ETV Bharat / entertainment

कंगना राणौतला भाजपानं दिला दम! शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यापासून घेतली फारकत - Kangana Ranaut

Kangana Ranaut : हिमाचलच्या मंडीतील भाजपा खासदार अभिनेत्री कंगना रणौतनं एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलय. यानंतर राजकीय नेत्यांपासून तर सोशल मीडिया यूजर्सच्या ती निशाण्यावर आली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 7:16 PM IST

kangana ranaut
कंगना राणौत (Actor-turned-politician Kangana Ranaut (ANI))

मुंबई - Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या वक्तव्याचा आणि भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलय. उलट भाजपानं एक निवेदन जारी केलं असून कंगना रणौतला धोरणात्मक बाबींवर बोलण्याची परवानगी नसल्याचं स्पष्ट केलय. भाजपा खासदार कंगनानं शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेलं विधान हे पक्षाचं मत नाही, असं सांगत पक्षानं एक निवेदन जारी केलं. कंगना राणौतच्या वक्तव्यावर भाजपानं असहमती व्यक्त केली आहे. कंगनानं पक्षाच्या वतीनं भाजपाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर भविष्यात असं कोणतंही वक्तव्य करू नये, असे तिला निर्देश देण्यात आले आहेत. कंगना म्हणाली होती की, जे बांगलादेशात झालं ते येथेही व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी आंदोलनात मृतदेह लटकत होते, बलात्कार होत होते. वाचा संपूर्ण बातमी...

कंगना राणौतचं वादग्रस्त विधान : कंगनानं असं म्हटलं होतं की, शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र सरकारच्या सतर्कतेमुळे तसं झालं नाही. कंगना राणौतच्या वक्तव्यावरुन बराच वाद आता निर्माण झाला आहे. याआधीही शेतकरी आंदोलनादरम्यान तिनं काही कमेंट्स केल्या होत्या, यानंतर तिच्याविरोधात संताप भडकला होता. यापूर्वी चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या सीआयएसएफच्या जवानानं तिच्यावर हल्ला केला होता. यानंतर कुलविंदरनं शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिची आईही सामील झाली होती असं सांगितलं होतं. कंगनानं आंदोलन करणाऱ्या महिलांबद्दल म्हटलं होतं की, या महिलांना प्रत्येकी 100 रुपये देऊन आणण्यात आल होतं, यानंतर अनेकजण तिच्यावर चिडले होते.

पक्षाचा कंगना राणौतला सल्ला : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक हिंसाचार पसरवत असल्याचं कंगना राणौतचं मत आहे. तिथे बलात्कार आणि हत्या होत असल्याचं तिनं म्हटलं होतं. केंद्र सरकारनं शेतकरी विधेयक मागे घेतलं नाहीतर तिथे भोंदूबाबांची खूप मोठी योजना होती. हे देशात काहीही करू शकतात. कंगनानं शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर पंजाबचे माजी काँग्रेस मंत्री राजकुमार वेरका यांनी तिला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, कंगना राणौत रोजच पंजाबच्या नेत्यांबद्दल वाईट बोलते. आता या विधाननंतर कंगना पुन्हा एकदा पंजाबमधील शेतकऱ्यांच्या नजरेत आली आहे.

हेही वाचा :

  1. कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी'मधील 'सिंहासन खाली करो' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - emergency
  2. भारतीय सेलेब्सनं रक्षाबंधननिमित्त दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पाहा पोस्ट - Raksha Bandhan 2024
  3. कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Emergency Trailer out

मुंबई - Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या वक्तव्याचा आणि भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलय. उलट भाजपानं एक निवेदन जारी केलं असून कंगना रणौतला धोरणात्मक बाबींवर बोलण्याची परवानगी नसल्याचं स्पष्ट केलय. भाजपा खासदार कंगनानं शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेलं विधान हे पक्षाचं मत नाही, असं सांगत पक्षानं एक निवेदन जारी केलं. कंगना राणौतच्या वक्तव्यावर भाजपानं असहमती व्यक्त केली आहे. कंगनानं पक्षाच्या वतीनं भाजपाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर भविष्यात असं कोणतंही वक्तव्य करू नये, असे तिला निर्देश देण्यात आले आहेत. कंगना म्हणाली होती की, जे बांगलादेशात झालं ते येथेही व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी आंदोलनात मृतदेह लटकत होते, बलात्कार होत होते. वाचा संपूर्ण बातमी...

कंगना राणौतचं वादग्रस्त विधान : कंगनानं असं म्हटलं होतं की, शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र सरकारच्या सतर्कतेमुळे तसं झालं नाही. कंगना राणौतच्या वक्तव्यावरुन बराच वाद आता निर्माण झाला आहे. याआधीही शेतकरी आंदोलनादरम्यान तिनं काही कमेंट्स केल्या होत्या, यानंतर तिच्याविरोधात संताप भडकला होता. यापूर्वी चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या सीआयएसएफच्या जवानानं तिच्यावर हल्ला केला होता. यानंतर कुलविंदरनं शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिची आईही सामील झाली होती असं सांगितलं होतं. कंगनानं आंदोलन करणाऱ्या महिलांबद्दल म्हटलं होतं की, या महिलांना प्रत्येकी 100 रुपये देऊन आणण्यात आल होतं, यानंतर अनेकजण तिच्यावर चिडले होते.

पक्षाचा कंगना राणौतला सल्ला : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक हिंसाचार पसरवत असल्याचं कंगना राणौतचं मत आहे. तिथे बलात्कार आणि हत्या होत असल्याचं तिनं म्हटलं होतं. केंद्र सरकारनं शेतकरी विधेयक मागे घेतलं नाहीतर तिथे भोंदूबाबांची खूप मोठी योजना होती. हे देशात काहीही करू शकतात. कंगनानं शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर पंजाबचे माजी काँग्रेस मंत्री राजकुमार वेरका यांनी तिला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, कंगना राणौत रोजच पंजाबच्या नेत्यांबद्दल वाईट बोलते. आता या विधाननंतर कंगना पुन्हा एकदा पंजाबमधील शेतकऱ्यांच्या नजरेत आली आहे.

हेही वाचा :

  1. कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी'मधील 'सिंहासन खाली करो' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - emergency
  2. भारतीय सेलेब्सनं रक्षाबंधननिमित्त दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पाहा पोस्ट - Raksha Bandhan 2024
  3. कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Emergency Trailer out
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.