ETV Bharat / state

वर्ध्यात २९८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक, ४ ग्रामपंचायती बिनविरोध

वर्धा जिल्ह्यात २९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यातील ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून उर्वरीत २९४ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्चला मतदान होणार आहे.

author img

By

Published : Mar 23, 2019, 6:46 PM IST

निवडणूक कर्मचारी

वर्धा - देशभरात लोकसभा निवडणुकींचे वारे वाहत असतानाच वर्ध्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत. यातील ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच उर्वरित २९४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होईल.

निवडणूक कर्मचारी

एकाच वेळी इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणारा वर्धा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. या निवडणुकीत ४ लाख ८१ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २९४ सरपंच आणि ४३७० सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून, मोठा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे.

नागरिकांचे सकारात्मक पाऊल - बिनविरोध निवडणुका

अलिकडे निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. यासाठी गावात प्रचंड चुरशीच्या लढती होतात. या वातावरणात वर्ध्यातील उमरी मेघे, देवळीतील बाभूळगाव बोबडे, कारंजा तालुक्यातील धावसा (बु) आणि किन्हाला या ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणुका करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

रविवारी १०३३ मतदान केंद्रांवर ४१३२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कार्यरत असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयातून त्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ११५१ कंट्रोल युनिट, तर २३०० बॅलेट युनिट असणार आहे. मतदान केंद्रापर्यंत कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी ४२८ परिवहन मंडळ आणि खासगी वाहनांचा वापर करण्यात आला आहे.

यासाठी यंदा सरपंच पदासाठी थेट मतदान होणार आहे.

जिल्ह्यात २९४ सरपंच पदासाठी २३२९ उमेदवार तर १५११ ग्रामपंचायत सदस्यासाठी ४३७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तसेच ४ लाख ८१ हजार ८१५ उमेदवार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणूक घेणारा वर्धा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्डचे सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.

निवडणुकीवेळी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून १०३३ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ४ उपअधीक्षक, असे ६५ अधिकारी या निवडणुकीवर नजर ठेवून असणार आहे. १०३३ कर्मचाऱ्यांसह ४५० होमगार्ड मदतीला असणार आहे.

वर्धा - देशभरात लोकसभा निवडणुकींचे वारे वाहत असतानाच वर्ध्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत. यातील ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच उर्वरित २९४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होईल.

निवडणूक कर्मचारी

एकाच वेळी इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणारा वर्धा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. या निवडणुकीत ४ लाख ८१ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २९४ सरपंच आणि ४३७० सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून, मोठा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे.

नागरिकांचे सकारात्मक पाऊल - बिनविरोध निवडणुका

अलिकडे निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. यासाठी गावात प्रचंड चुरशीच्या लढती होतात. या वातावरणात वर्ध्यातील उमरी मेघे, देवळीतील बाभूळगाव बोबडे, कारंजा तालुक्यातील धावसा (बु) आणि किन्हाला या ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणुका करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

रविवारी १०३३ मतदान केंद्रांवर ४१३२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कार्यरत असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयातून त्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ११५१ कंट्रोल युनिट, तर २३०० बॅलेट युनिट असणार आहे. मतदान केंद्रापर्यंत कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी ४२८ परिवहन मंडळ आणि खासगी वाहनांचा वापर करण्यात आला आहे.

यासाठी यंदा सरपंच पदासाठी थेट मतदान होणार आहे.

जिल्ह्यात २९४ सरपंच पदासाठी २३२९ उमेदवार तर १५११ ग्रामपंचायत सदस्यासाठी ४३७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तसेच ४ लाख ८१ हजार ८१५ उमेदवार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणूक घेणारा वर्धा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्डचे सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.

निवडणुकीवेळी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून १०३३ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ४ उपअधीक्षक, असे ६५ अधिकारी या निवडणुकीवर नजर ठेवून असणार आहे. १०३३ कर्मचाऱ्यांसह ४५० होमगार्ड मदतीला असणार आहे.

Intro:वर्ध्यात 294 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, मतदान पूर्वीच 4 ग्रामपंचायत अविरोध

-सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणूक असणारा महाराष्ट्रतील एकमेव जिल्हा,
- 4 लाख 81 हजार मतदाते बाजवणार हक्क
- 294 सरपंच तर 4370 सदस्य रिंगणात

जिल्ह्यात 298 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. यातील चार ग्रामपंचायत अविरोध निवडणूक आल्या आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील 294 ग्रामपंचायतीवर निवडणूक होणार आहे. सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरवात होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तय्यारी करण्यात आली असून मोठा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात उद्या मतदान होणार आहे. हे माडतां लोकसभेच्या पूर्वी होणार असल्याने प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनवर चांगलाच ताण असणार आहे. सकाळी 1हजार 33 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे.

नागरिकांचे सकारात्मक पाऊल अविरोध ग्रामपंचायत चार

आज निवडणुकांनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. यासाठी गावात प्रचंड चुरशीत लढत होता असतात. या वातावरणात वर्ध्यातील उमरी मेघे, देवळीतील बाभूळगाव बोबडे, कारंजा तालुक्यातील धावसा(बु) आणि किन्हाला या ग्रामपंचायतीने वेगळा आदर्श निर्माण केलाय.

यात उद्या 294 ग्रामपंचायत निवडणुकीला 1033 मतदान केंद्रांवर 4132 कर्मचाऱ्याचा फौज फाटा यासाठी कार्यरत असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यलयातून त्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 1151 कंट्रोल युनिट, तर 2300 बँलेट युनिट असणार आहे. मतदार केंद्रापर्यंत पोहचविण्याससाठी परिवहन मंडळ आणि खाजगी अश्या 428 वाहनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांना पोहचविण्यात आले आहे.

###यासाठी यंदा सरपंच पदासाठी थेट मतदान होणार आहे. ####
जिल्ह्यात 294 सरपंच पदासाठी 2329 उमेदवार तर 1511 ग्रामपंचायत सदस्यासाठी 4370 उमेदवार निवडणूकीच्या रिंगनात असणार आहे. यासाठी 4 लाख 81 हजार 815 उमेदवार मतदानाचा हक्क बाजवणार आहे. यात निवडणुकीचे टक्केवारी सुद्धा ग्रामपंच्यात निवडणुकीत विजयी उमेदवारासाठी महत्वाची असते. अशातच बाहेर गावी असणाऱ्या उमेदवाऱ्याना गावात आणून मतदान करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न हा कुतूहलाचा विषय पाहायला मिळतो.

एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक असणारा महाराष्ट्रही एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. पोलीसना मदतीसाठी होमगार्डचे सुद्धा पाचारण करण्यात येते. यामध्ये प्रत्यके मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पदवी म्हणून 1033 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार उपअधीक्षक, असे 65 अधिकारी नजर ठेवून असणार आहे. 1033 कर्मचाऱ्यांसह 450 होमगार्ड मदतीला असणार आहे.





Body:पराग ढोबळे,वर्धा



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.