ETV Bharat / state

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर माफी; म्हणाले... - PM Narendra Modi Apology

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 3:31 PM IST

Updated : Aug 30, 2024, 5:32 PM IST

Chhtrapati Shivaji Maharaj Statue : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं सत्ताधाऱ्यांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. या प्रकरणावरुन राज्यभर मोठा संताप व्यक्त करण्यात येत असतानाच गुरुवारी (29 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेप्रकरणी जनतेची जाहीर माफी मागितली आहे.

PM Narendra Modi public apology for falling the Shivaji Maharaj statue in Rajkot Fort performed Bhumi Pujan for Vadhavan port
नरेंद्र मोदी (ETV Bharat)

पालघर Chhtrapati Shivaji Maharaj Statue : नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. तसंच याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. असं असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV Bharat)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (30 ऑगस्ट) वाढवण इथल्या बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर सभेला संबोधित करत असताना मोदी यांनी मालवणमधील घटनेवरुन माफी मागितली. ते म्हणाले की, "2013 ला जेव्हा भारतीय जनता पक्षानं मला प्रधानमंत्री उमेदवार म्हणून निश्चित केलं तेव्हा सर्वात अगोदर मी रायगडच्या किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली होती. एक भक्त ज्या पद्धतीनं भक्ती भावानं प्रार्थना करतो, तसा मी राष्ट्रसेवेच्या कामाचा प्रारंभ केला होता. माझ्यासाठी, माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीत. ते आमच्यासाठी राजा, महाराजा, राजपुरुष ही नाहीत. मात्र, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे 'देव' आहेत. आज मी माझी मान झुकवून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो."

जनतेचीही मागितली माफी : पुढं ते म्हणाले की, "आमच्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. आम्ही तसे नाही आहोत जे सावरकरांना शिव्या देतात, त्यांची माफी मागत नाही. न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. हे सर्व करून त्यांना पश्चाताप होत नाही. आज इथं आल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांची क्षमा मागतोय. तसंच या घडलेल्या प्रकारामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या जनतेची सुद्धा माफी मागतो."

राष्ट्रवादीकडून टीका : दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगेच प्रत्युत्तर दिलंय. अशा चुकीला महाराज कधीच माफ करणार नाहीत असं ते म्हणालेत. यासंदर्भात जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट केली असून ते म्हणालेत की, "भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळं साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय!"

भारताच्या सागरी किनाऱ्यांचा विकास : यावेळी सागरी किनाऱ्यांच्या विकासासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले की, "गेल्या दशकात भारताच्या सागरी किनाऱ्यावरील विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. आम्ही आधुनिक बंदरे, जलमार्ग विकसित केलेत. या दिशेनं कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. गुंतवणूकही वाढली आहे. याचा फायदा तरुणांना मिळत असून आज संपूर्ण जगाचं लक्ष वाधवन बंदराकडं लागलंय. यामुळं या संपूर्ण प्रदेशाचं आर्थिक चित्र बदलेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक : "'मेक इन इंडिया', 'आत्मनिर्भर अभियान'चा लाभ महाराष्ट्रला होत आहे. परंतु हे दुर्भाग्य की महाराष्ट्रात विरोधी पक्षानं तुमच्या विकासावर नेहमीच ब्रेक लावायचा प्रयत्न केला. आम्हाला जगासोबत व्यापार करायला एक मोठ्या बंदराची आवश्यकता होती. महाराष्ट्रातील वाढवण बंदर ही सर्वात उपयुक्त जागा आहे. हे बंदर कुठल्याही मोसमात सतत कार्यरत राहील. परंतु याला मागील सरकारनं (आघाडी) ६० वर्षापासून रखडून ठेवलं. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर त्यावर गांभीर्यानं काम सुरू झालं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

भारताच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान : नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "राज्यात ५२६ मच्छीमारांची गावं व १५ लाख मच्छीमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राच्या मत्स्य बांधवांचे योगदान फार मोठं आहे. भारत विश्वातील सर्वात मोठा दुसऱ्या नंबरचा मत्स्य व्यवसाय करणारा देश आहे. २०१४ मध्ये देशात ८० लाख टन मत्स्य उत्पादन होत असे. आज १८० लाख टन मत्स्य उत्पादन भारत करत आहे. मागील १० वर्षांमध्ये मत्स्य उत्पादन दुप्पट केलं. भारताचं सीफूडसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत आहे."

हेही वाचा -

  1. राजकोट किल्ला पुतळा दुर्घटना प्रकरणी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागितली माफी, पण कुणाची? - CM Eknath Shinde Apology
  2. शिवाजी महाराज पुतळा प्रकरण : स्ट्रक्चरल डिझायनर चेतन पाटीलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Police Detain Chetan Patil
  3. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी गठीत केली संयुक्त तांत्रिक समिती, नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश - Chhtrapati Shivaji Maharaj Statue

पालघर Chhtrapati Shivaji Maharaj Statue : नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. तसंच याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. असं असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV Bharat)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (30 ऑगस्ट) वाढवण इथल्या बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर सभेला संबोधित करत असताना मोदी यांनी मालवणमधील घटनेवरुन माफी मागितली. ते म्हणाले की, "2013 ला जेव्हा भारतीय जनता पक्षानं मला प्रधानमंत्री उमेदवार म्हणून निश्चित केलं तेव्हा सर्वात अगोदर मी रायगडच्या किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली होती. एक भक्त ज्या पद्धतीनं भक्ती भावानं प्रार्थना करतो, तसा मी राष्ट्रसेवेच्या कामाचा प्रारंभ केला होता. माझ्यासाठी, माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीत. ते आमच्यासाठी राजा, महाराजा, राजपुरुष ही नाहीत. मात्र, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे 'देव' आहेत. आज मी माझी मान झुकवून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो."

जनतेचीही मागितली माफी : पुढं ते म्हणाले की, "आमच्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. आम्ही तसे नाही आहोत जे सावरकरांना शिव्या देतात, त्यांची माफी मागत नाही. न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. हे सर्व करून त्यांना पश्चाताप होत नाही. आज इथं आल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांची क्षमा मागतोय. तसंच या घडलेल्या प्रकारामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या जनतेची सुद्धा माफी मागतो."

राष्ट्रवादीकडून टीका : दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगेच प्रत्युत्तर दिलंय. अशा चुकीला महाराज कधीच माफ करणार नाहीत असं ते म्हणालेत. यासंदर्भात जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट केली असून ते म्हणालेत की, "भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळं साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय!"

भारताच्या सागरी किनाऱ्यांचा विकास : यावेळी सागरी किनाऱ्यांच्या विकासासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले की, "गेल्या दशकात भारताच्या सागरी किनाऱ्यावरील विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. आम्ही आधुनिक बंदरे, जलमार्ग विकसित केलेत. या दिशेनं कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. गुंतवणूकही वाढली आहे. याचा फायदा तरुणांना मिळत असून आज संपूर्ण जगाचं लक्ष वाधवन बंदराकडं लागलंय. यामुळं या संपूर्ण प्रदेशाचं आर्थिक चित्र बदलेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक : "'मेक इन इंडिया', 'आत्मनिर्भर अभियान'चा लाभ महाराष्ट्रला होत आहे. परंतु हे दुर्भाग्य की महाराष्ट्रात विरोधी पक्षानं तुमच्या विकासावर नेहमीच ब्रेक लावायचा प्रयत्न केला. आम्हाला जगासोबत व्यापार करायला एक मोठ्या बंदराची आवश्यकता होती. महाराष्ट्रातील वाढवण बंदर ही सर्वात उपयुक्त जागा आहे. हे बंदर कुठल्याही मोसमात सतत कार्यरत राहील. परंतु याला मागील सरकारनं (आघाडी) ६० वर्षापासून रखडून ठेवलं. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर त्यावर गांभीर्यानं काम सुरू झालं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

भारताच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान : नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "राज्यात ५२६ मच्छीमारांची गावं व १५ लाख मच्छीमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राच्या मत्स्य बांधवांचे योगदान फार मोठं आहे. भारत विश्वातील सर्वात मोठा दुसऱ्या नंबरचा मत्स्य व्यवसाय करणारा देश आहे. २०१४ मध्ये देशात ८० लाख टन मत्स्य उत्पादन होत असे. आज १८० लाख टन मत्स्य उत्पादन भारत करत आहे. मागील १० वर्षांमध्ये मत्स्य उत्पादन दुप्पट केलं. भारताचं सीफूडसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत आहे."

हेही वाचा -

  1. राजकोट किल्ला पुतळा दुर्घटना प्रकरणी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागितली माफी, पण कुणाची? - CM Eknath Shinde Apology
  2. शिवाजी महाराज पुतळा प्रकरण : स्ट्रक्चरल डिझायनर चेतन पाटीलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Police Detain Chetan Patil
  3. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी गठीत केली संयुक्त तांत्रिक समिती, नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश - Chhtrapati Shivaji Maharaj Statue
Last Updated : Aug 30, 2024, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.