ETV Bharat / state

"मनुवादी जातीव्यवस्थेने अधिकार नाकारलेल्या लोकांनी नागरिकत्वाचे पुरावे द्यायचे कोठून"

author img

By

Published : Feb 1, 2020, 8:52 PM IST

ठाणे शहरात कुल जमात तंजीम या संघटनेच्या पुढाकाराने एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला होता. राबोडी येथून सुरू झालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला.

jitendra awhad on caa
जितेंद्र आव्हाड

ठाणे - मनुस्मृतीमधील जातीव्यवस्थेने 95 टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाण्याचा अधिकारच नाकारला. त्यांनी नागरिकत्वाचे पुरावे द्यायचे कोठून? असा थेट प्रश्न करत सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (एनआरसी) नावाखाली देश तोडण्याचे षड्यंत्र मोदी-शहा आणि भागवत यांनी रचले असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथे केले. ते तिरंगा मोर्चा या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सीएए आणि एनआरसी विरोधात ठाण्यामध्ये तिरंगा मोर्चा

हेही वाचा - ठाण्यात युवक काँग्रेसची 'एनआरयू' मोहीम, भाजपला घेरण्यासाठी देशभर होणार आंदोलन

आव्हाड म्हणाले, की हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही तर हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. म्हणूनच संविधानिक मार्गाने आंदोलन करणार्‍यांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, कोणीही हिंसेला उत्तर हिंसेने देऊ नका, हा देश बुद्ध आणि गांधीजींचा आहे. त्यांनी फेकलेला दगड आपण झेलूया अन् त्या दगडानेच त्यांच्या विचारधारेची कबर बांधूया, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

ठाणे शहरात कुल जमात तंजीम या संघटनेच्या पुढाकाराने एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला होता. राबोडी येथून सुरू झालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, रिपाइंचे सुनील खांबे, वंचित बहुजन आघाडीचे संजय मिरगुडे आदी उपस्थित होते. या मोर्चामध्ये हजारो लोकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

आव्हाड पुढे म्हणाले, की गोवंश हत्याबंदी करुन सर्वात आधी या सरकारने आमच्या खाण्याच्या अधिकारावर गदा आणली होती. मी ठामपणे सांगू शकतो की एकही मुस्लीम बांधव गायीचे मांस खात नाही. तरीही, ही बंदी आणण्यात आलीच. उद्या हे मोदी-शहा फापडा, जिलेबी देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. सुधारित नागरिकत्व, राष्ट्रीय नोंदणी कायद्यातून केंद्र सरकारकडून हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यातून दोन्ही समाज एकत्र झाल्याचे चित्र सर्वत्र उभे राहिले आहे. या ठिकाणी मोदी-शहांचे आभारच मानले पाहिजेत. त्यांच्यामुळेच इथला मुस्लीम, हिंदू, शिख, इसाई, बौद्ध एकवटला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा - कुणाल कामराची 'इंडिगो'ला नोटीस, मागितली 25 लाखांची नुकसानभरपाई

ठाणे - मनुस्मृतीमधील जातीव्यवस्थेने 95 टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाण्याचा अधिकारच नाकारला. त्यांनी नागरिकत्वाचे पुरावे द्यायचे कोठून? असा थेट प्रश्न करत सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (एनआरसी) नावाखाली देश तोडण्याचे षड्यंत्र मोदी-शहा आणि भागवत यांनी रचले असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथे केले. ते तिरंगा मोर्चा या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सीएए आणि एनआरसी विरोधात ठाण्यामध्ये तिरंगा मोर्चा

हेही वाचा - ठाण्यात युवक काँग्रेसची 'एनआरयू' मोहीम, भाजपला घेरण्यासाठी देशभर होणार आंदोलन

आव्हाड म्हणाले, की हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही तर हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. म्हणूनच संविधानिक मार्गाने आंदोलन करणार्‍यांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, कोणीही हिंसेला उत्तर हिंसेने देऊ नका, हा देश बुद्ध आणि गांधीजींचा आहे. त्यांनी फेकलेला दगड आपण झेलूया अन् त्या दगडानेच त्यांच्या विचारधारेची कबर बांधूया, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

ठाणे शहरात कुल जमात तंजीम या संघटनेच्या पुढाकाराने एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला होता. राबोडी येथून सुरू झालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, रिपाइंचे सुनील खांबे, वंचित बहुजन आघाडीचे संजय मिरगुडे आदी उपस्थित होते. या मोर्चामध्ये हजारो लोकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

आव्हाड पुढे म्हणाले, की गोवंश हत्याबंदी करुन सर्वात आधी या सरकारने आमच्या खाण्याच्या अधिकारावर गदा आणली होती. मी ठामपणे सांगू शकतो की एकही मुस्लीम बांधव गायीचे मांस खात नाही. तरीही, ही बंदी आणण्यात आलीच. उद्या हे मोदी-शहा फापडा, जिलेबी देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. सुधारित नागरिकत्व, राष्ट्रीय नोंदणी कायद्यातून केंद्र सरकारकडून हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यातून दोन्ही समाज एकत्र झाल्याचे चित्र सर्वत्र उभे राहिले आहे. या ठिकाणी मोदी-शहांचे आभारच मानले पाहिजेत. त्यांच्यामुळेच इथला मुस्लीम, हिंदू, शिख, इसाई, बौद्ध एकवटला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा - कुणाल कामराची 'इंडिगो'ला नोटीस, मागितली 25 लाखांची नुकसानभरपाई

Intro:मनुवादी विचारधारेची कबर आम्हीच बांधू-जितेंद्र आव्हाड
ठाण्यातील तिरंगा मोर्चात जय भिम’ चा नाराBody:


भारतात जाती व्यवस्थेने पंच्यान्नव टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाऊच दिले नाही, त्यांनी पुरावे द्यायचे कोठून? असा थेट प्रश्न करत सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नोंदणीच्या नावाखाली देश तोडण्याचे षडयंतत्र मोदी-शहा आणि भागवत यांनी रचले आहे. हा कायदा मुस्लीमांच्या विरोधात नाही तर हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. म्हणूनच संविधानिक मार्गाने आंदोलने करणार्‍यांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, कोणीही हिंसेला उत्तर हिंसेने देऊ नका, हा देश बुद्ध आणि गांधीजींचा आहे. त्यांनी फेकलेला दगड आपण झेलू या; अन् त्या दगडानेच त्यांच्या विचारधारेची कबर बांधू या, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
         ठाणे शहरात कुल जमात तंजीम, ठाणे या संघटनेच्या पुढाकाराने एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला होता. राबोडी येथून सुरु झालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जीत करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सभेत डॉ. जितेंद्र आव्हाड हे बोलत होते. या प्रसंगी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, रिपाइंचे सुनील खांबे, वंचित बहुजन आघाडीचे संजय मिरगुडे आदी उपस्थित होते. या मोर्चामध्ये सुमारे 10 हजार लोक सहभागी झाले होते.
गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, गोवंश हत्याबंदी करुन सर्वात आधी या सरकारने आमच्या खाण्याच्या अधिकारावर गदा आणली होती. मी ठामपणे सांगू शकतो की एकही मुस्लीम बांधव गायीचे मांस खात नाही. तरीही, ही बंदी आणण्यात आलीच. उद्या हे मोदी-शहा फापडा, जिलेबी देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. सुधारित नागरिकत्व, राष्ट्रीय नोंदणी कायद्यातून केंद्र सरकारकडून हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यातून दोन्ही समाज एकत्र झाल्याचे चित्र सर्वत्र उभे राहिले आहे. या ठिकाणी मोदी-शहांचे आभारच मानले पाहिजेत. त्यांच्यामुळेच इथला मुस्लीम, हिंदू, शिख, इसाई, बौद्ध एकवटला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मनुस्मृतीमधील जाती व्यवस्थेने पंच्यान्नव टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाण्याचा अधिकारच नाकारला. त्यांनी नागरिकत्वाचे पुरावे द्यायचे कोठून? असा थेट प्रश्न करीत भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार या कायद्यांच्या आडून मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून जाती भेदात बांधलेल्या समाजाला मुक्त केले. ज्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली; त्या दिवशी आमच्यासाठी स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता. त्यामुळेच ही लढाई आंबेडकर विरुध्द गोळवलकर अशी आहे. गोळवलकर यांचे विचारधन पुस्तक हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया असल्याने मोदी-शहा ही विचारधारा देशावर थोपवण्याच्या प्रयत्नात आहेत. आसाममध्ये नागरिकत्व कायद्यांतर्गत पकडलेल्या अठरा लाखापैकी चौदा लाख लोक तर हिंदू आहेत. या सर्व हिंदूंना मुक्त करण्याचे आवाहन आम्ही या ठिकाणी करीत आहोत. त्यांच्या सुटकेपर्यंत उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे; भागवतांनाही आम्ही तसे आव्हान देत आहोत, असे डॉ. आव्हाड म्हणाले.
हा देश बुद्ध आणि गांधींचा आहे. त्यामुळे आम्ही हिंसेचे समर्थन करीत नाही. पण, उद्या काही लोक अफवा पसरवतील;पण, तुम्ही तुमचा सयंम ढळू देऊ नका. त्यांनी मारलेल्या गोळ्या आपण छातीवर झेलू, त्यांनी मारलेले दगड हातात पकडू अन् त्या दगडांनीच त्यांच्या विचारधारेची कबर बांधू; आज संविधानच धोक्यात असल्याने जय भिम चा नारा देऊन संघर्ष करावा लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच जितेंद्र आव्हाड उभा राहिला असल्याने भाजप सरकारच्या मुलभूत अधिकार नाकारण्याच्या धोरणाविरुध्द शेवटपर्यंत संघर्ष करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी, बी. जी. कोळसे- पाटील यांनी, “ समतेच्या शोधात धर्मांतरे झाली आहेत. बुद्धानंतर समता शिकवणारा धर्म हा इस्लाम आहे, असे विवेकानंद यांनीच सांगितले आहे. मात्र, आंबेडकरवाद्यांच्या सोबत मुस्लीम न आल्यामुळेच क्रांती झाली नाही, असे सांगून हा देश आमच्या बापाचा आहे. आम्ही सीएए आणि एनसीआर मानणार नाही, असे ठणकावले. तर, आनंद परांजपे यांनी, सीएए आणि एनसीआरच्या विरोधात लढण्याची शपथ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो आम्ही कधीच सहन करणार नाही. हा केवळ संविधानावरील हल्ला नाही तर भारतमातेवरील हल्ला आहे. अन् त्या विरोधात संघर्ष केलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
जयभिम च्या घोषणांनी परिसर दणाणला
         संविधान बचाव महासभेला तिरंगी ध्वज घेऊन मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, महिला सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारचा नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नोंदणी कायदा मुलभूत अधिकारावर गदा आणणारा असल्याने संविधानच धोक्यात आले आहे. त्यामुळे आता जात, भेद, धर्म विसरुन जयभिम चा नारा देण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर जयभिमच्या घोषणांनी परिसर दणाणला.

यावेळी डॉ. आव्हाड यांनी स्वरीत कविता सादर केली. या कवितेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.



सुन लें जो पूछते हैं किसकी ज़मीं है ये।
हैं दफ़्न जिनके पुरखे उनकी ज़मीं है ये।

आज़ादिए वतन में जिनका लहू बहा।
उनका ही ये वतन है उनकी ज़मीं है ये।

हिन्दू हो या मुसलमाँ या सिक्ख या ईसाई।
़कुर्बां हुए जो इस पर उनकी ज़मीं है ये।

पैदा हुए यहीं पर नानक शिवाजी राणा।
अश्फ़ाक टीपू चिशती उनकी ज़मीं है ये।

हद है फिरंगियों के एजेंट पूछते हैं।
इस घर के मालिकों से किसकी ज़मीं है ये!

ये घर भी मेरा है जमीं भी मेरी है ।
छीन के तेरे बापसे मेरे बाप ने आजाद की हैं !!

अब तू मांगेगां सबूत मेरे देशवासी हनें का ।

तो सुन .... .......
जब तेरा बाप सर झुकाके तलवे चाट राहा था ।
तब मेरा बाप इन्किलाब जिंदाबाद केहे के फासी पे चढ राहा था !
Byte नजीब मुल्ल्ला राष्ट्रवादी नेते आयोजक
बी जी कोलसे पाटिल सामाजिक कार्यकर्ते
जितेंद्र आव्हाड मंत्री Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.