ETV Bharat / sports

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची आंध्र प्रदेशात हवा; चाहत्याने सुरक्षा कठडे तोडले अन्... - Ruturaj Gaikwad

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 6, 2024, 4:23 PM IST

Updated : Sep 6, 2024, 7:33 PM IST

Ruturaj Gaikwad : आंध्र प्रदेशातील अनंतपूर इथं दुलीप ट्रॉफी इंडिया सी आणि इंडिया डी यांच्यात खेळली जात आहे. या सामन्यात एक विलक्षण नजारा पाहायला मिळाला. इंडिया सी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा चाहता मैदानात आला आणि त्याच्या पायाला स्पर्श करु लागला.

Ruturaj Gaikwad
ऋतुराज गायकवाड (ANI Photo)

अनंतपूर Ruturaj Gaikwad : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदामुळं ऋतुराज गायकवाडचा दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. याचं एक दृश्य दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातही पाहायला मिळालं. आंध्र प्रदेशातील अनंतपूर इथं इंडिया सी आणि इंडिया डी यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्यानं सुरक्षा कठडे तोडत तो मैदानात उतरला आणि इंडिया सी संघाचा कर्णधार असलेल्या गायकवाडच्या पायाला स्पर्श करुन परतला. सामन्यात हे अप्रतिम दृश्य पाहून त्याचे चाहते खूप खूश आहेत. दुसरीकडे, सुरक्षेतील प्रचंड त्रुटी असल्याचंही या घटनेचं वर्णन केलं जात आहे. यामुळं कोणत्याही खेळाडूचं नुकसान होऊ शकतं.

चाहत्याला कोणतंही नुकसान नाही : ऋतुराज गायकवाड भारतीय संघासाठी अनेक सामने खेळू शकलेला नाही. तो अजूनही संघातील स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं तो भारतीय क्रिकेटचा मोठा स्टार बनला आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये त्याचा खेळ पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते आले होते. यातील एकानं बॅरिकेडिंग ओलांडून गायकवाडला भेटण्यासाठी मैदानात दाखल झाला. मात्र, चाहत्याचं उद्दिष्ट फक्त सीएसकेच्या कर्णधाराला भेटायचं होतं. त्यामुळं त्याच्या पायाला स्पर्श करुन तो परतला. यात त्याला कोणतीही हानी झाली नाही. गायकवाडसाठी चाहत्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही देशांतर्गत स्पर्धांमध्ये अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.

गायकवाड फलंदाजीत अपयशी : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली इंडिया सी च्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्यांनी इंडिया डी संघाचा डाव केवळ 164 धावांत आटोपला. यात त्यानं अप्रतिम कर्णधारपद सांभाळलं. मात्र, जेव्हा त्याची फलंदाजीची पाळी आली तेव्हा त्याला मोठ्या धावा करण्यात अपयश आलं. संघाच्या पहिल्या डावाची सलामी देण्यासाठी गायकवाड मैदानात उतरला आणि वैयक्तिक 5 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला हर्षित राणानं बाद केलं. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत लवकर आउट होणं त्याच्यासाठी हानिकारक ठरु शकतं. मात्र, त्याला दुसऱ्या डावात धावा करण्याची आणखी एक संधी असेल.

हेही वाचा :

  1. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा साता समुद्रापार जलवा... आक्रमक फलंदाजीनं संघाला मिळवून दिला एकहाती विजय - Ajinkya Rahane

अनंतपूर Ruturaj Gaikwad : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदामुळं ऋतुराज गायकवाडचा दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. याचं एक दृश्य दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातही पाहायला मिळालं. आंध्र प्रदेशातील अनंतपूर इथं इंडिया सी आणि इंडिया डी यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्यानं सुरक्षा कठडे तोडत तो मैदानात उतरला आणि इंडिया सी संघाचा कर्णधार असलेल्या गायकवाडच्या पायाला स्पर्श करुन परतला. सामन्यात हे अप्रतिम दृश्य पाहून त्याचे चाहते खूप खूश आहेत. दुसरीकडे, सुरक्षेतील प्रचंड त्रुटी असल्याचंही या घटनेचं वर्णन केलं जात आहे. यामुळं कोणत्याही खेळाडूचं नुकसान होऊ शकतं.

चाहत्याला कोणतंही नुकसान नाही : ऋतुराज गायकवाड भारतीय संघासाठी अनेक सामने खेळू शकलेला नाही. तो अजूनही संघातील स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं तो भारतीय क्रिकेटचा मोठा स्टार बनला आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये त्याचा खेळ पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते आले होते. यातील एकानं बॅरिकेडिंग ओलांडून गायकवाडला भेटण्यासाठी मैदानात दाखल झाला. मात्र, चाहत्याचं उद्दिष्ट फक्त सीएसकेच्या कर्णधाराला भेटायचं होतं. त्यामुळं त्याच्या पायाला स्पर्श करुन तो परतला. यात त्याला कोणतीही हानी झाली नाही. गायकवाडसाठी चाहत्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही देशांतर्गत स्पर्धांमध्ये अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.

गायकवाड फलंदाजीत अपयशी : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली इंडिया सी च्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्यांनी इंडिया डी संघाचा डाव केवळ 164 धावांत आटोपला. यात त्यानं अप्रतिम कर्णधारपद सांभाळलं. मात्र, जेव्हा त्याची फलंदाजीची पाळी आली तेव्हा त्याला मोठ्या धावा करण्यात अपयश आलं. संघाच्या पहिल्या डावाची सलामी देण्यासाठी गायकवाड मैदानात उतरला आणि वैयक्तिक 5 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला हर्षित राणानं बाद केलं. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत लवकर आउट होणं त्याच्यासाठी हानिकारक ठरु शकतं. मात्र, त्याला दुसऱ्या डावात धावा करण्याची आणखी एक संधी असेल.

हेही वाचा :

  1. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा साता समुद्रापार जलवा... आक्रमक फलंदाजीनं संघाला मिळवून दिला एकहाती विजय - Ajinkya Rahane
Last Updated : Sep 6, 2024, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.