ETV Bharat / state

'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच'

पालकमंत्रिपद हे किती महत्त्वाचे आहे हे ज्यांना कळलेच नाही अशा व्यक्ती बद्दल मला बोलण्यात अजिबात रस नाही. माझ्या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री मेलेले आहेत. अशा मेलेल्या व्यक्ती विषयी काय बोलावे. आमची लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. मागील 5 वर्षांत या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. राज्याला कर्जाच्या खायीत ढकलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

author img

By

Published : Oct 8, 2019, 8:08 PM IST

Updated : Oct 11, 2019, 12:00 PM IST

नाना पटोले

भंडारा - मी निवडणूक लढणार नाही असे म्हणालो होतो. पण, तो एक जुमला होता. जे भाजप सरकार सतत मतदारांना जुमले देते त्यांना मी सुध्दा एक जुमला दिला, असे नाना पटोले यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान सांगीतले आहे. महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार नाना पटोले यांची ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेली खास मुलाखत.

ईटिव्ही प्रतिनिधी दीपेंद्र गोस्वामी यांच्याशी बोलताना नाना पटोले


ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?


पालकमंत्रिपद हे किती महत्त्वाचे आहे हे ज्यांना कळलच नाही अशा व्यक्ती बद्दल मला बोलण्यात अजिबात रस नाही. माझ्या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री मेलेले आहेत. अशा मेलेल्या व्यक्ती विषयी काय बोलावे. आमची लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. मागील 5 वर्षांत या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. राज्याला कर्जाच्या खायीत ढकलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. मी शंभर टक्के भरघोस मतांनी निवडून येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहारच्या प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भंडारा - मी निवडणूक लढणार नाही असे म्हणालो होतो. पण, तो एक जुमला होता. जे भाजप सरकार सतत मतदारांना जुमले देते त्यांना मी सुध्दा एक जुमला दिला, असे नाना पटोले यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान सांगीतले आहे. महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार नाना पटोले यांची ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेली खास मुलाखत.

ईटिव्ही प्रतिनिधी दीपेंद्र गोस्वामी यांच्याशी बोलताना नाना पटोले


ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?


पालकमंत्रिपद हे किती महत्त्वाचे आहे हे ज्यांना कळलच नाही अशा व्यक्ती बद्दल मला बोलण्यात अजिबात रस नाही. माझ्या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री मेलेले आहेत. अशा मेलेल्या व्यक्ती विषयी काय बोलावे. आमची लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. मागील 5 वर्षांत या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. राज्याला कर्जाच्या खायीत ढकलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. मी शंभर टक्के भरघोस मतांनी निवडून येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहारच्या प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Intro:anc : मी निवडणूक लढणार नाही हा एक जुमला होता. जे भाजपा शासन सतत मतदारांना जुमले देते त्या भाजपा शासनाला मीही एक जुमला दिला असे नाना पटोले यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान सांगितले. महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख आणि साकोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार नाना पटोले यांच्या आमच्या ईटीव्ही च्या प्रतिनिधीने घेतलेली खास मुलाखत.



Body:पालकमंत्रिपद हे किती महत्त्वाचे आहे हे ज्यांना कळलच नाही अशा व्यक्ती बद्दल मला बोलण्यात अजिबात रस नाही, माझ्या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री पद मेलेले मेलेले आहे आणि मेलेल्या व्यक्ती विषयी काय बोलावे, हे बाहेर जिल्ह्यातील की आमच्या जिल्ह्यातील आहेत हे मतदार त्यांना लवकरच दाखवून देणार आहेत. आमची लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे, मागील पाच वर्ष्यात या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटून टाकले, कर्जबाजारी केले त्या मुख्यमंत्रांच्या विरोधात ही लढाई आहे असे त्यांनी या वेळी सांगितले.
तुम्ही महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख असूनही काँग्रेसने तुम्हाला शेवटपर्यंत उमेदवारी दिली नाही का असा व्यवहार तुमच्याशी केला गेला असे विचारले असता त्यांनी सांगितले की ही काँग्रेसची एक रणनीती होती आणि या रणनीतीच्या जाळ्यात भाजपा अलगत अडकलेला आहे.
तुम्ही फक्त गोड बोलता मात्र मागच्या पंधरा वर्षात तुमचे काम काहीच नाही असा आरोप तुमच्यावर होतो असं नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी सांगितले 2009च्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून आलो होतो. माझ्या मतदारसंघातील लोकांनी माझ्या कामामुळे मला एवढ्या बहुमताने निवडून पाठवले होते आणि तरीही विरोधकांना ते दिसत नसेल तर हि त्यांची चुकी आहे.
मी नितिन गडकरी विरुद्ध हरलो तर भविष्यात निवडणूक लढणार नाही अशी जाहीर कबुली नाना पटोले यांनी दिली होती मात्र पुन्हा विधानसभा निवडणुक का लढवत आहात तेव्हा नाना पटोले यांनी सुरुवातीला गोल गोल उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही आमच्या प्रश्नावर ठाम राहिल्यानंतर निवडणूक न लढविणे हा एक माझा जुमला होता असे उत्तर देऊन मोकळे झाले ज्या मंत्र्यांसमोर मी हे बोललो तो खोटारडा मंत्री आहे आणि म्हणून मी हा विषय गांभीर्याने घेत नाही भाजप मागील पाच वर्ष मतदारांना सतत जुमले देतो त्यामुळे यावेळेस आम्ही त्यांना जुमले दिले असे उत्तर यावेळेस नाना पटोले यांनी दिले.
सेवक वाघाये यांनी बंडखोरी जरी केली असली तरी त्याचा मला काहीही नुकसान होणार नाही असे नाना पवार यांनी सांगितले 2009च्या निवडणुकीत मी 67 हजार मतांनी निवडून आलो होतो यावर्षी जवळपास एक लाख मतांनी निवडून येईल असे मतदार स्वतः सांगत आहेत आणि मला मतदार राजाच्या बोलण्यावर विश्वास असल्याने मी शंभर टक्के भरघोस मताने निवडून येईल असा विश्वास यावेळेस नाना पटोले यांनी दाखविला.





Conclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.