ETV Bharat / state

कामगारांना त्यांच्या कष्टाचे मोल मिळाले पाहिजे- डॉ. संजय कुटे

author img

By

Published : Aug 20, 2019, 9:16 AM IST

Updated : Aug 20, 2019, 11:19 AM IST

वर्धा येथे 'सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा' या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत कामगारांना लाभ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एकूण 3 कोटी 50 लक्ष रुपयांच्या लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वर्धा - राज्यातील पायाभूत निर्मितीमध्ये बांधकाम कामगारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या घामाचे, कष्टाचे मोल त्यांना मिळाले पाहिजे. गरिबांचे पैसे खाणारी संस्कृती नष्ट करण्याचे काम शासनाने केले आहे. या गरीब कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ देण्याचे काम शासन करत असल्याचे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी सांगितले.

कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.

रामनगर येथील सर्कस मैदानावर 'सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा' या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत कामगारांना लाभ वाटपावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव चुं. श्रीरंगम, अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पाणबुडे, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, सरकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे उपस्थित होते.

ऑनलाईन पद्धतीने होणार कामगारांची नोंदणी

कामगार कल्याण विभागामध्ये सुरू असलेली दलालांची साखळी तोडण्यासाठी कामगारांची नोंदणी यापुढे ऑनलाईन करण्यात येणार आहे. लवकरच याचा प्रारंभ होईल. तसेच नोंदणी किंवा योजनांचा लाभ मिळवून देतो, असे म्हणणाऱया दलालांची तक्रार थेट माझ्याकडे करावी, असे आवाहन कुटे यांनी यावेळी केले. पण सद्य स्थितीत सुरू असलेल्या नोंदणीला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करणार

महाराष्ट्रात 2007 ते 2014 पर्यंत केवळ 2 लक्ष बांधकाम कामगारांची नोंदणी होती. 2016 पासून या नोंदणीला वेग दिला असून केवळ दोन वर्षात राज्यात 16 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. त्यातील 9 लाख कामगारांना योजनांचा लाभ मिळाला आहे. सर्वच कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या 29 योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वंचित कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्याचे कामगार विभागाचे ध्येय असल्याचे कुटे यांनी यावेळी सांगितले. तसेच वर्धा जिल्ह्यात 89 हजार कामगारांची नोंदणी झाली असून कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.

आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केल्या विवध मागण्या

आमदार डॉ. पंकज भोयर यांनी कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी देण्यात येणारी मदत 30 हजार रुपयावरुन 50 हजार करावी, कामगारांच्या पाल्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी, 60 वर्षाच्या कामगाराला एकमुस्त रक्कम देण्यात यावी, एमएससीआयटी करताना प्रवेशाच्या वेळी 50 टक्के रक्कम देण्यात यावी, मुख्याधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी कामगारांच्या नोंदणीसाठी समन्वयाने काम करावे आणि कामगारांसाठी कामगार भवन उभारावे, अशी मागणी यावेळी केली.

याप्रसंगी एकूण 3 कोटी 50 लक्ष रुपयांच्या लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. असेच अटल विश्वकर्मा नोंदणीसाठी उल्लेखनीय काम करणारे सरकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे यांचा कामगारमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्याला मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची उपस्थिती होती.

वर्धा - राज्यातील पायाभूत निर्मितीमध्ये बांधकाम कामगारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या घामाचे, कष्टाचे मोल त्यांना मिळाले पाहिजे. गरिबांचे पैसे खाणारी संस्कृती नष्ट करण्याचे काम शासनाने केले आहे. या गरीब कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ देण्याचे काम शासन करत असल्याचे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी सांगितले.

कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.

रामनगर येथील सर्कस मैदानावर 'सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा' या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत कामगारांना लाभ वाटपावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव चुं. श्रीरंगम, अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पाणबुडे, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, सरकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे उपस्थित होते.

ऑनलाईन पद्धतीने होणार कामगारांची नोंदणी

कामगार कल्याण विभागामध्ये सुरू असलेली दलालांची साखळी तोडण्यासाठी कामगारांची नोंदणी यापुढे ऑनलाईन करण्यात येणार आहे. लवकरच याचा प्रारंभ होईल. तसेच नोंदणी किंवा योजनांचा लाभ मिळवून देतो, असे म्हणणाऱया दलालांची तक्रार थेट माझ्याकडे करावी, असे आवाहन कुटे यांनी यावेळी केले. पण सद्य स्थितीत सुरू असलेल्या नोंदणीला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करणार

महाराष्ट्रात 2007 ते 2014 पर्यंत केवळ 2 लक्ष बांधकाम कामगारांची नोंदणी होती. 2016 पासून या नोंदणीला वेग दिला असून केवळ दोन वर्षात राज्यात 16 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. त्यातील 9 लाख कामगारांना योजनांचा लाभ मिळाला आहे. सर्वच कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या 29 योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वंचित कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्याचे कामगार विभागाचे ध्येय असल्याचे कुटे यांनी यावेळी सांगितले. तसेच वर्धा जिल्ह्यात 89 हजार कामगारांची नोंदणी झाली असून कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.

आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केल्या विवध मागण्या

आमदार डॉ. पंकज भोयर यांनी कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी देण्यात येणारी मदत 30 हजार रुपयावरुन 50 हजार करावी, कामगारांच्या पाल्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी, 60 वर्षाच्या कामगाराला एकमुस्त रक्कम देण्यात यावी, एमएससीआयटी करताना प्रवेशाच्या वेळी 50 टक्के रक्कम देण्यात यावी, मुख्याधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी कामगारांच्या नोंदणीसाठी समन्वयाने काम करावे आणि कामगारांसाठी कामगार भवन उभारावे, अशी मागणी यावेळी केली.

याप्रसंगी एकूण 3 कोटी 50 लक्ष रुपयांच्या लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. असेच अटल विश्वकर्मा नोंदणीसाठी उल्लेखनीय काम करणारे सरकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे यांचा कामगारमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्याला मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची उपस्थिती होती.

Intro:
कामगारांना कष्टाचा घामाचा मोल मिळाला पाहिजे- डॉ संजय कुटे

नोंदीत बांधकाम कामगारांना साडे तीन कोटीच्या लाभाचे वाटप
- कामगारांची नोंदणी ऑनलाईन करणार
- दलाली करणाऱ्यांची तक्रार थेट मंत्र्यांकडे करावी
- कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करणार

वर्धा - महाराष्ट्रातील पायाभूत निर्मीतीमध्ये बांधकाम कामगारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या घामाचे, कष्टाचे मोल त्यांना मिळाले पाहिजे. गरिबांचे पैसे खाणारी संस्कृती नष्ट करण्याचे काम केले आहे. या गरीब कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ देण्याचे काम शासन करत असल्याचे कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांनी सांगितले.

रामनगर येथील सर्कस मैदानावर 'सन्मान कष्टाचा ,आनंद उद्याचा' या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत कामगारांना लाभ वाटप यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव चुं. श्रीरंगम, अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पाणबुडे, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, सरकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे उपस्थित होते.

कामगार कल्याण विभागामध्ये सुरू असलेली दलालांची साखळी तोडण्यासाठी कामगारांची नोंदणी यापुढे ऑनलाईन करण्यात येणार आहे. लवकरच याचा प्रारंभ होईल. नोंदणी किंवा योजनांचा लाभ मिळवून देतो असे म्हणणा-या दलालांची तक्रार थेट माझ्याकडे करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पण सद्य स्थितीत सुरू असलेल्या नोंदणीला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 2007 ते 2014 पर्यंत केवळ 2 लक्ष बांधकाम कामगारांची नोंदणी होती. 2016 पासून या नोंदणीला या विभागाने वेग दिला असून केवळ दोन वर्षात राज्यात 16 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. त्यातील 9 लाख कामगारांना योजनांचा लाभ मिळाला आहे. सर्वच कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या 29 योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वंचित कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्याचं कामगार विभागाचे ध्येय आहे.

राज्यात कामगार नोंदणीचा आकडा 2 लाखावरून 16 लाखापर्यंत नेल्याचे सांगितले. वर्धा जिल्ह्यात 89 हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात 3कोटी 50 लक्ष रुपयांचे लाभ वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार डॉ. पंकज भोयर यांनी कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी देण्यात येणारी मदत 30 हजार रुपयावरुन 50 हजार करावी, कामगारांच्या पाल्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी, 60 वर्षाच्या कामगाराला एकमुस्त रक्कम देण्यात यावी, एम एस सी आय टी करताना प्रवेशाच्या वेळी 50 टक्के रक्कम देण्यात यावी, मुख्याधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी कामगारांच्या नोंदणीसाठी समन्वयाने काम करावे, आणि कामगारांसाठी कामगार भवन उभारावे अशी मागणी यावेळी केली.

याप्रसंगी एकूण 3 कोटी 50 लक्ष रुपयांच्या लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. असेच अटल विश्वकर्मा नोंदणी साठी उल्लेखनीय काम करणारे सरकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे यांचा कामगारमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्याला मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची उपस्थिती होती.
                           
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Aug 20, 2019, 11:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.