ETV Bharat / state

यवतमाळच्या ६ तालुक्यांना भूकंपाचे सौम्य झटके, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

author img

By

Published : Jun 22, 2019, 2:25 AM IST

यवतमाळमधील आर्णी, महागाव, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, घाटंजी या सहा तालुक्यांना शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य झटके बसले.

भूकंपामुळे घरावरील पडलेले पत्रे

यवतमाळ - आर्णी, महागाव, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, घाटंजी तालुक्यातील गावात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रतेमुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील काही घरांना तडे गेले आहेत. तर महागाव तालुक्यातील, डोंगरगाव, हिवरा,फुलसावंगी, वरोडी, पोहंडूळ, धनोडा, पेढी, काळी (दौ), बोरी इजारा, साई, करंजखेड, कासारबेहळ, काळी टेंभी आणि चिल्ली अशा ६० गावात भूकंपाचे झटके जाणवले. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

भूकंपाबाबत माहिती देताना नागरिक

जिल्ह्यातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. काही गावांतील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले. यात कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आर्णी तालुक्यातील, सावळीपासून १ किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी यासह इतर ८ ते १० गावातही भूकंपाचे धक्के जाणवले. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने मध्यरात्री २ आणि ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे झटके बसू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. या भागात शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यवतमाळ - आर्णी, महागाव, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, घाटंजी तालुक्यातील गावात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रतेमुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील काही घरांना तडे गेले आहेत. तर महागाव तालुक्यातील, डोंगरगाव, हिवरा,फुलसावंगी, वरोडी, पोहंडूळ, धनोडा, पेढी, काळी (दौ), बोरी इजारा, साई, करंजखेड, कासारबेहळ, काळी टेंभी आणि चिल्ली अशा ६० गावात भूकंपाचे झटके जाणवले. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

भूकंपाबाबत माहिती देताना नागरिक

जिल्ह्यातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. काही गावांतील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले. यात कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आर्णी तालुक्यातील, सावळीपासून १ किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी यासह इतर ८ ते १० गावातही भूकंपाचे धक्के जाणवले. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने मध्यरात्री २ आणि ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे झटके बसू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. या भागात शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Intro:सहा तालुक्यांना भुकंपाचे सौम्य झटके
आर्णी, महागाव, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, घाटंजीBody:यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी, महागाव, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, घाटंजी तालुक्यातील गावांत शुक्रवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रतेमुळे
उमरखेड, महागाव तालुक्यातील काही घरांना तडे गेल्याची माहिती आहे. महागाव तालुक्यातील, डोंगरगाव, हिवरा,फुलसावंगी, वरोडी, पोहंडुळ, धनोडा, पेढी, काळी (दौ), बोरी इजारा, साई, करंजखेड, कासारबेहळ, काळी टेंभी, चिल्ली अश्या 60 गावात भुकंपाचे झटके जाणवले. यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. तालुक्यातील , बोरी इजारा ,साई कळी, वरोडी, करंजखेड या गावातील अनेक घरांना तडे गेले आहे. तर अनेकांच्या घरातील भांडी पडल्यामुळे सर्व नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. तर अनेक गावात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. काही गावांतील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले. यात कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती दिली.
आर्णी तालुक्यातील, सावळीपासून एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी यासह इतर 8 ते 10 गावात भूकंपाचेधक्के जाणवले.
उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाकडून मध्यरात्रि 12.5 मीनीटानी परत एक झटका लागू शकन्याची तसेच 2.03 मिनिटानी आनी 4.07 मिनीटानी भूकंपाचा झटका लागू शकण्याची शक्यता वर्तवली आहे. या भागात शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहें.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.