ETV Bharat / state

पावसाअभावी झाडेही तहानलेलीच.. वृक्षच जगले नाही तर जमिनीत पाणी कसे जिरणार

हे भीषण वास्तव आहे महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील. पावसाअभावी वृक्षलागवड मोहीम थांबवली. लावलेली झाडेच वाळण्याच्या मार्गावर. जुलै महिन्याचा पंधरवाडा लोटला, तरिही पावसाचा पत्ताच नाही. धरणे अजूनही तहानलेली असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे.

author img

By

Published : Jul 21, 2019, 6:17 PM IST

पावसाअभावी वृक्षलागवड मोहीम थांबवली वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव

वर्धा - पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम राबवली जाते. पण जुलै महिन्याचा पंधरवडा लोटला, तरिही पावसाचा पत्ताच नाही. यामुळे वृक्षलागवड मोहीमच धोक्यात आली आहे. लागवड केलेले वृक्षच आता पाण्याअभावी मरू लागल्याने नवीन वृक्षलागवड थांबवण्यात आली आहे. हे भीषण वास्तव आहे महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील.

पावसाअभावी वृक्षलागवड मोहीम थांबवली वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव

वृक्ष जगले नाही तर जमिनीत पाणी मुरणार कसे

पाणी नसल्याने वृक्ष जगणार कसे आणि वृक्ष जगले नाही तर जमिनीत पाणी मुरणार कसे असा प्रश्न आता पडू लागला आहे. जल ही जीवन है, यासाठी वृक्षलागवड करण्याचे सांगितले जाते. पण या वृक्षांना जगवण्यासाठी पाण्याची गरज असते. पावसाळ्यात वृक्षलागवड करत झाडे लावली जाते. पण यंदा पावसाने अजूनही दडी दिली आहे. याचा फटका आता वृक्षलागवड मोहिमेवर पडलाय. शतकोटी वृक्षलगवडीतून जिल्ह्यात 87 लाख वृक्ष लागवड होणार आहे. आता मात्र पावसाअभावी झाडे तहानली आहेत, झाडांनी जीव सोडायला सुरवात केली आहे.

धरणे अजूनही तहानलेली असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे

वरुणराजा कोपला की काय? अशी विचारणा वर्ध्यातील शेतकरी करत आहे. सुरूवातीला थोडा पाऊस झाला यात शेतकऱ्यांनी पेरणी करून वेळ भागवली. पण उन्हाळ्यात कोरडी पडलेली धरणे अजूनही तहानलेली असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली आहे.

८७ लाख वृक्षलागवडीचे उद्दीष्ट पावसामुळे लांबणीवर

जिल्ह्याला ८७ लाख ५२ हजार २०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात ८३ लाख ४८ हजार ३३२ वृक्ष लागवडीचे नियोजन झालेले आहे. यासाठी विविध जागेची निवड करत सध्या ६३ लाख ४६ हजार ४३५ खड्डे खणण्यात आले आहेत. त्यात १६ लाख ३९ हजार २७१ वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे.

trees geting dead In the absence of rain in wardha
पावसाअभावी वृक्षलागवड मोहीम थांबवली वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव

भविष्यातील संकट रोखुन धरले नाही तर गंभीर परिणामांना समोर जावे लागणार

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. याचे गंभीर परिणाम पशु पक्ष्यासह मानवावरही झाले आहेत. वाढते तापमान दुष्काळ, पावसाची दांडी याला जेमतेम सुरवात झाली आहे. एकदा का भूजलसाठा संपला तर गंभीर परिमाण दिसतील. यामुळे वेळीच भविष्यातील संकट रोखुन धरले नाही तर यापेक्षाही गंभीर परिणामांना समोर जावे लागणार यात शंकाच नाही.

नवीन वृक्ष लागवड थांबवत, लागवड झालेल्या वृक्षरोपांना पाणी देण्याचे काम सुरू

शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार वृक्ष लावगडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, सध्या पाऊसच नसल्याने लावण्यात येणारे वृक्ष कसे जगवता येईल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे. नवीन वृक्ष लागवड थांबवत, लागवड झालेल्या वृक्षरोपांना पाणी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक सुहास बढेकर यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

वर्धा - पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम राबवली जाते. पण जुलै महिन्याचा पंधरवडा लोटला, तरिही पावसाचा पत्ताच नाही. यामुळे वृक्षलागवड मोहीमच धोक्यात आली आहे. लागवड केलेले वृक्षच आता पाण्याअभावी मरू लागल्याने नवीन वृक्षलागवड थांबवण्यात आली आहे. हे भीषण वास्तव आहे महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील.

पावसाअभावी वृक्षलागवड मोहीम थांबवली वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव

वृक्ष जगले नाही तर जमिनीत पाणी मुरणार कसे

पाणी नसल्याने वृक्ष जगणार कसे आणि वृक्ष जगले नाही तर जमिनीत पाणी मुरणार कसे असा प्रश्न आता पडू लागला आहे. जल ही जीवन है, यासाठी वृक्षलागवड करण्याचे सांगितले जाते. पण या वृक्षांना जगवण्यासाठी पाण्याची गरज असते. पावसाळ्यात वृक्षलागवड करत झाडे लावली जाते. पण यंदा पावसाने अजूनही दडी दिली आहे. याचा फटका आता वृक्षलागवड मोहिमेवर पडलाय. शतकोटी वृक्षलगवडीतून जिल्ह्यात 87 लाख वृक्ष लागवड होणार आहे. आता मात्र पावसाअभावी झाडे तहानली आहेत, झाडांनी जीव सोडायला सुरवात केली आहे.

धरणे अजूनही तहानलेली असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे

वरुणराजा कोपला की काय? अशी विचारणा वर्ध्यातील शेतकरी करत आहे. सुरूवातीला थोडा पाऊस झाला यात शेतकऱ्यांनी पेरणी करून वेळ भागवली. पण उन्हाळ्यात कोरडी पडलेली धरणे अजूनही तहानलेली असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली आहे.

८७ लाख वृक्षलागवडीचे उद्दीष्ट पावसामुळे लांबणीवर

जिल्ह्याला ८७ लाख ५२ हजार २०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात ८३ लाख ४८ हजार ३३२ वृक्ष लागवडीचे नियोजन झालेले आहे. यासाठी विविध जागेची निवड करत सध्या ६३ लाख ४६ हजार ४३५ खड्डे खणण्यात आले आहेत. त्यात १६ लाख ३९ हजार २७१ वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे.

trees geting dead In the absence of rain in wardha
पावसाअभावी वृक्षलागवड मोहीम थांबवली वर्धा जिल्ह्यातील भीषण वास्तव

भविष्यातील संकट रोखुन धरले नाही तर गंभीर परिणामांना समोर जावे लागणार

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. याचे गंभीर परिणाम पशु पक्ष्यासह मानवावरही झाले आहेत. वाढते तापमान दुष्काळ, पावसाची दांडी याला जेमतेम सुरवात झाली आहे. एकदा का भूजलसाठा संपला तर गंभीर परिमाण दिसतील. यामुळे वेळीच भविष्यातील संकट रोखुन धरले नाही तर यापेक्षाही गंभीर परिणामांना समोर जावे लागणार यात शंकाच नाही.

नवीन वृक्ष लागवड थांबवत, लागवड झालेल्या वृक्षरोपांना पाणी देण्याचे काम सुरू

शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार वृक्ष लावगडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, सध्या पाऊसच नसल्याने लावण्यात येणारे वृक्ष कसे जगवता येईल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे. नवीन वृक्ष लागवड थांबवत, लागवड झालेल्या वृक्षरोपांना पाणी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक सुहास बढेकर यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

Intro: पावसाअभावी वृक्षलागवड मोहीम थांबवली स्पेशल स्टोरी

आता तर झाडेही तहानली....वृक्षलागवड थांबली
- लावलेली झाडे वाळण्याच्या मार्गावर
- बहुतांश ठिकाणी लावलेली झाडे जगविण्याचा प्रयत्न

वर्धा- जल ही जीवन है...यासाठी वृक्षलागवड करण्याचे सांगितले जाते. पण या वृक्षांना जगवण्यासाठी पाण्याची गरज असते. पावसाळ्यात वृक्षलागवड करत झाडे लावली जाते. पण यंदा पावसाने दडी दिली. याचा फटका आता वृक्षलागवड मोहिमेवर पडलाय. शतकोटी वृक्षलगवडीतून जिल्ह्यात 87 लाख वृक्ष लागवड होणार आहे. आता मात्र पावसाअभावी झाडे तहानली...झाडांना जीव सोडायला सुरवात केली आहे.


जुलै महिन्याचा पंधरवाडा लोटला, पण पावसाचा पत्ताच नाही. यामुळे वृक्षलागवड मोहीमच धोक्यातली. लागवड झालेले वृक्ष आता पाण्याअभावी मरू लागल्याने नवीन वृक्षलागवड थांबवण्यात आली आहे. लावलेले वृक्ष जगवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
सुरूवातीला थोडा पाऊस झाला यात शेतकऱ्यांनी पेरणी करून वेळ भागवली. पण उन्हाळ्यात कोरडी पडलेली धरणे अजूनही तहानलेली असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली आहे.

पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम राबवली जाते. पण वरुणराजा कोपला की काय? पावसाने घेतलेल्या विश्रांतीने शतकोटी वृक्ष लागवडीचे वृक्ष रोपांनाही पावसाची नितांत गरज आहे. पाणी नसल्याने वृक्ष जगणार कसे आणि वृक्ष जगले नाही तर जमिनीत पाणी मुरणार कसे असा प्रश्न आता पडू लागलाय.
हे झाड आपल्यासाठी जमिनीत पाणी मुरवत होते. त्याच झाडाना पाणी मिळत नसल्याने करपून मरु लागले आहे.


८७ लाख वृक्षलागवडीचे उद्दीष्ट पावसामुळे लांबणीवर

जिल्ह्याला ८७ लाख ५२ हजार २०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात ८३ लाख ४८ हजार ३३२ वृक्ष लागवडीचे नियोजन झालेले आहे. यासाठी विविध जागेची निवड करत सध्या ६३ लाख ४६ हजार ४३५ खड्डे खणण्यात आले आहेत. त्यात १६ लाख ३९ हजार २७१ वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे.

शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार वृक्ष लावगडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, सध्या पाऊसच नसल्याने लावण्यात येणारे वृक्ष कसे जगवता येईल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे. नवीन वृक्ष लागवड थांबवत लागवड झालेल्या वृक्षरोपांना पाणी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक सुहास बढेकर यांनी ईटीव्ही भारतला दिली.

मागील काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. याचे गंभीर परिणाम पशु पक्ष्यासह प्राण्यांवर झाले आहे. याचे परिणाम माणसांच्या सुद्धा वाटेल यायला सुरुवात झाली आहे. यात वाढते तापमान दुष्काळ, पावसाची दांडी याला जेमतेम सुरवात झाली आहे. एकदा का भूजलसाठा संपला तर गंभीर परिमाण दिसतील. यामुळे वेळीच भविष्यातील संकट रोखुन धरले नाही तर यापेक्षाही गंभीर परिणामांना समोर जावे लागणार यात शंकाच नाही.


Body:पराग ढोबळे वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.