ETV Bharat / sukhibhava

Increased Maternal Education : देशात मातृशिक्षण वाढल्याने पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूत झाली घट, संशोधकांनी केला 'हा' दावा

देशातील पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूदरात मातृशिक्षणामुळे घट झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हे संशोधन हेल्थ अँड प्लेस या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे.

author img

By

Published : Mar 28, 2023, 11:11 AM IST

Lower Under Five Deaths
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशात मातृशिक्षणात वाढ झाल्यामुळे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूत घट झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती हेल्थ अँड प्लेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून उघड झाली आहे. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील मातृशिक्षण आणि मुलांचे आरोग्य यांच्यातील संबंध शोधणारे हे पहिले संशोधन असल्याचा दावा या संशोधकांकडून करण्यात आला आहे.

मृत्यूदरावर शिक्षणाचा कसा होतो परिणाम : हे संशोधन ऑस्ट्रियातील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स अ‍ॅनालिसिस (IIASA) मधील संशोधक समीर के सी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी विकसनशील देशांमधील भविष्यातील लोकसंख्येची गतिशीलता समजून घेण्यासाठी पाच वर्षाखालील मृत्यूदरावर शिक्षणाचा कसा परिणाम होतो, हे समजून घेणे महत्वाचे असल्याचे नमूद केले आहे. या संशोधकांनी 1992 ते 1993 आणि 2019 ते 2021 दरम्यान केलेल्या भारतीय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS I-V) च्या पाच फेऱ्यांचे विश्लेषण केले. यात त्यांनी पाच वर्षांखालील मृत्यू दराची गणना प्रश्नावलीमधील डेटा वापरून केली आहे. यामध्ये महिलांच्या जन्म इतिहासाचा डेटा, मुलांची जन्मतारीख, जगण्याची स्थिती आणि प्रत्येक मुलाच्या बाबतची तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली. प्रश्नावलीने वय, शिक्षण, धर्म, जात आणि पुनरुत्पादक वर्तन यासारखी अतिरिक्त माहिती देखील जमा केली आहे. गोळा केलेला डेटा नंतर पाच वर्षांखालील मृत्यूच्या अंदाजाचे विश्लेषण करण्यासाठी संगणक मॉडेलमध्ये देण्यात आल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

ग्रामीण भागात पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर जास्त : या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ग्रामीण भारतामध्ये पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर जास्त राहिल्याचा दावा केला आहे. ग्रामीण भागातील गरीब, सामाजिक-आर्थिक आणि आरोग्य सेवेमुळे हा मृत्यूदर जास्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सामाजिक आर्थिक आणि मातृ आरोग्य यांच्या भविष्यातील बाबींवर नियंत्रण ठेवल्यास पूर्वीच्या सर्वेक्षणांमध्ये अलिकडच्या वर्षांत एकत्रित झालेल्या शहरी भागात पाच वर्षाखालील मृत्यूचा उच्च धोका दर्शविला गेला आहे. परिणामी ग्रामीण आणि शहरी भागात कोणताही महत्त्वपूर्ण फरक नसल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

वाढत्या मातृशिक्षणामुळे मुलांच्या मृत्यू दरात घट : संशोधक समीर के सी यांनी केलेल्या दाव्यात देशात मातृ शिक्षणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यू दरात घट झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अलिकडच्या वर्षांत मातांमध्ये शिक्षणामुळे जन्मलेल्या पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूदरात कोणतेही लक्षणीय फरक आढळले नाहीत. परंतु भूतकाळात मातृशिक्षणाचा मृत्यूदरावर परिणाम झाला होता, असा दावाही या संशोधकांनी केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात फरक असल्याचेही या संशोधनात योगदान देणारे संशोधक मोराध्वज यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - New Techniques Of Disease Diagnosis : कोविडमुळे रोग निदानाची आली नवीन तंत्रे ; आता प्रगती थांबू नये

नवी दिल्ली : देशात मातृशिक्षणात वाढ झाल्यामुळे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूत घट झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती हेल्थ अँड प्लेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून उघड झाली आहे. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील मातृशिक्षण आणि मुलांचे आरोग्य यांच्यातील संबंध शोधणारे हे पहिले संशोधन असल्याचा दावा या संशोधकांकडून करण्यात आला आहे.

मृत्यूदरावर शिक्षणाचा कसा होतो परिणाम : हे संशोधन ऑस्ट्रियातील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स अ‍ॅनालिसिस (IIASA) मधील संशोधक समीर के सी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी विकसनशील देशांमधील भविष्यातील लोकसंख्येची गतिशीलता समजून घेण्यासाठी पाच वर्षाखालील मृत्यूदरावर शिक्षणाचा कसा परिणाम होतो, हे समजून घेणे महत्वाचे असल्याचे नमूद केले आहे. या संशोधकांनी 1992 ते 1993 आणि 2019 ते 2021 दरम्यान केलेल्या भारतीय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS I-V) च्या पाच फेऱ्यांचे विश्लेषण केले. यात त्यांनी पाच वर्षांखालील मृत्यू दराची गणना प्रश्नावलीमधील डेटा वापरून केली आहे. यामध्ये महिलांच्या जन्म इतिहासाचा डेटा, मुलांची जन्मतारीख, जगण्याची स्थिती आणि प्रत्येक मुलाच्या बाबतची तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली. प्रश्नावलीने वय, शिक्षण, धर्म, जात आणि पुनरुत्पादक वर्तन यासारखी अतिरिक्त माहिती देखील जमा केली आहे. गोळा केलेला डेटा नंतर पाच वर्षांखालील मृत्यूच्या अंदाजाचे विश्लेषण करण्यासाठी संगणक मॉडेलमध्ये देण्यात आल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

ग्रामीण भागात पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर जास्त : या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ग्रामीण भारतामध्ये पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर जास्त राहिल्याचा दावा केला आहे. ग्रामीण भागातील गरीब, सामाजिक-आर्थिक आणि आरोग्य सेवेमुळे हा मृत्यूदर जास्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सामाजिक आर्थिक आणि मातृ आरोग्य यांच्या भविष्यातील बाबींवर नियंत्रण ठेवल्यास पूर्वीच्या सर्वेक्षणांमध्ये अलिकडच्या वर्षांत एकत्रित झालेल्या शहरी भागात पाच वर्षाखालील मृत्यूचा उच्च धोका दर्शविला गेला आहे. परिणामी ग्रामीण आणि शहरी भागात कोणताही महत्त्वपूर्ण फरक नसल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

वाढत्या मातृशिक्षणामुळे मुलांच्या मृत्यू दरात घट : संशोधक समीर के सी यांनी केलेल्या दाव्यात देशात मातृ शिक्षणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यू दरात घट झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अलिकडच्या वर्षांत मातांमध्ये शिक्षणामुळे जन्मलेल्या पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूदरात कोणतेही लक्षणीय फरक आढळले नाहीत. परंतु भूतकाळात मातृशिक्षणाचा मृत्यूदरावर परिणाम झाला होता, असा दावाही या संशोधकांनी केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात फरक असल्याचेही या संशोधनात योगदान देणारे संशोधक मोराध्वज यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - New Techniques Of Disease Diagnosis : कोविडमुळे रोग निदानाची आली नवीन तंत्रे ; आता प्रगती थांबू नये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.