ETV Bharat / state

वर्ध्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; २० ते २५ घरांचे नुकसानासह गोठ्यावर वीज पडल्याने बैलजोडी ठार

वर्धेत काल आलेल्या जोरदार वादळी वाऱयासह पावसाच्या आगमनाने शेतकऱयांसह अनेकांच्या मालमत्तेचे नुकसान झालयं. वायफड येथे दुपारी चार वाजताच्या सुमारास गारपीट झाली. यात २० ते २५ घरांचे नुकसान झाले, तर लोणसावळी येथे सुद्धा १० ते १२ घरांची पडझड झालीयं. वादळामूळे रस्त्यावरील मोठी झाडे सुद्घा उनमळून पडलीत. त्यामूळे वर्धा वायफड मार्ग बंद झालायं.आलेल्या पावसाने नुकसानीचा सपाटा लावल्याने सध्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण होतयं.

author img

By

Published : Jun 6, 2019, 10:57 AM IST

Updated : Jun 6, 2019, 12:25 PM IST

डाव्या बाजूस उडालेली टिनपत्रे, उजव्याबाजूस उनमळून पडलेली झाडे.

वर्धा- शहरात अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाच्या सरी बरसल्याचे पाहायला मिळाले. या वादळी वाऱ्यामूळे शेतकऱ्यांसह अनेकांना भरपूर नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यामूळे झालेल्या नुकसानीचे दृश्य


वायफड येथे दुपारी चार वाजताच्या सुमारास गारपीट झाली. वादळी वाऱ्याने पुन्हा उग्र रूप धारण केल्याने छतावरील टिनाचे पत्रे उडालीत. यात २० ते २५ घरांचे नुकसान झाले, तर लोणसावळी येथे सुद्धा १० ते १२ घरांची पडझड झाली आहे. या भीषण वादळामूळे रस्त्यावरील मोठी झाडे सुद्घा उनमळून पडलीत. त्यामूळे वर्धा वायफड मार्ग बंद झाला आहे. हिंगणघाट तालुक्याच्या ममदापूर (बोरगाव) गावातील गोठ्यावर वीज पडल्याने गोठ्यात बांधून असणारी बैलजोडी ठार झाली. यात नारायण धुर्वे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांसह अनेकांना नुकसान सोसावे लागत आहे. वादळी वाऱ्याने विजेचे खांब पडले त्यामूळे अनेक गावांना बुधवारची रात्र अंधारात काढावी लागली.


दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नुकसानीचा सपाटा लावल्याचे दिसते आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ज्यांच्या घराचे छत टीनाचे आहे त्यांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते आहे.

वर्धा- शहरात अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाच्या सरी बरसल्याचे पाहायला मिळाले. या वादळी वाऱ्यामूळे शेतकऱ्यांसह अनेकांना भरपूर नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यामूळे झालेल्या नुकसानीचे दृश्य


वायफड येथे दुपारी चार वाजताच्या सुमारास गारपीट झाली. वादळी वाऱ्याने पुन्हा उग्र रूप धारण केल्याने छतावरील टिनाचे पत्रे उडालीत. यात २० ते २५ घरांचे नुकसान झाले, तर लोणसावळी येथे सुद्धा १० ते १२ घरांची पडझड झाली आहे. या भीषण वादळामूळे रस्त्यावरील मोठी झाडे सुद्घा उनमळून पडलीत. त्यामूळे वर्धा वायफड मार्ग बंद झाला आहे. हिंगणघाट तालुक्याच्या ममदापूर (बोरगाव) गावातील गोठ्यावर वीज पडल्याने गोठ्यात बांधून असणारी बैलजोडी ठार झाली. यात नारायण धुर्वे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांसह अनेकांना नुकसान सोसावे लागत आहे. वादळी वाऱ्याने विजेचे खांब पडले त्यामूळे अनेक गावांना बुधवारची रात्र अंधारात काढावी लागली.


दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नुकसानीचा सपाटा लावल्याचे दिसते आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ज्यांच्या घराचे छत टीनाचे आहे त्यांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते आहे.

Intro:mh_war_vadali_paaus_gaara_nuksan_vis1_7204321

वर्ध्यात दुसऱ्या दिवशीही वादळी वारा, गारांचा पाऊस

- वायफडात गारपीट , 20 ते 25 घरांची पडझड
- लोणसावळी येथेही घरांची पडझड
- रस्त्यावर झाड पडल्याने वर्धा वायफड मार्ग बंद
- ममदापुरात वीज पडल्याने बैलजोडी ठार
- अनेक गावांत जीव पुरवठा खंडित,

वर्ध्यातील अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाच्या सरी बरसल्याचे पाहायला मिळाले. वायफड येथे दुपारी चार वाजताच्या सुमारास सुमारास गारपीट झाले. वादळी वाऱ्याने पुन्हा उग्र रूप धारण केल्याने छतावर टिनाचे पत्रे असणारे घर उडाले. २० ते २५ घरांचे नुकसान झाले तर लोणसावळी येथे सुद्धा १० ते १२ घरांची पडझड झाली आहे.

झालेल्या वादळाने रस्त्यावरील मोठे झाड रस्त्यावर उनमडून पडलेत. यामुळे वर्धा वायफड मार्ग बंद झाला आहे.हिंगणघाट तालुक्याच्या ममदापूर (बोरगाव) गावातील गोठ्यावर वीज पडल्याने गोठ्यात बांधून असणारी बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नारायण धुर्वे असे शेतकऱ्यांचे नाव आहे. मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांसह अनेकांना नुकसान सोसावे लागत आहे. वादळी वाऱ्याने विजेचे खांब सुद्धा पडल्याने अनेक गावांना आजची रात्र अंधारात काढावी लागणार आहे.

दोन दिवसंपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पासने नुकसानीच सपाटा लावलेलं दिसत आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ज्याच्या घराचे छत टीनाचे आहे त्यांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jun 6, 2019, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.