ETV Bharat / state

विशाखापट्टणमला धोका, २०४० पर्यंत अनेक भाग पाण्यात बुडतील, 'सीएसटीईपी'ने दिला इशारा - Rising Sea Levels In Visakhapatnam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 6:04 PM IST

Rising Sea Levels In Visakhapatnam : केरळमधील भूस्खलनाच्या घटनेनंतर चिंताजनक बातमी आहे. बंगळुरू स्थित "सीएसटीईपी"ने केलेल्या अभ्यासात असं म्हटलं आहे की, वाढत्या समुद्र पातळीमुळे कोची, मंगलोर, विशाखापट्टणम, उडुपी आणि पुरीमधील 5 टक्के जमीन पाण्याखाली जाऊ शकते. वाचा संपूर्ण बातमी...

Rising Sea Levels In Visakhapatnam
विशाखापट्टणम शहर (File Photo)

विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) Rising Sea Levels In Visakhapatnam : सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसीने (सीएसटीईपी) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की, समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे 2040 पर्यंत विशाखापट्टणमचा सुमारे 1 ते 5 टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतो. या अभ्यासानुसार, पुढे जाणाऱ्या समुद्रामुळे होणाऱ्या धूपमुळे किनारपट्टीवरील सुमारे 6.96-7.43 चौरस किलोमीटर वाळूचे ढिगारे नष्ट होण्याची शक्यता आहे.

'हे' समुद्रकिनारे असुरक्षित : आकडेवारीनुसार, 1992 ते 2021 दरम्यान समुद्राची पातळी सतत वाढत आहे. ही समुद्राची पातळी 20 वर्षांत 0.181 सेंटीमीटर पासून 2.38 सेंटीमीटरपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ शहराचा एक-दोन टक्के किंवा सुमारे 7 चौरस किलोमीटरचा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. दुसरीकडं कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणाची टक्केवारी लक्षणीय वाढली तर 2100 पर्यंत 61.58 चौरस किलोमीटरचे नुकसान होईल. CSTEP या बंगळुरूस्थित थिंक टँकनं 15 भारतीय किनारपट्टीवरील शहरांचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार समुद्राजवळील विशाखापट्टणम बंदर, टेनेटी पार्क आणि रुशीकोंडा आणि मंगमरीपेटा समुद्रकिनारे विशेषत: असुरक्षित आहेत.

तर 'ही' क्षेत्र पाण्याखाली जाईल : 2040 पर्यंत मुंबई, यानम आणि थुथुकुडीमध्ये जमीन कमी होण्याचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त होईल. हे प्रमाण पणजी आणि चेन्नईमध्ये 5-10 टक्के आणि कोची, मंगलोर, विशाखापट्टणम, हल्दिया, उडुपी, पारादीप आणि पुरीमध्ये 1-5 टक्के राहण्याची शक्यता आहे. उच्च कार्बन उत्सर्जनाचादेखील फटका बसणार आहे. मुं बई आणि चेन्नईच्या तुलनेत मंगळूर, हल्दिया, पारादीप, थुथुकुडी आणि यानममध्ये ही टक्केवारी 2100 पर्यंत जास्त असेल. या अभ्यास प्रकल्पात वापरलेले हवामान मॉडेलनुसार समुद्र पातळीत वाढ (SLR) हे शतकाच्या अखेरीपर्यंत चालू राहणार आहे.

जलस्तर वाढण्याची कारणे : जागतिक तापमानवाढीमुळे वितळलेले बर्फ हे समुद्राची पातळी वाढण्याचं मुख्य कारण आहे. दुसरे कारण म्हणजे, विशाखापट्टणमच्या काठावर वसलेल्या टेकड्या समुद्रात बुडाल्या असल्या तरी येराडा टेकड्यांमुळे वाळूच्या नैसर्गिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सागरी अभ्यास विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ केएसआर मूर्ती यांनी सांगितले की, "यारडा टेकडीच्या पलीकडे असलेल्या आरके बीच आणि कुरुसुरा पाणबुडी संग्रहालयात यामुळे अधिक धूप होईल."

किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी ड्रेझरचा वापर : चेल्लानामच्या काठावर धूप रोखण्यासाठी 300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. विशाखा बंदर प्राधिकरण विशाखाच्या किनाऱ्यावरील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी ड्रेझरचा वापर करत आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ड्रेजिंगमधून मिळणारी वाळू पाईपद्वारे धूप झालेल्या भागात टाकली जाते. शिवाय, धूप रोखण्यासाठी उपाययोजना तीव्र केल्या पाहिजेत, असं तज्ञांचं मत आहे.

पाणी पातळीत वाढ झाल्यानं 'हा' धोका : समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचं कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग आहे. त्यामुळे हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची व्याप्ती वाढत आहे. किनारी भागात, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे किनारपट्टीची झीज होऊ शकते. खाऱ्या पाण्याच्या प्रवेशामुळे किनारपट्टीवरील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा धोक्यात येऊ शकतो. तसेच रहिवाशांना विस्थापित व्हावे लागू शकते. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे किनारपट्टीवर वादळ आणि पुराच्या घटनांमध्ये वाढ झाली. यासोबतच आधुनिक पायाभूत सुविधा आणि पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. विशाखापट्टणममध्ये समुद्रकिनारी असलेल्या आस्थापना धोक्यात येऊ शकतात. याशिवाय समुद्राजवळ वसलेल्या मासेमारी गावांनाही धोका निर्माण झाला आहे.

जलस्तरवाढीचा मुंबईलाही धोका : विशाखापट्टणम व्यतिरिक्त अहवालात असंही म्हटलं आहे की, कोची, मंगलोर, उडिपी आणि पुरीमधील 1-5 टक्के भूभागाला समुद्राची पातळी वाढण्याचा धोका आहे. दुसरीकडे मुंबई, यनाम आणि थुथुकुडीमध्ये 2040 पर्यंत 10 टक्के जमीन पाण्याखाली जाऊ शकते.

हेही वाचा:

  1. Thane News: तुर्कीत भूकंप, हजारोंची जीवितहानी; ठाण्यात उंच इमारती बनविताना गाईडलाईन आवश्यक
  2. Lightning Death in Maharashtra : राज्यात सहा महिन्यात वीज कोसळून १५७ बळी
  3. Chief Minister's Instructions : नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी टाळा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) Rising Sea Levels In Visakhapatnam : सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसीने (सीएसटीईपी) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की, समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे 2040 पर्यंत विशाखापट्टणमचा सुमारे 1 ते 5 टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतो. या अभ्यासानुसार, पुढे जाणाऱ्या समुद्रामुळे होणाऱ्या धूपमुळे किनारपट्टीवरील सुमारे 6.96-7.43 चौरस किलोमीटर वाळूचे ढिगारे नष्ट होण्याची शक्यता आहे.

'हे' समुद्रकिनारे असुरक्षित : आकडेवारीनुसार, 1992 ते 2021 दरम्यान समुद्राची पातळी सतत वाढत आहे. ही समुद्राची पातळी 20 वर्षांत 0.181 सेंटीमीटर पासून 2.38 सेंटीमीटरपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ शहराचा एक-दोन टक्के किंवा सुमारे 7 चौरस किलोमीटरचा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. दुसरीकडं कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणाची टक्केवारी लक्षणीय वाढली तर 2100 पर्यंत 61.58 चौरस किलोमीटरचे नुकसान होईल. CSTEP या बंगळुरूस्थित थिंक टँकनं 15 भारतीय किनारपट्टीवरील शहरांचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार समुद्राजवळील विशाखापट्टणम बंदर, टेनेटी पार्क आणि रुशीकोंडा आणि मंगमरीपेटा समुद्रकिनारे विशेषत: असुरक्षित आहेत.

तर 'ही' क्षेत्र पाण्याखाली जाईल : 2040 पर्यंत मुंबई, यानम आणि थुथुकुडीमध्ये जमीन कमी होण्याचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त होईल. हे प्रमाण पणजी आणि चेन्नईमध्ये 5-10 टक्के आणि कोची, मंगलोर, विशाखापट्टणम, हल्दिया, उडुपी, पारादीप आणि पुरीमध्ये 1-5 टक्के राहण्याची शक्यता आहे. उच्च कार्बन उत्सर्जनाचादेखील फटका बसणार आहे. मुं बई आणि चेन्नईच्या तुलनेत मंगळूर, हल्दिया, पारादीप, थुथुकुडी आणि यानममध्ये ही टक्केवारी 2100 पर्यंत जास्त असेल. या अभ्यास प्रकल्पात वापरलेले हवामान मॉडेलनुसार समुद्र पातळीत वाढ (SLR) हे शतकाच्या अखेरीपर्यंत चालू राहणार आहे.

जलस्तर वाढण्याची कारणे : जागतिक तापमानवाढीमुळे वितळलेले बर्फ हे समुद्राची पातळी वाढण्याचं मुख्य कारण आहे. दुसरे कारण म्हणजे, विशाखापट्टणमच्या काठावर वसलेल्या टेकड्या समुद्रात बुडाल्या असल्या तरी येराडा टेकड्यांमुळे वाळूच्या नैसर्गिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सागरी अभ्यास विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ केएसआर मूर्ती यांनी सांगितले की, "यारडा टेकडीच्या पलीकडे असलेल्या आरके बीच आणि कुरुसुरा पाणबुडी संग्रहालयात यामुळे अधिक धूप होईल."

किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी ड्रेझरचा वापर : चेल्लानामच्या काठावर धूप रोखण्यासाठी 300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. विशाखा बंदर प्राधिकरण विशाखाच्या किनाऱ्यावरील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी ड्रेझरचा वापर करत आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ड्रेजिंगमधून मिळणारी वाळू पाईपद्वारे धूप झालेल्या भागात टाकली जाते. शिवाय, धूप रोखण्यासाठी उपाययोजना तीव्र केल्या पाहिजेत, असं तज्ञांचं मत आहे.

पाणी पातळीत वाढ झाल्यानं 'हा' धोका : समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचं कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग आहे. त्यामुळे हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची व्याप्ती वाढत आहे. किनारी भागात, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे किनारपट्टीची झीज होऊ शकते. खाऱ्या पाण्याच्या प्रवेशामुळे किनारपट्टीवरील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा धोक्यात येऊ शकतो. तसेच रहिवाशांना विस्थापित व्हावे लागू शकते. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे किनारपट्टीवर वादळ आणि पुराच्या घटनांमध्ये वाढ झाली. यासोबतच आधुनिक पायाभूत सुविधा आणि पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. विशाखापट्टणममध्ये समुद्रकिनारी असलेल्या आस्थापना धोक्यात येऊ शकतात. याशिवाय समुद्राजवळ वसलेल्या मासेमारी गावांनाही धोका निर्माण झाला आहे.

जलस्तरवाढीचा मुंबईलाही धोका : विशाखापट्टणम व्यतिरिक्त अहवालात असंही म्हटलं आहे की, कोची, मंगलोर, उडिपी आणि पुरीमधील 1-5 टक्के भूभागाला समुद्राची पातळी वाढण्याचा धोका आहे. दुसरीकडे मुंबई, यनाम आणि थुथुकुडीमध्ये 2040 पर्यंत 10 टक्के जमीन पाण्याखाली जाऊ शकते.

हेही वाचा:

  1. Thane News: तुर्कीत भूकंप, हजारोंची जीवितहानी; ठाण्यात उंच इमारती बनविताना गाईडलाईन आवश्यक
  2. Lightning Death in Maharashtra : राज्यात सहा महिन्यात वीज कोसळून १५७ बळी
  3. Chief Minister's Instructions : नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी टाळा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.