ETV Bharat / state

वर्ध्यात तलावाच्या भिंतीला भेगा; गावकऱ्यांनी भीतीने सोडले गाव

आर्वी तालुक्यातील बारा (सोनेगाव) लगतच्या कुर्‍हा येथील तलावाच्या पाळ म्हणजेच भिंतीला भेगा पडलेल्या दिसताच, गावकऱ्यांनी भीतीने गाव सोडले आहे. आता लगेच तलाव फुटण्याची भीती नसली तरी सतत पडणारा पाऊस पाहता हा धोका नाकारला जाऊ शकत नाही. यामुळे अगोदरच बार्‍हा गावातील ४२ घरातील १५० जणांचे रसुलाबाद येथे स्थलांतर करण्यात आले आहे.

author img

By

Published : Sep 8, 2019, 12:34 PM IST

तलावाच्या भिंतीला भेगा, गावकऱ्यांनी भीतीने सोडले गाव...

वर्धा - आर्वी तालुक्यातील बारा (सोनेगाव) लगतच्या कुर्‍हा येथील तलावाच्या पाळ म्हणजेच भिंतीला भेगा पडलेल्या दिसताच, गावकऱ्यांनी भीतीने गाव सोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पाटबंधारे विभागाच्या वतीने बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भेगा पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, अतिवृष्टी झाल्यास होणारा धोका लक्षात घेत, तहसील प्रशासनाच्या वतीने दीडशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

तलावाच्या भिंतीला भेगा पडल्याने गावकऱ्यांनी भीतीने सोडले गाव

बार्‍हा गावाजवळ पाटबांधारे विभागाचा चाळीस वर्षांपूर्वीचा पुरातन तलाव आहे. सततच्या पावसामुळे या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. याच तलावाच्या पायथ्याशी हे गाव आहे. पावसानंतर तलावातील पाणी पाहण्यासाठी काही युवक तलावाकडे आले होते. यावेळी त्यांना या भेगा दिसल्या. त्यानंतर त्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली.

हेही वाचा : वर्धा जिल्ह्यात दिवसभर पाऊस; शेतात पाणी शिरल्याने नुकसान

हा तलाव 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. अनेक वर्षांपासून तलावाची डागडुजी, देखरेख करण्यात आली नाही. यामुळे यापूर्वीही गावकऱ्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली होती. तलावाच्या भिंतीवर मोठी झाडे वाढली आहेत. तलावाच्या पाळावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.

आता लगेच तलाव फुटण्याची भीती नसली तरी सतत पडणारा पाऊस पाहता हा धोका नाकारला जाऊ शकत नाही. यामुळे अगोदरच बार्‍हा गावातील ४२ घरातील १५० जणांचे रसुलाबाद येथे स्थलांतर करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास रसुलाबाद व हुसेनपुरचे सरपंच राजेश सावरकर, रवी कुरसंगे, रसुलाबादचे पोलिस पाटील श्याम काकडे, तलाठी रमेश भोळे तसेच रसुलाबादच्या नागरिकांनी मदतकार्य करत, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.

हेही वाचा : अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर; धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

सध्या भीतीचे कारण नाही, पण भविष्यात जास्त पाऊस झाला तर धोकादायक होऊ शकेल. यामुळे याबद्दल वरिष्ठांनकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे. प्रकल्पातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे प्रकल्पातील पाणी एक मीटरने कमी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सूचना करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. बी. काळे यांनी दिली. या तलावाला आतापर्यंत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, उपविभागीय कार्यकारी अभियंता राजू दामोदरे, तहसीलदार पाराजे, तलाठी भोळे, पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

हेही वाचा : धक्कादायक! पुराच्या पाण्यात विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू

वर्धा - आर्वी तालुक्यातील बारा (सोनेगाव) लगतच्या कुर्‍हा येथील तलावाच्या पाळ म्हणजेच भिंतीला भेगा पडलेल्या दिसताच, गावकऱ्यांनी भीतीने गाव सोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पाटबंधारे विभागाच्या वतीने बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भेगा पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, अतिवृष्टी झाल्यास होणारा धोका लक्षात घेत, तहसील प्रशासनाच्या वतीने दीडशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

तलावाच्या भिंतीला भेगा पडल्याने गावकऱ्यांनी भीतीने सोडले गाव

बार्‍हा गावाजवळ पाटबांधारे विभागाचा चाळीस वर्षांपूर्वीचा पुरातन तलाव आहे. सततच्या पावसामुळे या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. याच तलावाच्या पायथ्याशी हे गाव आहे. पावसानंतर तलावातील पाणी पाहण्यासाठी काही युवक तलावाकडे आले होते. यावेळी त्यांना या भेगा दिसल्या. त्यानंतर त्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली.

हेही वाचा : वर्धा जिल्ह्यात दिवसभर पाऊस; शेतात पाणी शिरल्याने नुकसान

हा तलाव 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. अनेक वर्षांपासून तलावाची डागडुजी, देखरेख करण्यात आली नाही. यामुळे यापूर्वीही गावकऱ्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली होती. तलावाच्या भिंतीवर मोठी झाडे वाढली आहेत. तलावाच्या पाळावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.

आता लगेच तलाव फुटण्याची भीती नसली तरी सतत पडणारा पाऊस पाहता हा धोका नाकारला जाऊ शकत नाही. यामुळे अगोदरच बार्‍हा गावातील ४२ घरातील १५० जणांचे रसुलाबाद येथे स्थलांतर करण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास रसुलाबाद व हुसेनपुरचे सरपंच राजेश सावरकर, रवी कुरसंगे, रसुलाबादचे पोलिस पाटील श्याम काकडे, तलाठी रमेश भोळे तसेच रसुलाबादच्या नागरिकांनी मदतकार्य करत, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.

हेही वाचा : अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर; धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

सध्या भीतीचे कारण नाही, पण भविष्यात जास्त पाऊस झाला तर धोकादायक होऊ शकेल. यामुळे याबद्दल वरिष्ठांनकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे. प्रकल्पातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे प्रकल्पातील पाणी एक मीटरने कमी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सूचना करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. बी. काळे यांनी दिली. या तलावाला आतापर्यंत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, उपविभागीय कार्यकारी अभियंता राजू दामोदरे, तहसीलदार पाराजे, तलाठी भोळे, पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

हेही वाचा : धक्कादायक! पुराच्या पाण्यात विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू

Intro:mh_war_01_boribara_dam_vis1_7204321

तलावाच्या भिंतीला भेगा पडताच गावलाच लागले 'कुलूप'


- तलावाच्या भिंतीला पाच ते दहा फुटांच्या भेगांनी धडकी

- बारा येथील कुटुंबियांचे सुरक्षित स्थलांतर


वर्धा - आर्वी तालुक्यातील बारा (सोनेगाव) लगतच्या कुर्‍हा येथील तलावाच्या पाळ म्हणजेच भिंतीला भेगा पडल्या आहेत. यामुळे धास्तवालेल्या गावकऱ्यांना दिसल्या. याची माहिती देता पाटबंधारे विभागाच्या वतीने भेट देत पाहणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस पाहता या भेगा पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच अतिवृष्टी झाल्यास धोका लक्षात घेत तहसील प्रशासनाच्या वतीने दिडशेच्या वर लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.



नजीकच्या बार्‍हा गावाजवळ पाटबांधारे विभागाचा चाळीस वर्षांपूर्वीचा
पुरातन तलाव आहे. हा तलाव सततच्या पावसाने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. याच तलावाच्या पायथ्याशी हे गांव आहे. पाणी भरपूर झाल्याने फेरफटका मारण्यासाठी काही युवक तलावाकडे आले. यावेळी त्याना पाणी सांडव्यावरून वाहताना आनंददायी दृश्य दिसले. तेव्हा त्यांना या पाळला भेगा दिसल्या. दुसऱ्या दिवशी या युवकानी पाहणी केली तेव्हा या भेगा वाढलेल्या दिसल्यात. या भेगाची लांबी मोजली असता चार ते पाच फुटापर्यंत दिसली. यावेळी याची माहिती रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी कळवली असल्याचे शिवम कासार याने सांगितले.

हा तलाव 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. अनेक वर्षांपासून तलावाची डागडुजी,
देखरेख करण्यात आली नाही. यामुळे यापूर्वीही गावकऱ्यांना स्थलांतर करण्यात आले. यावेळी मात्र भेगा पडल्या पाझर निघणार्‍या नाल्या निदर्शनास येत नसल्याचे प्रभाकर कासार यांनी सांगितले. तलावाच्या भिंतीवर मोठी झाडे वाढली आहेत. तलावाच्या पाळवर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. काही फुटापर्यंतच्या खोल आणि सलग भेगा पाहून सर्वांनाच धक्का बसवा असेच यंदा सततच्या पावसाने घडवून आणले.


तलाव फुटण्याची भिती आज नसली तरी जास्त पाऊस हा धोका नाकारला जाऊ शकत नाही. यामुळे अगोदरच बार्‍हा गावातील ४२ घरातील १५० जणांचे रसुलाबाद येथे स्थलांतर करण्यात आले. रात्रीच्या सुमारास रसुलाबाद
व हुसेनपुरचे सरपंच राजेश सावरकर, रवी कुरसंगे, रसुलाबादचे पोलिस पाटील
श्याम काकडे, तलाठी रमेश भोळे तसेच रसुलाबादच्या नागरिकांनी मदत कार्य करत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलीत.

प्रकल्पाच्या परिस्थितीची भीतीचे कारण नाही पण भविष्यात जास्त पाऊस झाला तर धोकादायक होऊ शकेल. यामुळे याबद्दल वरिष्ठांनकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे. प्रकल्पातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे प्रकल्पातील पाणी एक मीटरने कमी करण्याची मागणी करण्यात आली. त्यांनुसार सूचना करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस बी काळे यांनी दिली.

तलावाला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, उपविभागीय कार्यकारी
अभियंता राजू दामोदरे, मेश्राम, तहसीलदार पाराजे, तलाठी भोळे, पुलगावचे
ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी भेटी दिल्यात

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.