ETV Bharat / state

ठाण्यात युवकांचा अनोखा उपक्रम, किल्ल्यांच्या संवर्धनाने दिवाळी साजरी

author img

By

Published : Oct 30, 2019, 1:14 AM IST

Updated : Oct 30, 2019, 1:43 AM IST

ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर किल्ल्याचे अस्तित्व जपण्यासाठी गड संवर्धन व दिवाळी पाडव्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला.सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे आणि हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पाडवा कार्यक्रम निमित्त खास आगळी वेगळी मोहीम ३५ जणांच्या उपस्थित पार पडली.

ठाण्यात किल्ल्यांच्या संवर्धनाने दिवाळी साजरी, युवकांचा अनोखा उपक्रम

ठाणे - येथील सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे आणि हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याचे वैभव, वैशिष्ट्य, इतिहास असलेल्या घोडबंदर किल्ल्यावर दिपावली पाडव्याच्या दिवशी दीपोत्सव व श्रमदान मोहीम यशस्वी पार पडली.

ठाण्यात किल्ल्यांच्या संवर्धनाने दिवाळी साजरी

हेही वाचा - अकोल्यात स्टेअरिंग लॉक झाल्याने जीप उलटली; 8 प्रवासी जखमी

ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर किल्ल्याचे अस्तित्व जपण्यासाठी गड संवर्धन व दिवाळी पाडव्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला.सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे आणि हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पाडवा कार्यक्रम निमित्त खास आगळी वेगळी मोहीम ३५ जणांच्या उपस्थित पार पडली.

'करूनी युवा पिढीचे संघटन, उभारु चळवळ गडकोट संवर्धन” असा नारा देत 'माझा गड, माझा अभिमान' जयघोषात या मोहिमेस सुरुवात झाली. इतिहासाचे जतन आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याकरिता ह्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. किल्ल्याच्या आवारातील गवत , बुरुजाकडे जाणारी पायवाट, बुरूजावरील गवत व बुरुजाकडेला उगवलेली झुडपे काढुन टाकण्याचे काम केले. सायंकाळी ६ च्या सुमारास शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून आणि रांगोळी काढून फुलांनी बुरूज व पायऱ्या सजवून सर्वत्र पणती लावुन पूजा करण्यात आली. इतिहास व गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे, असा संदेश देत ही मोहीम दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात पार पडली.

किल्ल्यावर अनेक लोकं सुट्टीसाठी, फोटो काढण्यासाठी तर रात्रीच्या वेळी मद्यपान करण्यासाठी येतात. त्यामुळे या किल्ल्याचे पावित्र्य नाहीसे झाले असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे अस्तित्व व पावित्र्य जपण्यासाठी ठाण्यातील सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे व हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने गड संवर्धन मोहीम राबविण्यात आली.

ठाणे - येथील सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे आणि हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याचे वैभव, वैशिष्ट्य, इतिहास असलेल्या घोडबंदर किल्ल्यावर दिपावली पाडव्याच्या दिवशी दीपोत्सव व श्रमदान मोहीम यशस्वी पार पडली.

ठाण्यात किल्ल्यांच्या संवर्धनाने दिवाळी साजरी

हेही वाचा - अकोल्यात स्टेअरिंग लॉक झाल्याने जीप उलटली; 8 प्रवासी जखमी

ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर किल्ल्याचे अस्तित्व जपण्यासाठी गड संवर्धन व दिवाळी पाडव्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला.सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे आणि हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पाडवा कार्यक्रम निमित्त खास आगळी वेगळी मोहीम ३५ जणांच्या उपस्थित पार पडली.

'करूनी युवा पिढीचे संघटन, उभारु चळवळ गडकोट संवर्धन” असा नारा देत 'माझा गड, माझा अभिमान' जयघोषात या मोहिमेस सुरुवात झाली. इतिहासाचे जतन आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याकरिता ह्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. किल्ल्याच्या आवारातील गवत , बुरुजाकडे जाणारी पायवाट, बुरूजावरील गवत व बुरुजाकडेला उगवलेली झुडपे काढुन टाकण्याचे काम केले. सायंकाळी ६ च्या सुमारास शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून आणि रांगोळी काढून फुलांनी बुरूज व पायऱ्या सजवून सर्वत्र पणती लावुन पूजा करण्यात आली. इतिहास व गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे, असा संदेश देत ही मोहीम दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात पार पडली.

किल्ल्यावर अनेक लोकं सुट्टीसाठी, फोटो काढण्यासाठी तर रात्रीच्या वेळी मद्यपान करण्यासाठी येतात. त्यामुळे या किल्ल्याचे पावित्र्य नाहीसे झाले असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे अस्तित्व व पावित्र्य जपण्यासाठी ठाण्यातील सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे व हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने गड संवर्धन मोहीम राबविण्यात आली.

Intro:ठाण्यात किल्ल्यांच्या संवर्धनाने दिवाळी साजरी युवकांचा अनोखा उपक्रमBody: ठाण्यातील सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे व हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच वैभव, वैशिष्ट्य, इतिहास असलेल्या घोडबंदर किल्ल्यावर दिपावली पाडव्याच्या दिवशी दीपोत्सव व श्रमदान मोहीम यशस्वी पार पडली.

ठाणे जिल्ह्यात एक घोडबंदर नावाचा किल्ला आहे हे आजही ठाण्यातील खुप लोकांना माहित देखील नाही. त्यामुळे या लोप पावत चाललेला घोडबंदर किल्ल्याचे अस्तित्व जपण्यासाठी या किल्ल्यावर गड संवर्धन व दिवाळी पाडव्या निमित्ताने दिपोउत्सव साजरा करण्यात आला.
सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे व हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिवाळी पाडवा कार्यक्रम निमित्त खास आगळी वेगळी मोहीम ३५ जणांच्या उपस्थित पार पडली …. “करूनी युवा पिढीचे संघटन, उभारु चळवळ गडकोट संवर्धन” चा नारा देत “माझा गड, माझा अभिमान” च्या जयघोषात मोहीमेस सुरुवात झाली… इतिहास च जतन करण आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्या करिता ह्या मोहीमेचे आयोजन करण्यात आले. किल्ल्याच्या आवारातील गवत , बुरुजाकडे जाणारी पायवाट, बुरूजावरील गवत व बुरुजाकडेनी उगवलेल्या झुडपे काढुन टाकण्याचे काम केले. सायंकाळी ६ च्या सुमारास शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पुजन करून रांगोळी काढून फुलांनी बुरूज व पायऱ्या सजवून सर्वत्र पणती लावुन पुजा करण्यात आली. इतिहास व गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे, असा संदेश देत ही मोहीम दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात पार पडली.
किल्ल्यावर अनेक लोक पिकनिक साठी, फोटो काढण्यासाठी तर रात्रीच्या वेळी काही लोक मद्यपान करण्यासाठी येतात. त्यामुळे या किल्ल्याचे पावित्र्य नाहीसे झाले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे अस्तित्व व पावित्र्य जपण्यासाठी ठाण्यातील सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे व हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान महा यांच्या वतीने गड संवर्धन मोहीम राबविण्यात आली.Conclusion:
Last Updated : Oct 30, 2019, 1:43 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.