वर्धा - 'गोसंवर्धन गोरस भंडार' या संस्थेमुळे वर्ध्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पण यंदा चाराटंचाईसह अनेक कारांणामुळे दूध उत्पादन घटले. परिणामी याचा फटका दूध उत्पादन कमी झाल्याने संस्थेला बसला आहे. गोरस भंडार विविध अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. ही संस्था तोट्यातून वाटचाल करत असून दुग्ध उत्पादकांना तसच संस्थेलाही चार पैसे पदरी पडण्यासाठी दुधाच्या दरात वाढ करण्यात आली. असे असले तरी सध्या संस्था ३८लाखांनी तोट्यात आहे.
संस्थेला अखिल भारतीय गो सेवा संघाच्या मार्फत वर्ध्यात गो संवर्धन गोरस भंडार ही संस्था सुरू झाली. महात्मा गांधी, विनोबा भावे, जमनालाल बजाज या विभूतींच्या संकल्पनेतून १९३९ मध्ये ही संस्था सुरू झाली. १९६१ मध्ये संस्थेची स्थापना सहकारी तत्वावर झाली. हळूहळू व्याप वाढला. शहरात ठिकठिकाणी गोरस भंडार केंद्र उदयास आली. लोकांना चांगल्या प्रतीचे दुध यासह दुधापासून निर्माण झालेले पदार्थ मिळू लागले. ही संस्था ५९ व्या वर्षात पदार्पण करत असताना यंदा प्रथमच दूध टंचाईचा सामना करावा लागत आहे. संस्थेला दररोज १० हजार लिटर दुधाची गरज असताना साडेआठ हजार लिटर पर्यंतच दुध मिळत आहे. त्याचा परिमाण विक्री, सह दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर होता असल्याने सध्या घाटा सहन करावा लागत आहे.
दुधाची आवक कमी असल्याने पदार्थ निर्मिती घटली. दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात वाढ केली. ढेप, वैरण, पशुखाद्यचे भाव वाढल्याने दुग्ध उत्पादकांनीही तशी मागणी केली होती. आता त्यांना लिटरमागे 39 रुपये दर मिळणार आहे. संस्थेचे शहरात विविध दूध विक्री केंद्र आहे. या परिस्थितीतून सुरळीत वाटचाल करण्यासाठी भाव वाढ करून या परिस्थितीवर मात कारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.