ETV Bharat / politics

मतदानासाठी 'त्यांनी' चक्क दुबईतून गाठलं संभाजीनगर, मतदान न करणाऱ्यांनी घ्यावा आदर्श - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी व्यावसायिक थेट दुबईहुन शहरात दाखल झाले. अवघ्या एका दिवसासाठी त्यानं एवढा मोठा प्रवास करत मतदारांसमोर नवा आदर्श ठेवलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 11:01 PM IST

मतदानासाठी त्यानं चक्क दुबईतून गाठलं संभाजीनगर
मतदानासाठी त्यानं चक्क दुबईतून गाठलं संभाजीनगर (ETV Bharat Reporter)
राकेश पाटील (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या तीन टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याचवेळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी व्यावसायिक थेट दुबईहुन शहरात दाखल झाला. अवघ्या एका दिवसासाठी त्यांनी एवढा मोठा प्रवास केला तोही मतदान करण्यासाठी. व्यवसाय दुबईत असला तरी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि देशाचं भविष्य चांगलं राहावं यासाठी मतदान केल्याची भावना व्यावसायिक राकेश पाटील यांनी व्यक्त केली. तसंच लोकांनी जास्तीत जास्त मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा जेणेकरुन एक चांगलं सरकार आपण देऊ शकू, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय.

कर्तव्य म्हणून केलं मतदान : शहरातील सिडको भागात राहणारे राकेश पाटील यांनी दुबईहून येऊन मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वीस वर्षापासून ते दुबई इथं व्यवसाय करत आहेत. मात्र, नाळ अद्यापही देशाशी जोडून आहेत. मतदान घोषित झाल्यानंतर आपलं कर्तव्य पार पाडावं असा निर्धार त्यांनी केला आणि त्यामुळंच 13 मे रोजी भारतात येऊन मतदान करायचं असा निश्चय त्यांनी केला आणि त्यांनी दुबईहून थेट संभाजीनगर गाठलं. ते सकाळी सात वाजता शहरात दाखल झाले, दुपारी तीन वाजता त्यांनी सिडको येथील संत मीरा शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. रात्री मुंबई आणि सकाळी तिथून दुबई असा प्रवास ते करणार आहेत. जगात सर्वात भक्कम लोकशाही भारतात असून ती बळकट करण्याचं आपले कर्तव्य असल्यानं मतदान केल्याचं राकेश पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

वेळोवेळी घेतला आढावा : राकेश पाटील वीस वर्षांपासून दुबई इथं प्लास्टिक कंपनी चालवतात. भारतात देखील त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केलाय. देशात निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदान करण्यासाठी येण्याचा निर्धार केला होता. त्यामुळं देशात नेमकी काय परिस्थिती चालू आहे, याचा आढावा वेळोवेळी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. वर्तमानपत्र, ऑनलाइन, डिजिटल मीडिया या माध्यमातून देशात होणाऱ्या प्रत्येक गोष्टींची माहिती सुरुवातीपासून घेत असायचो. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्या उमेदवाराचं काय काम आहे किंवा उमेदवाराचं काय सकारात्मक आणि नकारात्मक पैलू याबाबत माहिती घेतली. स्थानिक मित्रांसोबत त्यावर चर्चाही केली, त्यामुळं मतदान नेमकं कोणाला करायचा हे ठरवणं अगदी सोपं झालं. तीन दिवसांपूर्वी भारतात येण्यासाठी विमानाचं तिकीट बुक केलं आणि जाण्याचं देखील. त्यामुळं तीन दिवसात सर्व नियोजन करुन एका दिवसासाठी येत आपलं मतदान केल्याचं राकेश पाटील यांनी सांगितलं. पहिल्या तीन टप्प्यात देशात मतदान कमी झालंय. त्यामुळं सर्वांनी आपला मतदानाचा हक्क पूर्ण करा, असं आवाहन देखील राकेश पाटील यांनी भारतीयांना केलंय.

हेही वाचा :

  1. कुठं भाऊ, कुठं सासरा, कुठं बाप; लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा जास्त नात्यांची प्रतिष्ठा पणाला - Lok Sabha Election 2024
  2. गर्भवती महिलेनं रुग्णालयात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क, समाजासमोर नवा आदर्श - lok sabha election 2024

राकेश पाटील (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या तीन टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याचवेळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी व्यावसायिक थेट दुबईहुन शहरात दाखल झाला. अवघ्या एका दिवसासाठी त्यांनी एवढा मोठा प्रवास केला तोही मतदान करण्यासाठी. व्यवसाय दुबईत असला तरी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि देशाचं भविष्य चांगलं राहावं यासाठी मतदान केल्याची भावना व्यावसायिक राकेश पाटील यांनी व्यक्त केली. तसंच लोकांनी जास्तीत जास्त मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा जेणेकरुन एक चांगलं सरकार आपण देऊ शकू, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय.

कर्तव्य म्हणून केलं मतदान : शहरातील सिडको भागात राहणारे राकेश पाटील यांनी दुबईहून येऊन मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वीस वर्षापासून ते दुबई इथं व्यवसाय करत आहेत. मात्र, नाळ अद्यापही देशाशी जोडून आहेत. मतदान घोषित झाल्यानंतर आपलं कर्तव्य पार पाडावं असा निर्धार त्यांनी केला आणि त्यामुळंच 13 मे रोजी भारतात येऊन मतदान करायचं असा निश्चय त्यांनी केला आणि त्यांनी दुबईहून थेट संभाजीनगर गाठलं. ते सकाळी सात वाजता शहरात दाखल झाले, दुपारी तीन वाजता त्यांनी सिडको येथील संत मीरा शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. रात्री मुंबई आणि सकाळी तिथून दुबई असा प्रवास ते करणार आहेत. जगात सर्वात भक्कम लोकशाही भारतात असून ती बळकट करण्याचं आपले कर्तव्य असल्यानं मतदान केल्याचं राकेश पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

वेळोवेळी घेतला आढावा : राकेश पाटील वीस वर्षांपासून दुबई इथं प्लास्टिक कंपनी चालवतात. भारतात देखील त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केलाय. देशात निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदान करण्यासाठी येण्याचा निर्धार केला होता. त्यामुळं देशात नेमकी काय परिस्थिती चालू आहे, याचा आढावा वेळोवेळी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. वर्तमानपत्र, ऑनलाइन, डिजिटल मीडिया या माध्यमातून देशात होणाऱ्या प्रत्येक गोष्टींची माहिती सुरुवातीपासून घेत असायचो. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्या उमेदवाराचं काय काम आहे किंवा उमेदवाराचं काय सकारात्मक आणि नकारात्मक पैलू याबाबत माहिती घेतली. स्थानिक मित्रांसोबत त्यावर चर्चाही केली, त्यामुळं मतदान नेमकं कोणाला करायचा हे ठरवणं अगदी सोपं झालं. तीन दिवसांपूर्वी भारतात येण्यासाठी विमानाचं तिकीट बुक केलं आणि जाण्याचं देखील. त्यामुळं तीन दिवसात सर्व नियोजन करुन एका दिवसासाठी येत आपलं मतदान केल्याचं राकेश पाटील यांनी सांगितलं. पहिल्या तीन टप्प्यात देशात मतदान कमी झालंय. त्यामुळं सर्वांनी आपला मतदानाचा हक्क पूर्ण करा, असं आवाहन देखील राकेश पाटील यांनी भारतीयांना केलंय.

हेही वाचा :

  1. कुठं भाऊ, कुठं सासरा, कुठं बाप; लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा जास्त नात्यांची प्रतिष्ठा पणाला - Lok Sabha Election 2024
  2. गर्भवती महिलेनं रुग्णालयात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क, समाजासमोर नवा आदर्श - lok sabha election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.