ETV Bharat / state

उल्हासनदीवरील बंधाऱ्याची दुर्दशा; गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

author img

By

Published : Dec 21, 2019, 11:29 PM IST

उल्हासनदीवरील बंधाऱ्यामुळे अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील अनेक गावे जोडली गेली आहेत. मात्र, हा रस्ता धोकादायक झाल्याने गावकऱ्यांना २० ते २५ किलोमीटरचा वळसा घालून यावे लागत आहे.

उल्हासनदी बंधारा दुर्दशा
उल्हासनदी बंधारा दुर्दशा

ठाणे - जांभूळ पाणी शुद्धीकरण केंद्राच्या उल्हासनदीवरील बंधाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. या बंधाऱ्याची संरक्षक भिंत धोकादायक अवस्थेत उभी असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. बंधाऱ्या खालील मोरीचा एक भाग खचला असून गावकऱ्यांचा दळणवळणाचा मार्गही धोक्यात आहे. मागील पाच वर्षांपासून गावकरी हा जीवघेणा प्रवास करत आहेत.

उल्हासनदीवरील बंधाऱ्याची दुर्दशा


या बंधाऱ्यामुळे अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील अनेक गावे जोडली गेली आहेत. जांभूळ, वसत गावातील ग्रामस्थांना आपटी मांजार्ली, गोवीली, टिटवाळाकडे जाण्यासाठी तर आपटी मांजार्ली, दहागाव पोई या ग्रामस्थांना अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसीकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. मात्र, हा रस्ता धोकादायक झाल्याने गावकऱ्यांना २० ते २५ किलो मीटरचा वळसा घालून यावे लागत आहे.

हेही वाचा - रेल्वेतून वन्य पशुपक्षांची तस्करी; टोळीच्या म्होरक्यासह तिघे वनविभागाच्या जाळ्यात

या बंधाऱ्याच्या बाजुची संरक्षक भिंत देखील खचली आहे. भिंतीला तडे जाऊन त्यामधून पाण्याची गळती सुरू आहे. भिंत अचानक खचली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संरक्षक भिंतीवर असलेल्या रेलिंग तुटल्या आहेत. ग्रामस्थांनी बांबू लावून तात्पुरती सुरक्षा व्यवस्था केली. अनेक पर्यटक नदीवर येत असतात. त्यामुळे या बंधाऱ्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या बाबत एमआयडीचे अधीक्षक अभियंता राजाराम राठोड यांना विचारणा केली असता लवकरात लवकर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे - जांभूळ पाणी शुद्धीकरण केंद्राच्या उल्हासनदीवरील बंधाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. या बंधाऱ्याची संरक्षक भिंत धोकादायक अवस्थेत उभी असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. बंधाऱ्या खालील मोरीचा एक भाग खचला असून गावकऱ्यांचा दळणवळणाचा मार्गही धोक्यात आहे. मागील पाच वर्षांपासून गावकरी हा जीवघेणा प्रवास करत आहेत.

उल्हासनदीवरील बंधाऱ्याची दुर्दशा


या बंधाऱ्यामुळे अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील अनेक गावे जोडली गेली आहेत. जांभूळ, वसत गावातील ग्रामस्थांना आपटी मांजार्ली, गोवीली, टिटवाळाकडे जाण्यासाठी तर आपटी मांजार्ली, दहागाव पोई या ग्रामस्थांना अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसीकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. मात्र, हा रस्ता धोकादायक झाल्याने गावकऱ्यांना २० ते २५ किलो मीटरचा वळसा घालून यावे लागत आहे.

हेही वाचा - रेल्वेतून वन्य पशुपक्षांची तस्करी; टोळीच्या म्होरक्यासह तिघे वनविभागाच्या जाळ्यात

या बंधाऱ्याच्या बाजुची संरक्षक भिंत देखील खचली आहे. भिंतीला तडे जाऊन त्यामधून पाण्याची गळती सुरू आहे. भिंत अचानक खचली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संरक्षक भिंतीवर असलेल्या रेलिंग तुटल्या आहेत. ग्रामस्थांनी बांबू लावून तात्पुरती सुरक्षा व्यवस्था केली. अनेक पर्यटक नदीवर येत असतात. त्यामुळे या बंधाऱ्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या बाबत एमआयडीचे अधीक्षक अभियंता राजाराम राठोड यांना विचारणा केली असता लवकरात लवकर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:kit 319Body:उल्हासनदीवरील बंधाऱ्यांची दुर्दशा ; गावकऱ्यांचा ५ वर्षांपासून जीवघेणा प्रवास

ठाणे : अंबरनाथ जवळील एमआयडीसीच्या जांभूळ पाणी शुद्धीकरण केंद्राच्या उल्हासनदीवरील बंधाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. या बंधाऱ्याची सौरक्षक भिंत धोकादायक अवस्थेत उभी असून या ठिकाणी अनेक पर्यटक फिरायला येत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे.
तर बंधाऱ्याच्या खालील मोरीचा एक भाग खचला असून गावकऱ्यांचा दळणवळणाचा मार्गही ५ वर्षांपासून जीवघेणा प्रवास ठरला असल्याचा गावकऱ्यांनी आरोप करीत एमआयडीसी प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
या बांधणाऱ्या मुळे अंबरनाथ आणी कल्याण तालुक्यातील अनेक गावात जोडली गेली आहेत .जांभूळ, वसत गावातील ग्रामस्थांना आपटी मांजार्ली तसेच गोवीली, टिटवाळा कडे जाण्यासाठी तर आपटी मांजार्ली, दहागाव पोई या ग्रामस्थांना अंबरनाथ बदलापूर एमआयडीसीमधे नोकरीवर साईकल किंवा पायी जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. मात्र हा रस्ता बंद झाल्याने गावकऱ्यांना २० ते २५ कि.मी.चा वळसा घालून यावे लागत आहे .तसेच या बंधाऱ्याच्या खाली असलेली मोरीचा एक भागहि खचला असल्याने गावकऱ्यांचा दळणवळणाचा मार्ग खडतर झाला आहे.
या धारणाच्या बाजूची सौरक्षक भिंत देखील खचली असून ती धोकादायक झाली आहे. त्या भिंतीला तडे जाऊन त्यामधून पाण्याची गळती सुरु आहे . हि भिंत अचानक खचली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे . या सौरक्षक भिंतीवर असलेल्या रिलिंग हि तुटल्या आहेत. मात्र ग्रामस्थांनी बांबू लावून तात्पुरती सुरक्षा व्यवस्था केली आहे. अनेक पर्यटक नदीवर येत असतात. त्यामुळे या बंधाऱ्याची लवकरात लवकर डागडुजी सुरु करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे .या बाबत एमआयडीच्या अधीक्षक अभियंता राजाराम राठोड यांना विचारणा केली असता लवकरात लवकर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाईट / भालचंद्र राणे ( गावकरी )

बाईट / सुरेश शिसवे ( गावकरी )

Conclusion:ambrnath
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.