ETV Bharat / state

अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात २ ठार

author img

By

Published : Dec 2, 2019, 11:24 PM IST

ठाणे येथे एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या नाशिकच्या कुटुंबावर संकट कोसळल्याची घटना घडली आहे. चारचाकीचा टायर फुटल्याने ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात दोन ठार झाले, तर सहा जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त चारचाकी
अपघातग्रस्त चारचाकी

ठाणे - नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर संकट कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगावजवळ घडली आहे. या घटनेत कुटुंबातील २ जण ठार झाले, तर ६ गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातामध्ये चारचाकीचा चुराडा झाला आहे.


नाशिक येथील भवर कुटुंबीय आज नाशिकहून ठाणे येथे एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी चारचाकीतून निघाले होते. आज (सोमवार) संध्याकाळी मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव नजीकच्या हॉटेल डायमंडजवळ भरधाव चारचाकीचा पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे चारचाकी समोरच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दोन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. मुंबई-नाशिक महामार्गावरून ठाणे येथे जात असताना आसनगावजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. प्रकाश भवर (वय 55 वर्षे) व सुमन टोचे (वय 60 वर्षे) हे ठार झाले असून राजेंद्र भवर, आनंद भवर, संगीता भवर, बाळासाहेब भवर, रामदास टोचे व अरुण भवर हे ६ जण जखमी झाले आहेत.

जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांचा आकडा दिवसेंदिस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गिता माळी यांचा अपघात झाला होता.

हेही वाचा - उल्हासनगरमधून 5 वर्षीय चिमुरडीचे अपहरण, आरोपी 12 तासात पोलिसांच्या ताब्यात

ठाणे - नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर संकट कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगावजवळ घडली आहे. या घटनेत कुटुंबातील २ जण ठार झाले, तर ६ गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातामध्ये चारचाकीचा चुराडा झाला आहे.


नाशिक येथील भवर कुटुंबीय आज नाशिकहून ठाणे येथे एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी चारचाकीतून निघाले होते. आज (सोमवार) संध्याकाळी मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव नजीकच्या हॉटेल डायमंडजवळ भरधाव चारचाकीचा पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे चारचाकी समोरच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दोन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. मुंबई-नाशिक महामार्गावरून ठाणे येथे जात असताना आसनगावजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. प्रकाश भवर (वय 55 वर्षे) व सुमन टोचे (वय 60 वर्षे) हे ठार झाले असून राजेंद्र भवर, आनंद भवर, संगीता भवर, बाळासाहेब भवर, रामदास टोचे व अरुण भवर हे ६ जण जखमी झाले आहेत.

जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांचा आकडा दिवसेंदिस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गिता माळी यांचा अपघात झाला होता.

हेही वाचा - उल्हासनगरमधून 5 वर्षीय चिमुरडीचे अपहरण, आरोपी 12 तासात पोलिसांच्या ताब्यात

Intro:kit 319Body:अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटंबांवर काळाचा घाला ; अपघातात २ ठार , ६ गंभीर जखमी

ठाणे : नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या कुटूंबावर संकट कोसळल्याची घटना घडली आहे. हि घटना मुंबई - नाशिक महार्गावरील आसनगांव नजीक घडली आहे. या घटनेत कुटंबातील २ जण ठार झाले तर ६ गंभीर जखमी झाले आहेत, हा अपघात एवढा भीषण होता कि, अपघात कार पूर्णपणे शितीग्रस्त झाली आहे.
दुर्दैव म्हणजे तवेरा कराचा पाठीमागील टायर फुटल्याने समोरच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तवेरा गाडीमधील दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे येथे जात असताना आसनगाव जवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला.मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.प्रकाश भवर (५५) व सुमन टोचे (६०) हे ठार झाले असून राजेंद्र भवर, आनंद भवर, संगीता भवर, बाळासाहेब भवर, रामदास टोचे व अरुण भवर हे सहा जण जखमी झाले आहेत.

भवर कुटुंबीय आज नाशिकहून ठाणे येथे एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी तवेरा गाडीतून निघाले होते. आज संध्याकाळी मुंबई - नाशिक महामार्गावरील आसनगाव जवळ हॉटेल डायमंड जवळ तवेरा गाडीचा पाठीमागील टायर फुटल्याने पुढे असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. जखमींवर शहापूर उपजिल्हारुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, मुंबई नाशिक महामार्गावर अपघातांचा आकडा दिवसेंदिस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गिता माळी यांचा अपघात झाला होता.

Conclusion:apghat
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.