ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, प्रशासन मात्र निवडणुकीत मग्न - loksabha election

मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना एका किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे.

खड्ड्यातून पाणी भरताना गावकरी
author img

By

Published : Apr 16, 2019, 1:49 PM IST

Updated : Apr 16, 2019, 9:59 PM IST

वाशिम - दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना एका किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. गावात पाण्याचे स्रोत नसल्याने महिलांना खड्ड्यातील पाणी कटोरा घेऊन घोट-घोट जमा करावे लागत आहे. रात्रंदिवस पाण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने अनेक कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली आहे.

मालेगाव तालुक्यातील खैरखेडा हे १५०० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात बहुतांश आदिवासी आणि बंजारा समाजाचे कुटुंब वास्तव्यास आहे. या गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी केली असून प्रशासन निवडणुकीत मग्न असल्याने अजूनही गावात टँकर सुरू झाले नाहीत. परिणामी नागरिकांवर रात्रंदिवस भटकंती करण्याची वेळ आली आहे.

वाशिम जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, प्रशासन मात्र निवडणुकीत मग्न

खैरखेडा हे गाव अकोला लोकसभा मतदारसंघात येत असून येथील विद्यमान खासदार संजय धोत्रे गेल्या दहा वर्षांत एकदाही गावाकडे फिरकले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. फक्त निवडणुकीच्या काळात या गावात मत मागण्यासाठी प्रचाराची गाडी येते. मात्र, आमच्या समस्या कुणीच जाणून घेत नसल्याचे येथील महिला सांगतात.

मागील तीन वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळी कमालीची घटत आहे. त्यामुळे गावातील विहिरी-बोअरवेल्स आटले आहेत. गावात पाण्याचे दुर्भिक्ष असून नाल्यावर थोडा खड्डा करून त्यामधील घोट-घोट पाणी जमा करून आणत आहेत. दूषित पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे महिला सांगतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सद्यस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करून आपली पोळी भाजण्याचे काम करीत आहेत. तर अधिकारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामात मग्न आहेत. त्यामुळे दाद मागायची कुणीकडे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे. ज्या मतदाराच्या भरवश्यावर निवडणूक जिंकायची त्यांचाच विसर सर्वच पक्षांना पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता अशा पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ असून त्रस्त झालेले नागरिक त्यांना मतपेटीतूनच उत्तर देतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाशिम - दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना एका किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. गावात पाण्याचे स्रोत नसल्याने महिलांना खड्ड्यातील पाणी कटोरा घेऊन घोट-घोट जमा करावे लागत आहे. रात्रंदिवस पाण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने अनेक कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली आहे.

मालेगाव तालुक्यातील खैरखेडा हे १५०० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात बहुतांश आदिवासी आणि बंजारा समाजाचे कुटुंब वास्तव्यास आहे. या गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी केली असून प्रशासन निवडणुकीत मग्न असल्याने अजूनही गावात टँकर सुरू झाले नाहीत. परिणामी नागरिकांवर रात्रंदिवस भटकंती करण्याची वेळ आली आहे.

वाशिम जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, प्रशासन मात्र निवडणुकीत मग्न

खैरखेडा हे गाव अकोला लोकसभा मतदारसंघात येत असून येथील विद्यमान खासदार संजय धोत्रे गेल्या दहा वर्षांत एकदाही गावाकडे फिरकले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. फक्त निवडणुकीच्या काळात या गावात मत मागण्यासाठी प्रचाराची गाडी येते. मात्र, आमच्या समस्या कुणीच जाणून घेत नसल्याचे येथील महिला सांगतात.

मागील तीन वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळी कमालीची घटत आहे. त्यामुळे गावातील विहिरी-बोअरवेल्स आटले आहेत. गावात पाण्याचे दुर्भिक्ष असून नाल्यावर थोडा खड्डा करून त्यामधील घोट-घोट पाणी जमा करून आणत आहेत. दूषित पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे महिला सांगतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सद्यस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करून आपली पोळी भाजण्याचे काम करीत आहेत. तर अधिकारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामात मग्न आहेत. त्यामुळे दाद मागायची कुणीकडे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे. ज्या मतदाराच्या भरवश्यावर निवडणूक जिंकायची त्यांचाच विसर सर्वच पक्षांना पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता अशा पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ असून त्रस्त झालेले नागरिक त्यांना मतपेटीतूनच उत्तर देतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:अँकर:- दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात जानेवारी पासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना एका किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत आहे.गावात पाण्याचे स्रोत नसल्याने महिलांना खड्ड्यातील पाणी कटोरा घेऊन घोट-घोट जमा करून आणावं लागत आहे. रात्र दिवस पाण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने अनेक कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.....
Body:व्हीओ:- मालेगाव तालुक्यातील खैरखेडा हे 1500 लोकसंख्या असलेलं गाव या गावात बहुतांश आदिवासी आणि बंजारा समाजाचे कुटुंब वास्तव्यास आहे.या गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी केली असून प्रशासन निवडणुकीत मग्न असल्यानं अजूनही गावात टँकर सुरू झाले नाही परिणामी नागरिकांवर रात्रंदिवस भटकंती करण्याची वेळ आली आहे.

व्हीओ:- खैरखेडा हे गाव अकोला लोकसभा मतदारसंघात येत असून येथील विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी गेल्या दहा वर्षात एकदाही गावाकडे फिरकले नसून फक्त निवडणुकीच्या काळात या गावात मत मागण्यासाठी प्रचाराची गाडी येते मात्र आमच्या समस्या कुणीच जाणून घेत नसल्याचं महिला सांगतात...

Conclusion:व्हीओ:- मागील तीन वर्षांपासून कमी प्रजन्यमानामुळं पाणी पातळी कमालीची घटत आहे.त्यामुळं गावातील विहिरी बोअरवेल्स कोरड्या पडल्या आहेत.गावात पाण्याचं दुर्भिक्ष असून नाल्यावर थोडा खड्डा करून त्यामधील घोट-घोट पाणी जमा करून आणावं लागतं त्यामुळं दूषित पाणी असल्यानं आरोग्यासाठी घातक असल्याचं महिला सांगतात.त्यामुळं जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी समस्या निकाली काढावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत...

व्हीओ:- सद्यस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करून आपली पोळी भाजण्याचं काम करीत आहेत.तर अधिकारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामात मग्न आहेत.त्यामुळं दाद मागायची कुणीकडे असा प्रश्न ग्रामस्थाला पडला आहे..

व्हीओ:- अकोला लोकसभा मतदारसंघात येत्या 18 तारखेला मतदान होणार आहे. ज्या मतदाराच्या भरवश्यावर निवडणूक जिंकायची त्यांचाच विसर सर्वच पक्षांना पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता अशा पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ असून त्रस्त झालेले नागरिक त्यांना मतपेटीतूनच उत्तर देतील का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे...

बाईट:- भारती राठोड महिला
बाईट:- मारुसिंग राठोड ग्रामस्थ
बाईट:- साजीबाई जाधव महिला
बाईट:- उषा शेळके महिला
Last Updated : Apr 16, 2019, 9:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.