अशी लोकं आणि ही टोळी पोसण्याचं काम नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे या सर्वांला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत," असं राऊत म्हणाले. त्यामुळे "या सर्व लोकांनी पैसे खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला," असा आरोप नाही सत्य आहे असं राऊत म्हणाले.

नारायण राणेंना वेड लागलेलं आहे : काँग्रेसच्या काळात इमारती पडल्या, असं नारायण राणेंनी म्हटलंय, यावर बोलताना राऊत म्हणाले की, "नारायण राणेंना वेड लागलेलं आहे. तुम्ही मराठी माणूस आहात. इमारती आणि पुतळा पडणं यात फरक आहे. पण त्यांना एवढेच समजत नाही का, पंतप्रधान मोदींच्या काळात ब्रिज पडले. यावर राणेंनी बोलावं. पण हाच पुतळा दुसऱ्या सरकारच्या काळात पडला असता, तर हे आणि त्यांची दोन मुलं रस्त्यावर XXX नाचली असती. नारायण हे तिथले स्थानिक खासदार आहेत. अशी घटना घडल्यावर त्यांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे होतं. कंत्राटदार आणि शिल्पकार हे सध्या गायब आहेत. ते कुठं आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या मुलांना विचारा. असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे : पुतळ्याचा कामात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. अनेक वर्षापासून देशात समुद्रकाठी अनेक पुतळे उभे आहेत. देशात अनेक पुतळे आहेत, हाच पुतळा कसा पडला, ? फक्त 8 महिन्यात पुतळा कसा काय पडतो ? घाईगडबडीत निवडणुकीसाठी, मतासाठी हा पुतळा उभा केला होता. त्यामुळे न्यायाधीशांच्या नेतृत्वात चौकशीसाठी एसआयटीची स्थापना झाली पाहिजे. मी 30 तारखेला तिकडं जाणार आहे. आज आमचा तिकडं मोर्चा निघत आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदी जिथं हात लावतात तिथं माती होते; संजय राऊतांचा हल्लाबोल म्हणाले 'महाराजांचा पुतळा पाहून काळजात चर्रर झालं' - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. महिला अत्याचारावरुन उबाठा गटाचे आंदोलन; स्वप्ना पाटकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाल्या दादा या बहिणीची कशी मदत करणार ? - Swapna Patkar On Uddhav Thackeray
  3. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा; भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष, अत्याचाराच्या घटनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Devendra Fadnavis
Last Updated : Aug 28, 2024, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.